शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तीन महिने उलटले तरीही औरंगाबाद-उदयपूर विमानसेवेची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:58 IST

उडान योजनेंतर्गत जेट एअरवेजला झाला होता मार्ग जाहीर

औरंगाबाद : नागरी उड्डयन मंत्रालयाने ‘उड़े देश के आम नागरिक’च्या (उडान) तिसऱ्या फेरीत जानेवारीत महाराष्ट्रात विविध मार्गांना मान्यता दिली आहे. यामध्ये जेट एअरवेजलाऔरंगाबाद-उदयपूरमार्ग जाहीर करण्यात आला; परंतु जेट एअरवेज कंपनीतील अंतर्गत संकटामुळे या विमानसेवेची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. 

औरंगाबादमधून पूर्वी जयपूर- उदयपूरसाठी हवाई कनेक्टिव्हिटी होती. त्यामुळे शहरात जयपूर- उदयपूरहून येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या होती. औरंगाबादला आल्यानंतर जगप्रसिद्ध अजिंठा- वेरूळ लेणीला पर्यटक भेट देत. त्यातून पर्यटन व्यवसायदेखील वाढत असे; परंतु ही विमानसेवा बंद झाली आणि पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला. औरंगाबादहून- उदयपूर- जयपूर ही विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी शहरातील उद्योजक आणि पर्यटन व्यावसायिकांकडून गेली काही वर्षे करण्यात येत होती. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांच्याकडून औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

जानेवारीत ‘उडान’मध्ये औरंगाबाद-उदयपूर विमान मार्गाचा समावेश करण्यात आला. हा मार्ग आता जेट एअरवेजला देण्यात आला. त्यामुळे त्यांच्याकडून लवकरच या मार्गावर विमानसेवा सुरूहोईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; परंतु जेट एअरवेजच्या सध्याच्या परिस्थितीमुळे हे विमान नजीकच्या काळात सुरू होण्याची शक्यता नाही. यासंदर्भात विमानतळाच्या संचालकांनी टष्ट्वीटदेखील केले आहे.

स्पाईस जेटकडून विचारस्पाईस जेटकडून औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. विशेषत: ‘उडान’अंतर्गत बुद्धिस्ट सर्किटसाठी हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची आशा चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळJet Airwaysजेट एअरवेजAurangabadऔरंगाबाद