शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज उद्योगनगरीत पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 17:10 IST

वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे.

वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे.

वाळूज औद्योगिकनगरीत पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण येथील जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयडीसीतर्फे ब्रह्मगव्हाण ते वाळूज या मार्गावर जलवाहिनी टाकलेली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून अचानक वाळूज औद्योगिकनगरीतील पाणी पुरवठा बंद केला.त्यामुळे उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाने कडे पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार, अशी विचारणा केली. मात्र, जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असून काम पूर्ण होताच पाणी पुरवठा सुरु केला जाईल, अशी उत्तरे उद्योजकांना देण्यात आली.

औद्योगिकनगरीतील बहुताश उद्योजकांनी पाण्याचा साठा करुन ठेवण्यासाठी व्यवस्था करुन ठेवलेली आहे. त्यामुळे शुक्रवारी साठवून ठेवलेले पाणी उपयोगात आणले. मात्र दुसऱ्या दिवशीही पाणी पुरवठा सुरु न झाल्यामुळे उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागला. आता दिवाळी सण तोंडावर आला असून वर्क आॅर्डर पुर्ण करण्याचे काम उद्योगनगरीत जोमाने सुरु आहे.

मात्र, ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कारखान्यातील उत्पादनावर परिणाम होत असल्याची ओरड उद्योजकांतून सुरु आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून उद्योजकांना कुठलीही पूर्वसुचना न देता पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप उद्योजक अनिल पाटील, राहुल मोगले, डॉ.शिवाजी कान्हेरे, अब्दुल शेख, अर्जुन आदमाने, दिंगबर मुळे आदी उद्योजकांनी केला आहे. कारखान्यात पाणीच नसल्यामुळे काही कारखान्यातील कामगारांना शनिवारी दुपारनंतर सुट्टी दिल्याचे काही उद्योजकांनी सांगितले.

कारखान्यात टँकर व जारचे पाणीशनिवारीही पाणी पुरवठा पूर्ववत न झाल्याने सकाळी कंपनीत आलेल्या कामगार व अधिकाºयांची गैरसोय झाली. शुक्रवारी साठवून ठेवलेला जलसाठाही संपला. त्यामुळे अनेक उद्योजकांनी पदरमोड करुन कामगारांना पिण्यासाठी जारचे पाणी मागविले होते. काही कंपन्यांत उद्योजकांनी टँकर मागवून इतर गरजा पूर्ण केल्या.महावितरणकडून शुक्रवारी शटडाऊन असल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु केले होते. मात्र, वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर वाळूज एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाणी पुरवठा बंद केला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून, लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.- दिलीप परळीकर, सहायक अभियंता,एमआयडीसी, औरंगाबाद----------------------------------------

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबादWaterपाणी