शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

शेतकऱ्यांच्या जमिनीवर पाणी साठविले, मोबदल्याला मात्र ठेंगा, जमिनी पाण्याखाली, शेतकरी दारोदारी, कोट्यवधी रुपयांची थकबाकी सरकार कधी देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 06:05 IST

Farmer: जायकवाडी प्रकल्पासह इतर प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. त्यावर पाणी साठविले; मात्र अनेक वर्षांपासून माेबदल्यासाठी शेतकऱ्यांना ताटकळण्याची वेळ आली आहे.

- विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : जायकवाडी प्रकल्पासह इतर प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. त्यावर पाणी साठविले; मात्र अनेक वर्षांपासून माेबदल्यासाठी शेतकऱ्यांना ताटकळण्याची वेळ आली आहे. कोट्यवधी रुपयांची थकबाकी सरकार कधी देणार, असा प्रश्न असून कोर्टकचेरी, लवादात हेलपाटे मारून शेतकरी थकले आहेत.

पहिली, दुसरी पिढी तर मोबदल्यासाठी हेलपाटे मारून संपली आहे. मागील तीन वर्षांत प्रकरणे निकाली काढण्यासाठी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प, उपजिल्हाधिकारी कार्यालय प्रयत्न करीत आहेत. विभाग शासनाकडे अनुदान मागणी करीत असला तरी अनुदान तातडीने मिळत नसल्याचे दिसते आहे. वाढीव दराने रक्कम मिळावी, यासाठी न्यायालयात अनेकांनी धाव घेतली आहे. यातूनच जीएमआयडीसी, कडा, जिल्हाधिकारी कार्यालय खुर्ची व इतर साहित्य जप्तीची नामुष्की वारंवार ओढवते. 

मागील काही वर्षांमध्ये जायकवाडी प्रकल्पांतर्गत सरळ खरेदीने, भूसंपादन कायदा २०१३ नुसार शेतकऱ्यांकडून जमिनी घेण्यात आल्या. जप्ती, लोकअदालतमध्ये अजूनही तडजोडीची प्रकरणे सुरू असून न्यायालयातही अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. गंगापूर, वैजापूर, फुलंब्री, खुलताबाद  व इतर तालुक्यांतील १०० हून अधिक प्रकरणात अनुदान दिलेले नाही.

...अन् वारसांचे हेलपाटेवडील गेल्यानंतर शेतीच्या सातबाऱ्यावर मुलांची नावे लागली. परंतु, प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना वडिलांचे नाव पाटबंधारे व इतर विभागाच्या संचिकांमध्ये असल्यामुळे मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. 

न्यायप्रविष्ट प्रकरणांची संख्या अशी...उच्च न्यायालयातील प्रकरणे     रिट याचिका    २३    प्रतिज्ञापत्र संख्या    २१    अवमान याचिका    ९जिल्हा न्यायालयातील प्रकरणे    एकूण प्रकरणे    ५    प्रतिज्ञापत्र संख्या    ४

कमी-जास्त पत्रकांची संख्या ८२४ आहे. त्यातील ७४३ प्रकरणे सातबारावर घेतली आहेत. सरळ खरेदीच्या २७ प्रकरणांत कार्यवाही सुरू असून, नवीन भूसंपादन कायद्यानुसार ७ कोटी ६१ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वाटप केली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

निधी मागणी केलेली प्रकरणे  रोजगार हमी योजना    ६४ प्रकरणे    ₹४ कोटी ६२ लाख ८६ हजार ९६९रोहयो वगळून    ३६ प्रकरणे    ₹७ कोटी ७४ लाख ५७ हजार ९३७एकूण प्रकरणे    १०० प्रकरणे    ₹१२ कोटी ३३ लाख ७४ हजार ४९०न्यायालयात जमा केलेला निधी  :  ₹४ कोटी ६२ लाख ८६ हजार ९६९ 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणFarmerशेतकरी