शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

लातूरच्या डाळ मिलला तुरीची प्रतीक्षा

By admin | Updated: November 3, 2016 01:35 IST

लातूर :जिल्ह्यातील डाळ उद्योगाची गती मंदावली

लातूर : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांसह उद्योगांनाही सोसाव्या लागल्या. अल्प पर्जन्यमानामुळे तुरीसह सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. परिणामी, जिल्ह्यातील डाळ उद्योगाची गती मंदावली असून, तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या मिल केवळ एका शिफ्टमध्ये सुरू आहेत. या डाळ मिलला नवीन येणाऱ्या तुरीची प्रतीक्षा आहे. देशासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डाळ उपलब्ध करून देणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे. जिल्ह्यात सुमारे शंभर डाळ मिल असून, एकट्या लातुरात ७० ते ७५ डाळ मिलची संख्या आहे. या डाळ मिलमध्ये तीन शिफ्टमध्ये डाळ प्रक्रिया सुरू होती. गतवर्षी अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. याचा परिणाम डाळ उद्योगावर झाला. मार्च २०१६ पासून तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या डाळ मिल केवळ एकाच शिफ्टमध्ये चालू लागल्या. सध्या तुरीची तुरळक आवक असल्याने एका शिफ्टमध्येच प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पीकपाणी चांगले असल्याने तुरीचा उतारा चांगला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी, तुरीची आवक सरासरीपेक्षा २५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)