शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसाठा घटला

By admin | Updated: July 4, 2014 00:12 IST

परभणी : जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. केवळ १९ टक्के पाणी शिल्लक असून, आगामी काळात पाऊस झाला नाही तर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

परभणी : जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. केवळ १९ टक्के पाणी शिल्लक असून, आगामी काळात पाऊस झाला नाही तर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे जिल्हावासियांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.यावर्षी सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी अजूनही पावसाला प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. गतवर्षी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले होते. या प्रकल्पातील पाणी आतापर्यंत पुरले. परंतु यापुढे मात्र परिस्थिती गंभीर होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात येलदरी हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्याखालोखाल सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता आहे. जिंतूर तालुक्यात करपरा आणि गंगाखेड तालुक्यात मासोळी हे दोन मध्य प्रकल्प असून, २२ लघू प्रकल्प आहेत. येलदरी धरणात ३९.६० टक्के पाणी आहे तर ुलोअर दुधना प्रकल्पात ३२ टक्के पाणी शिल्लक आहे. करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ३.८३० दलघमी (१५ टक्के) तर मासोळी मध्यम प्रकल्पात ८.१९४ दलघमी (३० टक्के ) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर लघू प्रकल्पांमध्ये ५.६०९ दलघमी म्हणजे १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.मोठ्या प्रकल्पांबरोबरच मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील पाणी सिंचनाबरोबरच पिण्यासाठी देखील वापरले जाते. या प्रकल्पांवर अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. दिवसेंदिवस पाणीसाठ्यात घट होत असल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर असून, पाणीटंचाई उग्र होत आहे.यावर्षी अजूनही पावसाला प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. एकही मोठा पाऊस अद्याप झालेला नाही. पाऊस पडावा म्हणून देवाकडे साकडे घातले जात आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा लक्षात घेता आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)येलदरीत ४०, लोअर दुधनात ३२ टक्के यावर्षी येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३९ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ३०१ मि.मी. पाऊस झाला होता. पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठ्यात घट झाली. सध्या ३२०.५१३ दलघमी (३९.६० टक्के) उपयुक्त पाणीसाठा या धरणात उपलब्ध आहे. तर लोअर दुधना धरणामध्ये एकूण ५२ टक्के पाणीसाठा असून, त्यापैकी ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.