शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रश्नाचा ‘कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:44 IST

शहरातील पाणी प्रश्नाने सोमवारी सर्वसाधारण सभेत पेट घेतला. तब्बल पाच तास वादळी चर्चा नगरसेवकांकडून करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्नाने सोमवारी सर्वसाधारण सभेत पेट घेतला. तब्बल पाच तास वादळी चर्चा नगरसेवकांकडून करण्यात आली. दूषित पाणी, वेळेवर पाणीपुरवठा नाही, अल्प दाबाने पाणीपुरवठा, मध्यरात्री होणारी पाण्याची पळवापळवी आदी अनेक मुद्यांचा ऊहापोह झाला. समांतर जलवाहिनीसाठी ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आल्याचा आरोपही अधिकाऱ्यांवर करण्यात आला. शेवटी महापौर नंदकुमार घोडेले यांनी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला. तीन दिवसांमध्ये सुधारणा न झाल्यास दोषी अधिका-यांवर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले. ढीम्म प्रशासनामुळे कचराकोंडीप्रमाणे आणखी दोन महिने पाण्याचा प्रश्नही तापत राहणार हे निश्चित.सोमवारी सकाळी सर्वसाधारण सभा सुरू होताच सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर हल्लाबोल केला. यामध्ये सिडको-हडको, चिकलठाणा आदी भागांतील नगरसेवक सर्वाधिक आघाडीवर होते. प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवकांनी त्यांनाही जुमानले नाही. गोंधळ वाढत गेल्याने दुपारी १२.३० वाजता सभा तहकूब करावी लागली. दुपारी १.५० वाजता परत सभेला सुरुवात झाली. पुन्हा नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून प्रशासनाची जोरदार कोंडी केली. शोभा बुरांडे, जयश्री कुलकर्णी, सीमा खरात, मनीषा मुंढे, ज्योती पिंजरकर, माधुरी अदवंत, संगीता वाघुले यांनी दूषित पाणी, अल्पवेळ पाणीपुरवठा आदी मुद्दे मांडले. सुरेखा सानप, मीना गायके, गजानन मनगटे, सीताराम सुरे यांनीही पाणी प्रश्नावर टीका केली. बापू घडामोडे यांनी या प्रश्नात मार्ग काढण्याचे आवाहन सभागृहाला केले. त्र्यंबक तुपे यांनी मनपाच्या टँकरमधून पाण्याची विक्री सुरू असल्याचा आरोप केला. पाच तासांच्या चर्चेनंतर शहरवासीयांना दिलासा देणारा कोणताही ठोस निर्णय झाला नाही.सेना-भाजपमध्ये वादनगरसेवक नितीन चित्ते यांनी सिडको-हडकोसाठी असलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीवरील क्रॉस कनेक्शनचा मुद्दा उकरून काढला. राजेंद्र जंजाळ यांनी त्वरित प्रत्युत्तर देऊन दहा वर्षांपासून हे क्रॉस कनेक्शन असल्याचे सांगून पाणी प्रश्नाला वेगळे वळण दिले.भाजपनेही याच मुद्यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांनी वेळीच हस्तक्षेप करून वादावर पडदा टाकला. पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीतून ५०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या मुद्यावर माधुरी अदवंत यांनी भाष्य केले. त्यावरून मनगटे, मीना गायके यांनी कडाडून विरोध दर्शविला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारण