शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बाटलीद्वारे झाडांना पाणी; वनीकरण विभागाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:07 IST

तालुक्यातील पाथ्री येथील उद्यानात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने झाडे जगविण्यासाठी रिकाम्या पाणी बाटलीच्या मदतीने थेट झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचविले आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असून, बाष्पीभवनही रोखण्यास मदत होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : तालुक्यातील पाथ्री येथील उद्यानात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने झाडे जगविण्यासाठी रिकाम्या पाणी बाटलीच्या मदतीने थेट झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचविले आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असून, बाष्पीभवनही रोखण्यास मदत होत आहे.फुलंब्री तालुक्यातील पाथ्री परिसरात स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान सुमारे १३ हेक्टर क्षेत्रात पसरले आहे. या उद्यानात ६ हजार विविध प्रकारची झाडे आहेत. त्यात जांभूळवन, वनौषधी, बांबूवन आदींचा समावेश आहे. ही झाडे जगविण्याची जबाबदारी येथील सामाजिक वनीकरण विभागाची आहे.सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पुरेसे पाणी मिळत नसल्याने सर्व झाडे जगविणे कठीण झाले होते. मात्र, आता झाडांना बाटलीद्वारे पाणी देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल डब्ल्यू. ए. काझी यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने उद्यानामधील सर्व महत्त्वाच्या झाडाला पाणी देण्याची नवीन पद्धत सुरूकेली.झाडांपर्यंत ठिबक पाईपद्वारे पाणी आणले. त्या पाईपलाईनचे पाणी सरळ झाडाला न टाकता ते रिकामी पाण्याची बाटली उलटी करून झाडाच्या मुळापर्यंत लावण्यात आली. या बाटलीमध्ये खडी भरली तसेच त्यात ठिबक पाईपचे पाणी टाकले. यामुळे ठिबकचे पाणी थेट झाडाच्या मुळाशी जाणार असून त्याचे बाष्पीभवन होणार नाही. परिणामी पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी वनपाल जे. टी. आहेर, वनपाल पी. एम. बेर्डे, वनपाल के. एम. फुले, वनपाल आर. एस. देहेडे, राजश्री शाहू विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. जाधव, प्रा. ज्ञानेश्वर पाथ्रीकर, डॉ. शिवाजी उंबरहंडे, डॉ. मोटे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :forest departmentवनविभागNatureनिसर्ग