शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

उशिरापर्यंत रील्स, वेब सिरीज पाहताय? वेळीच सावध व्हा, एपिलेप्सी आजाराचा धोका

By संतोष हिरेमठ | Updated: February 27, 2024 19:29 IST

एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यात मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतात.

छत्रपती संभाजीनगर : बदलती जीवनशैली, अपुरी झोप, तणाव, असंतुलित आहार यामुळे अपस्मार अर्थात एपिलेप्सी आजाराचा धोका वाढतो. उशिरापर्यंत स्क्रीनवर वेब सिरीज पाहणे, रील्स पाहणे यामुळे एपिलेप्सीचे रुग्ण वाढत असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वेळीच सावध झालेले बरे.

एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यात मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतात. ज्यामुळे रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बऱ्याचदा रुग्णाची शुद्ध हरपते. फिट येणे हे या आजाराचे प्राथमिक लक्षण आहे. यात अनेकदा रुग्णाची स्मरणशक्ती कमी होऊ शकते. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा आजार होऊ शकतो.

काय आहे एपिलेप्सी किंवा अपस्मार आजार?मेंदूची क्रिया म्हणजे एक प्रकारची विद्युत लहर असते. ही विद्युत लहर अनियंत्रित झाल्यास रुग्णाच्या हात, पायांची विचित्र हालचाल होऊन बेशुद्ध होतो. याला झटका आला असे म्हणतो. वारंवार असे झटके येणे म्हणजे एपिलेप्सी किंवा अपस्मार होय.

कोणत्या सवयी पडू शकतात महाग?उशिरापर्यंत वेब सिरीज पाहणे : रात्री उशिरापर्यंत चित्रपट, वेब सिरीज पाहण्यावर अनेकांचा भर असतो. यातूनच जागरण होते.

मोबाइल स्क्रीनवर उशिरापर्यंत राहणे : सामाजिक माध्यमांवर सक्रिय राहण्यासाठी उशिरापर्यंत मोबाइलचा वापर केला जातो.अपुरी झोप घेणे : उशिरापर्यंत जागरण केल्यानंतरही लवकर उठावे लागते. त्यातून अपुरी झोप होते. यातूनच एपिलेप्सीचा धोका वाढतो.

काय काळजी घ्याल?झोपेच्या वेळा पाळा : झोपेच्या वेळा पाळल्या पाहिजेत. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे, हे आरोग्यदायी ठरते.स्क्रीन टाइम कमी करा : मोबाइलचा वापर कमी करण्यावर भर द्यावा. त्यातून स्क्रीन टाइम कमी होण्यास मदत होईल. रात्री वेब सिरीज नकोच : रात्री उशिरापर्यंत वेब सिरीज पाहणे, सोशल मीडियावर सक्रिय राहणे टाळावे.

झोपेपूर्वी मोबाइल नकोचआजच्या काळात मोबाइल, संगणक यांचा वापर करावाच लागतो. परंतु झोपेच्या दोन तास आधी आणि सकाळी उठल्यावर एक तास मोबाइल वापरू नये. पलंगावर मोबाइल घेऊन झोपू नये. हे काही अशक्य नाही.- डाॅ. मकरंद कांजाळकर, न्यूरो फिजिशियन

टॅग्स :MobileमोबाइलHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद