शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

शिष्यवृत्तीच्या ६५ लाख निधीची प्रतीक्षा

By admin | Updated: July 15, 2016 01:07 IST

औरंगाबाद : गेल्या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी शासनाकडून अद्यापही निधी मिळालेला नाही.

औरंगाबाद : गेल्या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी शासनाकडून अद्यापही निधी मिळालेला नाही. जवळपास ६५ लाख रुपयांच्या निधीची प्रतीक्षा जि. प. समाजकल्याण विभागाला आहे. यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांनी दिली. प्राथमिक शाळांमधील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने इयत्ता पाचवी ते सातवीमधील मुलींसाठी १९९५-९६ पासून शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. त्याच धर्तीवर आठवी ते दहावीमधील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने २००३-०४ वर्षांपासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार इयत्ता पाचवी ते सातवीमधील सर्व मागासवर्गीय मुलींसाठी प्रती वर्ष ६०० रुपये, तर आठवी ते दहावीच्या सर्व मागासवर्गीय मुलींना प्रती वर्ष १००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने शिष्यवृत्तीचा कालावधी धरला जातो. गेल्या शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलींना शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात आली; पण विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलींच्या शिष्यवृत्तीचा जवळपास ६५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून अद्यापही मिळालेला नाही. यासंदर्भात जि. प. समाजकल्याण विभागाने शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. अशातच यंदा आठवी ते दहावीच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरित करण्याचा अधिकार जि. प. समाजकल्याण विभागाला प्रदान करण्यात आला आहे. आतापर्यंत या मुलींना राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जात होती.