शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 12:24 IST

जायकवाडी येथील पाणीपुरवठा केंद्रात मंगळवारी सकाळी दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीतच होता.

ठळक मुद्दे बुधवारी दिवसभर पाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस मनपा कार्यालयात सुरू होता.

औरंगाबाद : जायकवाडी येथील पाणीपुरवठा केंद्रात मंगळवारी सकाळी दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीतच होता. बुधवारी दिवसभर पाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस मनपा कार्यालयात सुरू होता. पाणीपुरवठ्याची वितरण व्यवस्था सांभाळण्यासाठी तज्ज्ञ कन्सल्टंट तरी नेमावा, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांकडे केली.

उन्हाळा संपला तरी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. मंगळवारी जायकवाडीत दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक वसाहतींना पाणीपुरवठा करता आला नव्हता. बुधवारी या वसाहतींना पाणी देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला. बुधवारी ज्या वसाहतींना पाणी 

शहराचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीतचदेण्याचा दिवस होता, त्यांना पाणीच मिळाले नाही. पडेगाव, त्याचप्रमाणे वॉर्ड क्र. ४३ येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मागील दोन दिवसांपासून शहरातील बहुसंख्य वसाहतींना किमान पिण्यापुरते का होईना पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेने केला.पाणीपुरवठ्यातील विघ्न दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पावसाळा सुरू झाला तरी नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड ओरड सुरूच आहे. वितरण व्यवस्थेत मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ कन्सल्टंट तरी महापालिकेने नियुक्त करावा, अशी मागणी बुधवारी महापौरांनी आयुक्तांकडे केली.

नारळीबागेत ठणठणाटनारळीबाग परिसरातील राजपूत कॉलनीत मागील दहा दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट सुरू आहे. या भागातील जुनी जलवाहिनी अत्यंत खराब झाली आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी बराच अवधी लागू शकतो. पाणी नसल्याने बुधवारी या भागातील महिला महापौरांकडे आल्या. त्यांनी या प्रकरणात मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. पिण्यासाठी किमान टँकर सुरू करण्याचे आश्वासनही देण्यात आले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादwater scarcityपाणी टंचाई