शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

जायकवाडीकडे येणाऱ्या पाण्याला नगरमध्येच फुटल्या अनेक वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:20 IST

निळवंडेतून पाणी सोडल्याच्या तिसऱ्या दिवशीही पाणी नेवाशापर्यंत पोहोचलेले नव्हते. 

ठळक मुद्देजायकवाडीच्या पाण्याची सुरु आहे पळवापळवी निळवंडेतून तीन दिवसापूर्वी सुटलेले पाणी नेवाशातही पोचले नाही

औरंगाबाद :  न्यायालयाच्या आदेशानंतर वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्यात येत आहे; मात्र अहमदनगर जिल्ह्यात कालव्याद्वारे पाण्याला दुसरीकडे वळविण्यात येत आहे. त्यामुळे निळवंडेतून पाणी सोडल्याच्या तिसऱ्या दिवशीही पाणी नेवाशापर्यंत पोहोचलेले नव्हते. 

कालव्याद्वारे पाणी वळविण्यासह बंधाऱ्यातही अडविले जात आहे. कमीत कमी पाणी पुढे जावे यासाठी मध्ये इतक्या ‘वाटा’ निर्माण करून ठेवल्या आहेत की, जायकवाडीत पाणी किती येईल, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. भंडारदऱ्यातून १ हजार ५४७ क्युसेकने निळवंडेत पाणी सोडण्यात आले होते, तर निळवंडेतून बुधवारी २ हजार क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात आले होते. शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही निळवंडेतून २ हजार क्युसेक विसर्ग सुरूच होता; पण कालव्यातून पाणी दुसरीकडे वळविण्यात येत असल्याने पाणी पुढे सरकत नव्हते.

ओझर बंधाऱ्यातून गुरुवारी पाण्याचा विसर्ग वाढून १४७६ क्युसेक करण्यात आला होता; मात्र शुक्रवारी पुन्हा ७६ क्युसेकने पाणी कमी सोडण्यात आले. त्यामुळे दिवसभरात केवळ १४०० क्युसेक विसर्ग करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, कालवा गुरुवारी रात्री बंद करण्यात येईल व शुक्रवारी नेवासा येथे पाणी पोहोचेल; पण प्रत्यक्षात शुक्रवारी डावा कालवा बंद करण्यात आला नाही. आजही डाव्या कालव्यातून पाणी वाहतच राहिले. ओझर बंधाऱ्यातून सोडण्यात येणारे पाणी खालील बंधाऱ्यांत अडविण्यात येत होते.  कालव्यात सोडलेल्या पाण्यासह ठिकठिकाणी पाण्याच्या चोरीची शक्यताही आहेच. यामुळे प्रत्यक्षात जायकवाडीला किती पाणी येते, हे निश्चित सांगणे कठीण आहे.

‘थर्ड पार्टी आॅडिट’ची मागणीन्यायालयाचे आदेश असतानाही जायकवाडीच्या हक्काचे पाणी ठरवून दिलेल्या प्रमाणात पोहोचत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आता वरच्या धरणांतून सोडलेल्या पाण्याचे व प्रत्यक्षात जायकवाडीत आलेल्या पाण्याचे थर्ड पार्टी आॅडिट करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAhmednagarअहमदनगरNashikनाशिक