शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

वाळूज उद्योगनगरीत पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 17:10 IST

वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे.

वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे.

वाळूज औद्योगिकनगरीत पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण येथील जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयडीसीतर्फे ब्रह्मगव्हाण ते वाळूज या मार्गावर जलवाहिनी टाकलेली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून अचानक वाळूज औद्योगिकनगरीतील पाणी पुरवठा बंद केला.त्यामुळे उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाने कडे पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार, अशी विचारणा केली. मात्र, जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असून काम पूर्ण होताच पाणी पुरवठा सुरु केला जाईल, अशी उत्तरे उद्योजकांना देण्यात आली.

औद्योगिकनगरीतील बहुताश उद्योजकांनी पाण्याचा साठा करुन ठेवण्यासाठी व्यवस्था करुन ठेवलेली आहे. त्यामुळे शुक्रवारी साठवून ठेवलेले पाणी उपयोगात आणले. मात्र दुसऱ्या दिवशीही पाणी पुरवठा सुरु न झाल्यामुळे उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागला. आता दिवाळी सण तोंडावर आला असून वर्क आॅर्डर पुर्ण करण्याचे काम उद्योगनगरीत जोमाने सुरु आहे.

मात्र, ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कारखान्यातील उत्पादनावर परिणाम होत असल्याची ओरड उद्योजकांतून सुरु आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून उद्योजकांना कुठलीही पूर्वसुचना न देता पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप उद्योजक अनिल पाटील, राहुल मोगले, डॉ.शिवाजी कान्हेरे, अब्दुल शेख, अर्जुन आदमाने, दिंगबर मुळे आदी उद्योजकांनी केला आहे. कारखान्यात पाणीच नसल्यामुळे काही कारखान्यातील कामगारांना शनिवारी दुपारनंतर सुट्टी दिल्याचे काही उद्योजकांनी सांगितले.

कारखान्यात टँकर व जारचे पाणीशनिवारीही पाणी पुरवठा पूर्ववत न झाल्याने सकाळी कंपनीत आलेल्या कामगार व अधिकाºयांची गैरसोय झाली. शुक्रवारी साठवून ठेवलेला जलसाठाही संपला. त्यामुळे अनेक उद्योजकांनी पदरमोड करुन कामगारांना पिण्यासाठी जारचे पाणी मागविले होते. काही कंपन्यांत उद्योजकांनी टँकर मागवून इतर गरजा पूर्ण केल्या.महावितरणकडून शुक्रवारी शटडाऊन असल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु केले होते. मात्र, वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर वाळूज एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाणी पुरवठा बंद केला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून, लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.- दिलीप परळीकर, सहायक अभियंता,एमआयडीसी, औरंगाबाद----------------------------------------

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबादWaterपाणी