शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड तालुक्यात पाणीटंचाईचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:44 IST

५० रुपये ड्रम पाणी : २१९ टँकर सुरु; अजिंठ्यात २५ दिवसांपासून निर्जळी

श्यामकुमार पुरेसिल्लोड : तालुक्यात भर हिवाळ्यातच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून तब्बल ५८ गावांत १२९ टँकर सुरु आहेत. अजिंठागावात तर २५ दिवसांपासून निर्जळी आहे. गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. सर्वच बोअर, विहिरी आटल्या असून पैसे मोजूनही पाणी मिळत नाही. टँकरवाल्यांची खुशामत केल्यास मोठ्या मुश्किलीने ५० रुपये ड्रमने पाणी मिळत आहे. यामुळे अजिंठ्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे.तालुक्यातील केळगाव मध्यम प्रकल्प वगळता सर्वच मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. तालुक्यात एकूण १३१ गावे आहेत. यापैकी तब्बल ५८ गावे टँकरवर अवलंबून आहेत. १२९ पैकी ७० टक्के टँकर कन्नड तालुक्यातील नेवपूर मध्यम प्रकल्पातून भरून आणले जात आहेत. त्यामुळे कन्नड तालुक्याने सिल्लोड तालुक्याला संजीवनी दिल्याचे चित्र आहे.अजिंठागावात २५ दिवसांपासून निर्जळी असल्याने गावकरी हताश झाले आहेत. अजिंठा -अंधारी मध्यम प्रकल्प कोरडा आहे. या प्रकल्पातून अजिंठा, शिवना, मादनी, आमसरी, नाटवी या गावांना पाणीपुरवठा केला जातो. पण प्रकल्पात पाणीच नसल्याने नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. नळाला तब्बल २५ दिवसांपासून पाणी नाही.अजिंठा पंचक्रोशीतून मिळेल त्या विहिरीवरुन टँकरचालक पाणी भरून आणत आहेत. यामुळे पाण्याला सोन्याचा भाव आला आहे. ५ हजार लिटरचे टँकर तब्बल १२०० ते १५०० रूपयांना मिळत आहे. एक ड्रम पाणी ५० रुपयात मिळत आहे. तेही मागणी केल्यावर दोन दिवसानंतर पाणी मिळते.३२ वर्षात प्रथमच आटले प्रकल्पअजिंठा -अंधारी मध्यम प्रकल्प १९८६ मध्ये झाला. त्यानंतर तो कधीच आटला नव्हता. २०१७ मध्ये त्यात १७ टक्के पाणी आले होते. २०१८ मध्ये त्यात काहीच पाणी आले नाही. या प्रकल्पातून शेतीसाठी गेल्या २ वर्षात पाणी उपसा झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ३२ वर्षात हा प्रकल्प प्रथमच आटला आहे.अजिंठ्याला १० टँकर मंजूरअजिंठा गावाची लोकसंख्या २५ हजार आहे. यामुळे प्रशासनाने ३० हजार लीटर क्षमतेचे तब्बल १० टँकर व शिवन्यासाठी ८ टँकर मंजूर केले. पण केळगाव प्रकल्पात पाणी भरण्यासाठी केवळ एकच मोटर असल्याने जास्त टँकर भरत नाही. यासाठी नवीन पाईपलाईन टाकून जादा क्षमतेची मोटार बसविण्याच्या हालचाली ग्रामपंचायत व पंचायत समितीने सुरु केल्या आहेत. मात्र या प्रक्रियेला किमान सोमवार उजाडेल, तोपर्यंत अजिंठा व शिवना गावांची तहान भागणे शक्य दिसत नाही. प्रशासनाने तात्काळ युद्धपातळीवर कामे करुन नागरिकांची तहान भागवावी, अशी मागणी होत आहे.अजिंठा ग्रामपंचायतीचे सर्व प्रयत्न फोलअजिंठा येथील सरपंच दुर्गाबाई पवार, उपसरपंच शेख लुकमान, ग्रा.पं. सदस्य राजेश ठाकरे, समी चाऊस व सदस्यांनी प्रकल्पात चर मारून, गावात ठिकठिकाणी बोअर घेऊन बारव, विहिरींची साफसफाई करुन पाणीप्रश्न गावात मिटविण्याचा प्रयत्न केला, पण पाणी न लागल्याने प्रश्न सुटला नाही.कोट... दोन दिवसात मिळेल नळाला पाणीअजिंठा गावात प्रशासनाने ७ टँकरने पाणी पाठविले आहे. पण २ दिवसात केवळ ३ लाख ७० हजार लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. टाकी ६.५० लाख लीटरची आहे. पूर्ण भरल्याशिवाय प्रेशर मिळणार नाही. आणखी ३ लाख लीटर पाणी जमा झाल्यावर प्रेशरने गावात नळाला पाणी सोडण्यात येईल. दररोज १० टँकरच्या दोन खेपा पाणी मिळाल्यास १० ते १५ दिवसांआड सर्व नागरिकांना अर्धा तास नळाला पाणी मिळेल. टँकरचे पहिले पाणी सुटायला दोन दिवस व गावांचा पाणीपुरवठा सुरळीत व्हायला किमान १० ते १२ दिवस वाट बघावी लागणार आहे, अशी माहिती सरपंच दुर्गाबाई पवार, उपसरपंच शेख लुकमान, सदस्य राजेश ठाकरे, समी चाऊस यांनी दिली.

टॅग्स :water shortageपाणीकपातDamधरण