शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

दमदार पावसाची प्रतीक्षा;जायकवाडीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 16:38 IST

Jayakwadi Dam : नाशिक आणि गोदावरी खोऱ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जायकवाडीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्केच साठा आहे.

ठळक मुद्देउपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण कमी

औरंगाबाद : जायकवाडी धरणात सध्या ४१.९४ टक्के जलसाठा असून मागील वर्षाच्या तुलनेत हा जलसाठा फक्त ५० टक्के इतका आहे. ऑगस्ट महिना संपत आला असून सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. या काळात जर धरणक्षेत्रात दमदार पाऊस बरसला नाही तर पुढील वर्षातील पाणीवापर, वाटप आणि नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरणात एकूण ४२ योजनांना पाणीपुरवठा केला जातो. सोबत पिण्याचे, उद्योगांचे पाणी आरक्षित आहे. त्यातच आता ब्रह्मगव्हाण योजनेसाठी देखील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. असे असताना जायकवाडीत यंदाच्या पावसाळ्यात मुबलक पाणीसाठा आलेला नाही. नाशिक आणि गोदावरी खोऱ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जायकवाडीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्केच साठा आहे.

मागील वर्षी धरणात ८६.८९ टक्के जलसाठा होता. त्यातील १८६४ दशलक्ष घनमीटर पाणी उपयुक्त साठ्यातील होते. यावर्षी ९१० दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. मागीलवर्षी आजच्या तारखेपर्यंत धरणक्षेत्रात ६२७ मि.मी. पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून आजपर्यंत ४५३ मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी धरणांतील साठ्याचा टक्का वाढला नाही. जायकवाडीची पूर्ण पाणीपातळी ४६३ मीटर आहे. उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण २१७० दलघमी आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस