शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

महापालिकेसाठी प्रभाग रचना; दिग्गज नगरसेवक डेंजर झोनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 19:11 IST

संभाव्य धोका लक्षात घेऊन मातब्बराची अक्षरश: झोपच उडाली आहे. 

ठळक मुद्देउपायुक्तांकडे होणार कामकाज

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मनपाच्या निवडणूक विभागाने प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू केले. अचानक उपायुक्त मंजूषा मुथा यांनी सर्व कामकाज आपल्याकडे मागवून घेतले. त्यामुळे विद्यमान १० पेक्षा अधिक दिग्गज नगरसेवक डेंजर झोनमध्ये अडकण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. १९ नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग रचनेचा स्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा २१ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि मनपा आयुक्त असलेल्या समितीला सादर करावयाचा आहे. आराखडा तयार करण्यासाठी अवघे चारच दिवस शिल्लक आहेत. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने आराखड्याला मंजुरी देताच २७ नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडे कोणत्याही परिस्थितीत आराखडा पाठवावा लागणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी मनपाच्या निवडणूक विभागात चार स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी या कामासाठी नियुक्त करण्यात आले. 

मनपाचे अधिकारी विद्यमान नगरसेवकांच्या सोयीनुसार प्रभाग रचना तयार करतील, अशी शंका उपायुक्त मंजूषा मुथा यांना आली. त्यांनी कर्मचाऱ्यांकडून दोन वेगवेगळे प्रारूप आराखडे तयार करून घेतले. त्यानंतर सर्व कामकाज आपण बघणार असल्याचे सांगितले. अंतिम आराखडा नेमका कसा तयार होतो हे आता मनपा कर्मचाऱ्यांनाही माहीत नाही. स्वत: उपायुक्त मुथा हा आराखडा तयार करणार असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रक्रियेमुळे मनपातील सत्ताधारी आणि विद्यमान नगरसेवक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. प्रत्येकाला आपल्या सोयीनुसार प्रभाग हवा आहे. नियमानुसार असे करता येत नाही. नियमानुसार प्रभाग रचना करायची म्हटले तर दहापेक्षा अधिक दिग्गज नगरसेवक मोठ्या संकटात सापडणार आहेत. पुन्हा सभागृहात येण्याचे त्यांचे स्वप्न भंगणार आहे. सत्ताधारी, नगरसेवकांमधील खदखद आता हळूहळू वाढू लागली आहे. १९ नोव्हेंबरला तातडीची सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. वेगळ्या पद्धतीने याचा स्फोट होण्याची शक्यता मनपा वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. 

एकाच वॉर्डात अनेक मातब्बरप्रभाग रचना नियमानुसार करायची म्हटले तर जालना रोडजवळील एका प्रभागात तीन मातब्बर नगरसेवक येत आहेत. प्रभागातील चार वॉर्डांमधील दोन महिलांसाठी राखीव राहील. एक अनुसूचित जातीसाठी राखीव होणार आहे. उरलेल्या एकाच खुल्या प्रवर्गातील वॉर्डात तीनपेक्षा अधिक मातब्बर एकमेकांच्या विरोधात निवडणूक कशी काय लढवू शकतील? हा संभाव्य धोका लक्षात घेऊन मातब्बराची अक्षरश: झोपच उडाली आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद