शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

शिष्यवृत्तीच्या ६५ लाख निधीची प्रतीक्षा

By admin | Updated: July 15, 2016 01:07 IST

औरंगाबाद : गेल्या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी शासनाकडून अद्यापही निधी मिळालेला नाही.

औरंगाबाद : गेल्या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी शासनाकडून अद्यापही निधी मिळालेला नाही. जवळपास ६५ लाख रुपयांच्या निधीची प्रतीक्षा जि. प. समाजकल्याण विभागाला आहे. यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांनी दिली. प्राथमिक शाळांमधील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने इयत्ता पाचवी ते सातवीमधील मुलींसाठी १९९५-९६ पासून शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. त्याच धर्तीवर आठवी ते दहावीमधील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने २००३-०४ वर्षांपासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार इयत्ता पाचवी ते सातवीमधील सर्व मागासवर्गीय मुलींसाठी प्रती वर्ष ६०० रुपये, तर आठवी ते दहावीच्या सर्व मागासवर्गीय मुलींना प्रती वर्ष १००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने शिष्यवृत्तीचा कालावधी धरला जातो. गेल्या शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलींना शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात आली; पण विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलींच्या शिष्यवृत्तीचा जवळपास ६५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून अद्यापही मिळालेला नाही. यासंदर्भात जि. प. समाजकल्याण विभागाने शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. अशातच यंदा आठवी ते दहावीच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरित करण्याचा अधिकार जि. प. समाजकल्याण विभागाला प्रदान करण्यात आला आहे. आतापर्यंत या मुलींना राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जात होती.