शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाळूज उद्योगनगरीत पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 17:10 IST

वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे.

वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे.

वाळूज औद्योगिकनगरीत पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण येथील जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयडीसीतर्फे ब्रह्मगव्हाण ते वाळूज या मार्गावर जलवाहिनी टाकलेली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून अचानक वाळूज औद्योगिकनगरीतील पाणी पुरवठा बंद केला.त्यामुळे उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाने कडे पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार, अशी विचारणा केली. मात्र, जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असून काम पूर्ण होताच पाणी पुरवठा सुरु केला जाईल, अशी उत्तरे उद्योजकांना देण्यात आली.

औद्योगिकनगरीतील बहुताश उद्योजकांनी पाण्याचा साठा करुन ठेवण्यासाठी व्यवस्था करुन ठेवलेली आहे. त्यामुळे शुक्रवारी साठवून ठेवलेले पाणी उपयोगात आणले. मात्र दुसऱ्या दिवशीही पाणी पुरवठा सुरु न झाल्यामुळे उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागला. आता दिवाळी सण तोंडावर आला असून वर्क आॅर्डर पुर्ण करण्याचे काम उद्योगनगरीत जोमाने सुरु आहे.

मात्र, ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कारखान्यातील उत्पादनावर परिणाम होत असल्याची ओरड उद्योजकांतून सुरु आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून उद्योजकांना कुठलीही पूर्वसुचना न देता पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप उद्योजक अनिल पाटील, राहुल मोगले, डॉ.शिवाजी कान्हेरे, अब्दुल शेख, अर्जुन आदमाने, दिंगबर मुळे आदी उद्योजकांनी केला आहे. कारखान्यात पाणीच नसल्यामुळे काही कारखान्यातील कामगारांना शनिवारी दुपारनंतर सुट्टी दिल्याचे काही उद्योजकांनी सांगितले.

कारखान्यात टँकर व जारचे पाणीशनिवारीही पाणी पुरवठा पूर्ववत न झाल्याने सकाळी कंपनीत आलेल्या कामगार व अधिकाºयांची गैरसोय झाली. शुक्रवारी साठवून ठेवलेला जलसाठाही संपला. त्यामुळे अनेक उद्योजकांनी पदरमोड करुन कामगारांना पिण्यासाठी जारचे पाणी मागविले होते. काही कंपन्यांत उद्योजकांनी टँकर मागवून इतर गरजा पूर्ण केल्या.महावितरणकडून शुक्रवारी शटडाऊन असल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु केले होते. मात्र, वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर वाळूज एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाणी पुरवठा बंद केला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून, लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.- दिलीप परळीकर, सहायक अभियंता,एमआयडीसी, औरंगाबाद----------------------------------------

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबादWaterपाणी