शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

वाळूज उद्योगनगरीत पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 17:10 IST

वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे.

वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे.

वाळूज औद्योगिकनगरीत पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण येथील जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयडीसीतर्फे ब्रह्मगव्हाण ते वाळूज या मार्गावर जलवाहिनी टाकलेली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून अचानक वाळूज औद्योगिकनगरीतील पाणी पुरवठा बंद केला.त्यामुळे उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाने कडे पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार, अशी विचारणा केली. मात्र, जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असून काम पूर्ण होताच पाणी पुरवठा सुरु केला जाईल, अशी उत्तरे उद्योजकांना देण्यात आली.

औद्योगिकनगरीतील बहुताश उद्योजकांनी पाण्याचा साठा करुन ठेवण्यासाठी व्यवस्था करुन ठेवलेली आहे. त्यामुळे शुक्रवारी साठवून ठेवलेले पाणी उपयोगात आणले. मात्र दुसऱ्या दिवशीही पाणी पुरवठा सुरु न झाल्यामुळे उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागला. आता दिवाळी सण तोंडावर आला असून वर्क आॅर्डर पुर्ण करण्याचे काम उद्योगनगरीत जोमाने सुरु आहे.

मात्र, ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कारखान्यातील उत्पादनावर परिणाम होत असल्याची ओरड उद्योजकांतून सुरु आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून उद्योजकांना कुठलीही पूर्वसुचना न देता पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप उद्योजक अनिल पाटील, राहुल मोगले, डॉ.शिवाजी कान्हेरे, अब्दुल शेख, अर्जुन आदमाने, दिंगबर मुळे आदी उद्योजकांनी केला आहे. कारखान्यात पाणीच नसल्यामुळे काही कारखान्यातील कामगारांना शनिवारी दुपारनंतर सुट्टी दिल्याचे काही उद्योजकांनी सांगितले.

कारखान्यात टँकर व जारचे पाणीशनिवारीही पाणी पुरवठा पूर्ववत न झाल्याने सकाळी कंपनीत आलेल्या कामगार व अधिकाºयांची गैरसोय झाली. शुक्रवारी साठवून ठेवलेला जलसाठाही संपला. त्यामुळे अनेक उद्योजकांनी पदरमोड करुन कामगारांना पिण्यासाठी जारचे पाणी मागविले होते. काही कंपन्यांत उद्योजकांनी टँकर मागवून इतर गरजा पूर्ण केल्या.महावितरणकडून शुक्रवारी शटडाऊन असल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु केले होते. मात्र, वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर वाळूज एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाणी पुरवठा बंद केला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून, लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.- दिलीप परळीकर, सहायक अभियंता,एमआयडीसी, औरंगाबाद----------------------------------------

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबादWaterपाणी