शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाणीटंचाईचे संकट गडद; मनपा म्हणते आणखी १०० टँकर लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:48 IST

टँकरसाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मनपाचा प्रस्ताव

ठळक मुद्देसध्या ९४ सुरू; महापालिका टँकरसाठी देणार शासनाला प्रस्ताव३ ते ४ एमएलडी पाणी मिळविण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : शहरावर दुष्काळाची सावली गडद होत असून, पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. शहरातील अनेक वसाहतींत पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळ्याच्या तोंडावरच हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी टँकरसाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मनपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना प्रस्ताव देणार आहेत. 

महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत बुधवारी विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपायुक्त डी. पी. कुलकर्णी, वसंत निकम, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, अफसर सिद्दीकी, एम. बी. काझी, उपअभियंता के. एम. फालक आदींसह मनपा अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शहरातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी पाण्यासाठी नागरिकांची निवेदने येण्याचे प्रमाण वाढले आहे. मनपासमोर आंदोलनेदेखील होत आहेत. शहरात शंभरावर वसाहतीत जलवाहिनीचे जाळे नाहीत, अशा भागांमध्ये उन्हाळ्यात पाणीपुरवठा क रण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. 

दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावागावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. याचप्रमाणे शहरातही टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करावे अथवा निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यामार्फत हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला जाणार आहे. टँकरच्या माध्यमातून शहराला ३ ते ४ एमएलडी पाणी मिळविण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केला जात आहे. 

पाणीपुरवठ्यावरून महापौर नंदकु मार घोडेले यांना घेरण्याचा प्रयत्न २२ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत झाला होता. सभेच्या सुरु वातीलाच पाणीपुरवठ्यावर गदारोळ झाला. पाणी द्या नसता पाणीपट्टी घेऊ  नक ा, अशा शब्दांत नगरसेवक ांनी प्रशासनाला खडसावले. सात-आठ वर्षांपासून पाणीपट्टी मिळणाऱ्या भागावर प्रशासनाने ‘नो नेटवर्क’चा शिक्का मारू न जलवाहिन्यांची क ामे क ा रोखली, असा प्रश्न नगरसेवकांनी केला होता. त्यानंतर महापालिकेने टँकरसाठी प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली आहे. 

आपत्कालीन पंप सुरू करणारजायकवाडीतील पाण्याची परिस्थितीही गंभीर झाली आहे. सध्या पाणी उपलब्ध असले तरीही याठिकाणी आपत्कालीन पंप सुरूकरावे लागणार आहे, त्याची महापालिकेकडून तयारी केली जात आहे. त्यासाठी लवकरच १९ लाखांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

टँकरवर राहणार मदारशहरात सध्या ९४ टँकर सुरूआहेत. प्रत्येक टँकर ७ ते ८ फेऱ्या मारतात. अशाप्रकारे टँकरच्या सहाशेवर फेऱ्या होतात. शहरात उन्हाळ्यात आणखी किमान १०० टँकर लागणार आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची टँकरवरच मदार राहणार आहे.

‘एमआयडीसी’कडून हवे ४ एमएलडी पाणी‘एमआयडीसी’च्या जलवाहिनीद्वारे मनपाला पाणी घ्यावे लागणार आहे. त्यासाठीदेखील मनपा उद्योगमंत्र्यांना प्रस्ताव देणार आहे.  निशांत पार्क, पीडब्ल्यूडी कॉलनी, शिवकृपा कॉलनी, राजगुरूनगरसह बीड बायपास परिसरातील वसाहतींसाठी ४ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ‘एमआयडीसी’ला पत्र देण्यात आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार