शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

दमदार पावसाची प्रतीक्षा;जायकवाडीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 16:38 IST

Jayakwadi Dam : नाशिक आणि गोदावरी खोऱ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जायकवाडीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्केच साठा आहे.

ठळक मुद्देउपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण कमी

औरंगाबाद : जायकवाडी धरणात सध्या ४१.९४ टक्के जलसाठा असून मागील वर्षाच्या तुलनेत हा जलसाठा फक्त ५० टक्के इतका आहे. ऑगस्ट महिना संपत आला असून सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. या काळात जर धरणक्षेत्रात दमदार पाऊस बरसला नाही तर पुढील वर्षातील पाणीवापर, वाटप आणि नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरणात एकूण ४२ योजनांना पाणीपुरवठा केला जातो. सोबत पिण्याचे, उद्योगांचे पाणी आरक्षित आहे. त्यातच आता ब्रह्मगव्हाण योजनेसाठी देखील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. असे असताना जायकवाडीत यंदाच्या पावसाळ्यात मुबलक पाणीसाठा आलेला नाही. नाशिक आणि गोदावरी खोऱ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जायकवाडीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्केच साठा आहे.

मागील वर्षी धरणात ८६.८९ टक्के जलसाठा होता. त्यातील १८६४ दशलक्ष घनमीटर पाणी उपयुक्त साठ्यातील होते. यावर्षी ९१० दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. मागीलवर्षी आजच्या तारखेपर्यंत धरणक्षेत्रात ६२७ मि.मी. पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून आजपर्यंत ४५३ मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी धरणांतील साठ्याचा टक्का वाढला नाही. जायकवाडीची पूर्ण पाणीपातळी ४६३ मीटर आहे. उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण २१७० दलघमी आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस