शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जलयुक्तच्या निधीचे अजूनही नियोजन नाही

By admin | Updated: December 17, 2015 23:48 IST

हिंगोली : जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या नियोजनासाठी वारंवार बैठका होत असल्या तरी प्रत्यक्षात गतवर्षी निवडलेल्या गावांत यंदा कोणती कामे घ्यायची, याचे अद्याप काहीच नियोजन नाही.

हिंगोली : जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या नियोजनासाठी वारंवार बैठका होत असल्या तरी प्रत्यक्षात गतवर्षी निवडलेल्या गावांत यंदा कोणती कामे घ्यायची, याचे अद्याप काहीच नियोजन नाही. गतवर्षीचे जवळपास १७ कोटी अजून शिल्लक आहेत. तर देवस्थानांचे दोन कोटी आहेत. हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त कामांना यंदा प्राधान्याने मागणी होत आहे. गतवर्षी काही भागात झालेल्या कामांमुळे या योजनेकडे ग्रामस्थ सकारात्मक दृष्टिकोनातून पाहात आहेत. यात पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध होणार आहे. पावसाचे पाणी अडल्याने निदान रबी हंगामासाठी तरी त्याचा उपयोग करणे शक्य होत आहे. ज्या गावांत गतवर्षी संख्येने व दर्जाने चांगली कामे झाली, अशा गावांतील शेतकऱ्यांना यंदा दुष्काळी स्थितीतही रबीचे पीक घेता येत आहे. गतवर्षी जलयुक्तसाठी २0.७९ कोटी मंजूर होते. त्यात जिल्हा नियोजनच्या विशेष निधीतील १0 टक्के याप्रमाणे ८ कोटी व पुन्हा ३.५ टक्के याप्रमाणे २.६५ कोटी रुपये मिळाले होते. या निधीपैकी मूळ तरतुदीतील २0.७९ कोटींपैकीच १४ कोटी खर्च झाले. उर्वरित निधीला हातही लावला नाही. यात कृषी विभागाने ४.७५, वन विभागाने ४.२0, जलसंधारण विभागाने ५ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर लघुसिंचनने ८0 लाखांत गाळ काढला होता. उर्वरित निधी मात्र खर्च झाला नाही. काही विभागांची कामे मंजूर आहेत. मात्र ती प्रगतीत आहेत. त्यानंतरच त्यांचा खर्च ग्राह्य धरता येणार आहे. तरीही जवळपास दहा ते बारा कोटींच्या कामांचे नियोजन करावे लागणार आहे. शिवाय शिर्डी व सिद्धिविनायक संस्थानने दिलेल्या दोन कोटी रुपयांचाही खर्च करणे बाकी आहे. वेळेत नियोजन न केल्यास यंदाही पहिले पाढे पंचावन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.