शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दमदार पावसाची प्रतीक्षा;जायकवाडीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 16:38 IST

Jayakwadi Dam : नाशिक आणि गोदावरी खोऱ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जायकवाडीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्केच साठा आहे.

ठळक मुद्देउपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण कमी

औरंगाबाद : जायकवाडी धरणात सध्या ४१.९४ टक्के जलसाठा असून मागील वर्षाच्या तुलनेत हा जलसाठा फक्त ५० टक्के इतका आहे. ऑगस्ट महिना संपत आला असून सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. या काळात जर धरणक्षेत्रात दमदार पाऊस बरसला नाही तर पुढील वर्षातील पाणीवापर, वाटप आणि नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरणात एकूण ४२ योजनांना पाणीपुरवठा केला जातो. सोबत पिण्याचे, उद्योगांचे पाणी आरक्षित आहे. त्यातच आता ब्रह्मगव्हाण योजनेसाठी देखील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. असे असताना जायकवाडीत यंदाच्या पावसाळ्यात मुबलक पाणीसाठा आलेला नाही. नाशिक आणि गोदावरी खोऱ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जायकवाडीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्केच साठा आहे.

मागील वर्षी धरणात ८६.८९ टक्के जलसाठा होता. त्यातील १८६४ दशलक्ष घनमीटर पाणी उपयुक्त साठ्यातील होते. यावर्षी ९१० दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. मागीलवर्षी आजच्या तारखेपर्यंत धरणक्षेत्रात ६२७ मि.मी. पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून आजपर्यंत ४५३ मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी धरणांतील साठ्याचा टक्का वाढला नाही. जायकवाडीची पूर्ण पाणीपातळी ४६३ मीटर आहे. उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण २१७० दलघमी आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस