शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

औरंगाबाद महापालिकेकडून वर्षभरात अवघे ५० दिवसच झाला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:13 IST

महापालिकेकडून बहुतांश नागरिकांना वर्षातून फक्त ५० दिवसच पाणी मिळत आहे. मनपाकडून देण्यात येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत पाणीपट्टीचे दर खूपच आहेत. तब्बल साडेचार हजार रुपये पाणीपट्टीचे दर राज्यात कुठेच नाहीत.

औरंगाबाद : महापालिकेकडून बहुतांश नागरिकांना वर्षातून फक्त ५० दिवसच पाणी मिळत आहे. मनपाकडून देण्यात येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत पाणीपट्टीचे दर खूपच आहेत. तब्बल साडेचार हजार रुपये पाणीपट्टीचे दर राज्यात कुठेच नाहीत.पाणी टंचाईला कंटाळलेल्या औरंगाबादकरांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांचा चांगलाच घाम फोडला. त्यामुळे पाणीपट्टीचे दर किमान ३ हजार रुपयांपर्यंत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. येणाºया सर्वसाधारण सभेत मनपा प्रशासनाकडून दर कमी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

केंद्र, राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी महापालिकेला समांतर जलवाहिनीसाठी निधी दिला. या निधीवर व्याजच १२५ कोटी रुपये जमा झाले आहे. मात्र आजपर्यंत महापालिकेला समांतर जलवाहिनी टाकता आली नाही. सिडको-हडकोसह जालना रोडवरील अनेक प्रभागांना आठव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. पाण्यासाठी मागील दोन महिन्यांत किमान १०० पेक्षा अधिक आंदोलने एन-५, एन-७ येथील जलकुंभावर झाले आहेत. शहराच्या आसपास असलेल्या तब्बल २०० वसाहतींना आजपर्यंत महापालिकेने जलवाहिनी टाकून दिलेली नाही. आजही या वसाहती टँकरवर दिवस काढत आहेत. मनपाकडे आगावू पैसे भरूनही टँकरद्वारे वेळेवर पाणी मिळत नाही. एकीकडे पाण्यासाठी शहरात प्रचंड ओरड सुरू असताना जायकवाडी जलाशयातील पाणी पातळीही खालावली आहे. मृतसाठ्यातून सध्या शहराची तहान भागवावी लागत आहे. शहरात येणाºया पाण्यात किमान २० टक्के घट झाली आहे.

पाणी प्रश्नावर लोकसभा निवडणूक कशीबशी पार पडली. विधानसभा निवडणुकीत मतदारराजा सोडणार नाही, असे सत्ताधाºयांना वाटू लागले आहे. पुढील वर्षी ऐन उन्हाळ्यातच मनपाची निवडणूक आहे. त्यामुळे सहा महिन्यांत समांतरचे नारळ फोडण्यासाठी युती सरसावली आहे. पाणीपट्टीचे दर कमी करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचेही पाणीपट्टी कमी करण्यावर एकमत झाले आहे.

पत्नीने वाढविले होते दर२०१२मध्ये विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी १८०० रुपयांवरून पाणीपट्टीचे दर २५०० रुपये केले होते. त्यानंतर समांतर जलवाहिनीसाठी दरवर्षी १० टक्के दरवाढीचा निर्णयही अनिता घोडेले यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. सात वर्षांनंतर पुन्हा पाणीपट्टीचे दर कमी करण्याचे दायित्व अनिता घोडेले यांचे पती नंदकुमार घोडेले यांच्यावर येऊन ठेपले आहे.येणाºया सर्वसाधारण सभेत दर आणखी कमी करण्यासाठी चर्चा होईल. नगरसेवक ठरवतील तेवढे दर ठेवण्यात येतील. साधारणपणे ३ हजार रुपयांच्या आसपास दर राहतील, असे वाटत आहे.- नंदकुमार घोडेले, महापौर

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद