शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

औरंगाबादेत आधी पाणीटंचाई, आता विजेअभावी उद्योग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:52 IST

शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहती आधीच पाणीटंचाईला सामोरे जात असताना शनिवारी (दि.२) महावितरणने उद्योगांना ‘शॉक’ दिला. सकाळी दोन तास वीज गुल झाल्याने झळ बसली. नंतर दुपारी ४ वाजेनंतर पावसाला सुरुवात होत नाही तोच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीचा वीजपुरवठा खंडित झाला. विजेअभावी उद्योग ठप्प झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.

ठळक मुद्देकोट्यवधींचे नुकसान : एमआयडीसीनंतर महावितरणचा उद्योजकांना शॉक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहती आधीच पाणीटंचाईला सामोरे जात असताना शनिवारी (दि.२) महावितरणने उद्योगांना ‘शॉक’ दिला. सकाळी दोन तास वीज गुल झाल्याने झळ बसली. नंतर दुपारी ४ वाजेनंतर पावसाला सुरुवात होत नाही तोच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीचा वीजपुरवठा खंडित झाला. विजेअभावी उद्योग ठप्प झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत पंधरा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असून, २१ मेपासून उद्योजक संघटना एमआयडीसीसोबत बैठका घेऊन तोडगा काढण्याची मागणी करीत आहेत.शेंद्रा आणि चिकलठाण्यातील बहुतांश उद्योगांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची ओरड होत आहे. ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली, अशा सगळ्या परिस्थितीत औद्योगिक वसाहतींवर जलसंकट निर्माण झाले असून, पिण्याच्या पाण्यासह प्राथमिक कामकाजासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.एकीकडे उद्योजक पाणीटंचाईला सामोरे जात असताना शनिवारी महावितरणनेही त्यांच्या अडचणीत भर टाकली. चिकलठाणा येथील एक फिडर सकाळी बंद राहिल्याने उद्योजकांचे कामकाज विस्कळीत झाले. जवळपास दोन तास पुरवठा बंद होता. यानंतर दुपारी ४ वाजता त्यात आणखी भर पडली. पावसाला सुरुवात होत नाही तोच संपूर्ण चिकलठाणा एमआयडीसीतील वीजपुरवठा बंद झाला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५० टक्के उद्योजकांचा पुरवठा सुरळीत झाला नव्हता. शेंद्रा येथील वीजपुरवठा बंद राहिला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे उद्योजकांनी म्हटले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उद्योजकांना पाणीटंचाईने आणि विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.५० ते ७० कोटींचे नुकसानपुरेसे पाणी मिळत नसल्याने चिकलठाणा, शेंद्रा येथील उद्योजक गेल्या काही दिवसांपासून त्रस्त आहेत. कामगारांना पिण्यासाठी, प्राथमिक कामांसाठीही पुरेसे पाणी नाही. त्यामुळे टँकर मागविण्याची वेळ येत आहे. त्यात शनिवारी वीजपुरवठा खंडित झाला. थोडासा जरी पाऊस आला तरी वीजपुरवठा बंद होतो. हेच शनिवारीही झाले. विजेअभावी ५० ते ७० कोटींचे नुकसान झाले.-किशोर राठी, अध्यक्ष, मसिआकमी पाणी नकोउद्योगांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवडाभरापासून हा त्रास होत आहे. सध्या उत्पादनावर त्याचा फारसा परिणाम नाही; परंतु औद्योगिक वसाहतींना पुरेसा पाणीपुरवठा झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत पाणी कमी करता कामा नये. त्यासाठी योग्य यंत्रणा विकसित केली पाहिजे.-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सीएमआयएपावसामुळे वीजपुरवठा बंदचिकलठाणा ‘एमआयडीसी’तील पावसामुळे वीजपुरवठा बंद झाला. दोन तास पुरवठा बंद होता. सकाळी एक फिडर बंद होते. त्यामुळे केवळ तासभर वीज नव्हती.-संदीप कुलकर्णी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, चिकलठाणा, महावितरण

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपातelectricityवीज