शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

जलयुक्तच्या निधीचे अजूनही नियोजन नाही

By admin | Updated: December 17, 2015 23:48 IST

हिंगोली : जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या नियोजनासाठी वारंवार बैठका होत असल्या तरी प्रत्यक्षात गतवर्षी निवडलेल्या गावांत यंदा कोणती कामे घ्यायची, याचे अद्याप काहीच नियोजन नाही.

हिंगोली : जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या नियोजनासाठी वारंवार बैठका होत असल्या तरी प्रत्यक्षात गतवर्षी निवडलेल्या गावांत यंदा कोणती कामे घ्यायची, याचे अद्याप काहीच नियोजन नाही. गतवर्षीचे जवळपास १७ कोटी अजून शिल्लक आहेत. तर देवस्थानांचे दोन कोटी आहेत. हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त कामांना यंदा प्राधान्याने मागणी होत आहे. गतवर्षी काही भागात झालेल्या कामांमुळे या योजनेकडे ग्रामस्थ सकारात्मक दृष्टिकोनातून पाहात आहेत. यात पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध होणार आहे. पावसाचे पाणी अडल्याने निदान रबी हंगामासाठी तरी त्याचा उपयोग करणे शक्य होत आहे. ज्या गावांत गतवर्षी संख्येने व दर्जाने चांगली कामे झाली, अशा गावांतील शेतकऱ्यांना यंदा दुष्काळी स्थितीतही रबीचे पीक घेता येत आहे. गतवर्षी जलयुक्तसाठी २0.७९ कोटी मंजूर होते. त्यात जिल्हा नियोजनच्या विशेष निधीतील १0 टक्के याप्रमाणे ८ कोटी व पुन्हा ३.५ टक्के याप्रमाणे २.६५ कोटी रुपये मिळाले होते. या निधीपैकी मूळ तरतुदीतील २0.७९ कोटींपैकीच १४ कोटी खर्च झाले. उर्वरित निधीला हातही लावला नाही. यात कृषी विभागाने ४.७५, वन विभागाने ४.२0, जलसंधारण विभागाने ५ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर लघुसिंचनने ८0 लाखांत गाळ काढला होता. उर्वरित निधी मात्र खर्च झाला नाही. काही विभागांची कामे मंजूर आहेत. मात्र ती प्रगतीत आहेत. त्यानंतरच त्यांचा खर्च ग्राह्य धरता येणार आहे. तरीही जवळपास दहा ते बारा कोटींच्या कामांचे नियोजन करावे लागणार आहे. शिवाय शिर्डी व सिद्धिविनायक संस्थानने दिलेल्या दोन कोटी रुपयांचाही खर्च करणे बाकी आहे. वेळेत नियोजन न केल्यास यंदाही पहिले पाढे पंचावन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.