शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

वाळूज ते चिकलठाणा उड्डाणपुलाला लागणार दोन हजार कोटी; डीपीआरसाठी केंद्राकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 17:18 IST

नाशिक, नागपूरमध्ये अशा प्रकारे पुलांची उभारणी झालेली आहे. त्या धर्तीवर औरंगाबादेत निर्णय झाल्यास मराठवाड्याच्या राजधानीचे भाग्य फळफळेल.

औरंगाबाद : वाळूज ते चिकलठाणा असा २० किलोमीटर लांबीचा एकच उड्डाणपूल उभारण्याचे सूतोवाच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी गुरुवारी लातूर येथील कार्यक्रमात केले. अंदाजे दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पाच्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्थानिक प्रकल्प कार्यालयाकडून ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्यावर काहीही निर्णय झालेला नाही.

विमानतळासमोरील उड्डाणपूल बांधणीबाबत अजून तळ्यात-मळ्यात सुरू आहे. तो पूल बांधण्याचा निर्णय रद्द झाल्यास हा २० किमी लांबीचा प्रस्तावित उड्डाणपूल उभारणीसाठी गती मिळू शकते. हा पूल झाल्यास औरंगाबादचे रूपडे बदलून जाईल. वाळूज ते डीएमआयसी मधील सर्व उद्योग वसाहती कनेक्ट होतील. दळणवळणाचा मोठा ताण संपून जाईल. नाशिक, नागपूरमध्ये अशा प्रकारे पुलांची उभारणी झालेली आहे. त्या धर्तीवर औरंगाबादेत निर्णय झाल्यास मराठवाड्याच्या राजधानीचे भाग्य फळफळेल.

प्रकल्प संचालकांची माहिती अशी,नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सांगितले, डीपीआर तयार करण्याचा प्रस्ताव ऑक्टोबर महिन्यात प्रादेशिक कार्यालयामार्फत केंद्रीय खात्याकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप काहीही अभिप्राय आलेला नाही.

डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर काय होईलसर्वेक्षण करण्याची तयारी सुरू होईल :पूर्ण २० किमी लांबीचा पूल उभारणीसाठी जागा किती लागेल. मालमत्ता बाधित होतील काय, याची माहिती त्यात येईल.

प्रकल्प अहवाल समोर येईल :पूर्ण प्रकल्प कसा असेल, त्यातील तांत्रिक बाबी कशा असतील, याची सगळी माहिती त्यात असेल.

सध्या असलेल्या पुलांचे काय :सध्या चिकलठाणा ते वाळूज या अंतरात छावणी, महावीर चौक, क्रांती चौक, मोंढानाका, सेव्हन हिल्स, सिडको उड्डाणपुलांचा समावेश आहे. २०० कोटींच्या आसपासचा खर्च या पुलांवर झाला आहे.

या पुलासाठी किती खर्च येईल :या पुलासाठी १०० कोटी प्रतिकिलोमीटर खर्च अपेक्षित आहे. २० किलोमीटरच्या अंतरासाठी साधारणतः दोन हजार कोटी रुपये लागू शकतील. यात भूसंपादन व इतर बाबींचा समावेश नाही. तसेच पुलाच्या कामाला जेवढा कालावधी लागेल, त्या त्या वर्षांतील कच्च्या मालाच्या वाढीव दराचा त्यात समावेश नसेल.

पूल कसा असेल हे डीपीआरनंतर स्पष्ट होईल :२० किमी लांबीचा पूल कसा उभारला जाईल. त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर कसे असेल, त्यातील अर्थवर्क किती करावे लागेल. याचे डिझाइन डीपीआरनंतर समोर येईल. डीपीआर मंजूर झाल्यानंतर पुलाच्या कामासाठी आर्थिक तरतुदीचा मुद्दा असेल. त्यानंतर निविदा मागविण्यात येतील.

जालना रोडच्या डीपीआरचे काय झाले२०१७ मध्ये जालना रोडचा डीपीआर तयार करून मंजुरीसाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे पाठविला. दहा पदरी रस्त्यात सहा पदर हे वाहतुकीसाठी, त्यात दोन्ही बाजूंची द्विपदरी जागा सर्व्हिस रोडसाठी होती. ४७३ कोटींचा तो डीपीआर चार वर्षांपासून तसाच पडला. शेवटी रद्द झाला; परंतु केंद्राने त्यासाठी निधी दिला नाही. त्या रोडचीही घोषणा २०१५ साली केंद्रीय मंत्री गडकरी यांनीच केली होती. सोबत बीड बायपासचीदेखील घोषणा होती. ८०० कोटींचे ते दोन प्रकल्प होते. त्यातून फक्त ७३ कोटी मिळाले. त्यातून सध्या ओव्हरब्रीज, साइडड्रेन, पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. विमानतळासमोर उड्डाणपूल याच ७३ कोटींतून बांधण्यात येणार आहे; परंतु २० किमीच्या एकाच पुलाच्या घोषणेमुळे त्या पुलाचे काम अडकले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAurangabadऔरंगाबाद