शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

औरंगाबाद महापालिकेकडून वर्षभरात अवघे ५० दिवसच झाला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:13 IST

महापालिकेकडून बहुतांश नागरिकांना वर्षातून फक्त ५० दिवसच पाणी मिळत आहे. मनपाकडून देण्यात येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत पाणीपट्टीचे दर खूपच आहेत. तब्बल साडेचार हजार रुपये पाणीपट्टीचे दर राज्यात कुठेच नाहीत.

औरंगाबाद : महापालिकेकडून बहुतांश नागरिकांना वर्षातून फक्त ५० दिवसच पाणी मिळत आहे. मनपाकडून देण्यात येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत पाणीपट्टीचे दर खूपच आहेत. तब्बल साडेचार हजार रुपये पाणीपट्टीचे दर राज्यात कुठेच नाहीत.पाणी टंचाईला कंटाळलेल्या औरंगाबादकरांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांचा चांगलाच घाम फोडला. त्यामुळे पाणीपट्टीचे दर किमान ३ हजार रुपयांपर्यंत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. येणाºया सर्वसाधारण सभेत मनपा प्रशासनाकडून दर कमी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

केंद्र, राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी महापालिकेला समांतर जलवाहिनीसाठी निधी दिला. या निधीवर व्याजच १२५ कोटी रुपये जमा झाले आहे. मात्र आजपर्यंत महापालिकेला समांतर जलवाहिनी टाकता आली नाही. सिडको-हडकोसह जालना रोडवरील अनेक प्रभागांना आठव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. पाण्यासाठी मागील दोन महिन्यांत किमान १०० पेक्षा अधिक आंदोलने एन-५, एन-७ येथील जलकुंभावर झाले आहेत. शहराच्या आसपास असलेल्या तब्बल २०० वसाहतींना आजपर्यंत महापालिकेने जलवाहिनी टाकून दिलेली नाही. आजही या वसाहती टँकरवर दिवस काढत आहेत. मनपाकडे आगावू पैसे भरूनही टँकरद्वारे वेळेवर पाणी मिळत नाही. एकीकडे पाण्यासाठी शहरात प्रचंड ओरड सुरू असताना जायकवाडी जलाशयातील पाणी पातळीही खालावली आहे. मृतसाठ्यातून सध्या शहराची तहान भागवावी लागत आहे. शहरात येणाºया पाण्यात किमान २० टक्के घट झाली आहे.

पाणी प्रश्नावर लोकसभा निवडणूक कशीबशी पार पडली. विधानसभा निवडणुकीत मतदारराजा सोडणार नाही, असे सत्ताधाºयांना वाटू लागले आहे. पुढील वर्षी ऐन उन्हाळ्यातच मनपाची निवडणूक आहे. त्यामुळे सहा महिन्यांत समांतरचे नारळ फोडण्यासाठी युती सरसावली आहे. पाणीपट्टीचे दर कमी करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचेही पाणीपट्टी कमी करण्यावर एकमत झाले आहे.

पत्नीने वाढविले होते दर२०१२मध्ये विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी १८०० रुपयांवरून पाणीपट्टीचे दर २५०० रुपये केले होते. त्यानंतर समांतर जलवाहिनीसाठी दरवर्षी १० टक्के दरवाढीचा निर्णयही अनिता घोडेले यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. सात वर्षांनंतर पुन्हा पाणीपट्टीचे दर कमी करण्याचे दायित्व अनिता घोडेले यांचे पती नंदकुमार घोडेले यांच्यावर येऊन ठेपले आहे.येणाºया सर्वसाधारण सभेत दर आणखी कमी करण्यासाठी चर्चा होईल. नगरसेवक ठरवतील तेवढे दर ठेवण्यात येतील. साधारणपणे ३ हजार रुपयांच्या आसपास दर राहतील, असे वाटत आहे.- नंदकुमार घोडेले, महापौर

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद