शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोट्यवधींच्या उत्पन्नानंतरही प्रवाशांना सुविधांची ‘वेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:11 IST

कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही प्रवाशांना सोयी-सुविधांसाठी नुसती ‘वेटिंग’ करावी लागत असल्याची ओरड होत आहे.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने गेल्या वर्षभरात तब्बल ४८६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. गतवर्षीपेक्षा ६.६० टक्क्यांनी यंदा उत्पन्न वाढले आहे. मात्र, कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही प्रवाशांना सोयी-सुविधांसाठी नुसती ‘वेटिंग’ करावी लागत असल्याची ओरड होत आहे.

भारतात पहिल्यांदा १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणेदरम्यान रेल्वे धावली. हा क्षण लक्षात घेऊन भारतीय रेल्वे दरवर्षी रेल्वे सप्ताह साजरा करते. नांदेड विभागात मंगळवारी हा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी यानिमित्ताने नांदेड विभागाच्या वर्षभरातील कामगिरीची माहिती दिली. वर्षभरात केवळ प्रवासी वाहतुकीतून ३६८.५० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा हे ७.७७ टक्क्यांनी अधिक आहे. नांदेड विभागात तिकीट तपासणीतून ६.७१ कोटींचा महसूल मिळाला आहे. तब्बल ४२६ लाख रेल्वे प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. तर १.६३ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

नॉन इंटर लॉक वर्किंग करून मुदखेड ते मुगट आणि मालटेकडी-नांदेड-लिंबगावदरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता परभणी-मनमाड दुहेरीकरणाला किमान २०२२ उजाडणार आहे.रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले, कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुकुंदवाडी, लासूर स्टेशनला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, उत्पन्न घेतल्यानंतर त्या बदल्यात प्रवाशांना सुविधा दिल्या पाहिजे. मुकुं दवाडी येथे प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे नाहीत, पिण्याचे पाणीही मिळत नाही. मॉडेल रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे कामही रेंगाळले आहे.

मुंबईसाठी रेल्वे मिळेनाशहरातून मुंबईला जनशताब्दी, देवगिरी, नंदीग्राम आणि तपोवन एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. या रेल्वेमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नव्या रेल्वेची मागणी होत आहे. परंतु मुंबईतील रेल्वेगाड्यांच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेकडून परवानगी मिळत नाही, असेच सांगितले जाते. 

पीटलाईन अडगळीतपीटलाईन नसल्याच्या कारणानेही औरंगाबादहून नव्या रेल्वे सुरू होण्यास अडचण असल्याचे सांगितले जाते. प्रवासी संघटनांकडून मागणी करूनही पीटलाईनचा प्रस्ताव अडगळीत पडला आहे. जुन्या रेल्वेस्टेशनच्या इमारतीच्या विकासाचीही नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे