शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वाळूज उद्योगनगरीतील कचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 12:19 IST

कचरा, सांडपाणी व्यवस्थापनाकडे एमआयडीसीने लक्ष न दिल्यामुळे हे दोन्ही प्रश्न उद्योजकांसाठी डोकेदुखी ठरत होते.

ठळक मुद्देकचरा कोंडीतून उद्योजकांसह नागरिकांची होणार सुटका१७ कोटींतून उभारला प्रकल्प

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूज उद्योगनगरीतील सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याने उद्योजक व नागरिकांची कचरा कोंडीतून कायमस्वरूपी सुटका होणार आहे. 

वाळूज उद्योगनगरीचा झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र, कचरा, सांडपाणी व्यवस्थापनाकडे एमआयडीसीने लक्ष न दिल्यामुळे हे दोन्ही प्रश्न उद्योजकांसाठी डोकेदुखी ठरत होते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी एमआयडीसीने सांडपाण्यासाठी एसटीपी प्रकल्प उभारला आहे; परंतु कचऱ्याचा प्रश्न अजूनही सुटू शकलेला नाही. कचरा व्यवस्थापनाची सोय नसल्याने या परिसरातील उद्योजक एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर तसेच बंद पडलेल्या कारखान्यात कचऱ्याची विल्हेवाट लावत आहेत.

याचबरोबर लगतच्या ग्रामपंचायतीही नागरी वसाहतीतून जमा झालेला कचरा बीकेटी कंपनीच्या पाठीमागील खदानीत खुलेआम टाकत आहे. बऱ्याचदा कचऱ्यामुळे आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे उद्योगनगरीतील कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उद्योजक संघटना व स्थानिक ग्रामपंचायतींनी एमआयडीसीकडे याचा पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर एमआयडीसीने कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वर्षभरापूर्वी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा या कंपनीशी करार करून कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प हाती घेतला.

गतवर्षी मार्च महिन्यात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. आजघडीला या प्रकल्पाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. आगामी एक ते दीड महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या भागातील उद्योजकांसह नागरिकांची कचरा कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. याविषयी एमआयडीसीचे अभियंता बी. एस. दिपके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, एप्रिलमध्ये हा प्रकल्प सुरूहोईल.

१७ कोटींतून उभारला प्रकल्पऔद्योगिक क्षेत्रातील मायलॉन कंपनीसमोरील एमआयडीसीच्या पी-१८३ या मोकळ्या भूखंडावर हा प्रकल्प उभारला जात आहे. बीओटी तत्त्वावरील या प्रकल्पासाठी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा या कंपनीकडून १६ कोटी ७० लाख रुपये खर्च केला जात आहे. यासाठी एमआयडीसीने ३ हेक्टर १८ गुंठे जमीन कंपनीला उपलब्ध करून दिली आहे. संबंधित कंपनीकडून उद्योगनगरीतील १५ मेट्रिक टन व नागरी वसाहतीतील १६ मेट्रिक टन असा एकूण ३१ मेट्रिक टन सुका व ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत व बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे कुठलेही शुल्क न आकारता मोफत कचरा संकलन केले जाणार असून, सेंद्रिय खत व गॅसची उद्योजक व ग्राहकांना विक्री केली जाणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नWaluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद