शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

एनटीबीच्या अडीच टक्के आरक्षणापासून वैदू समाज कोसो दूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 19:34 IST

एनटीबीच्या अडीच टक्के आरक्षणापासून वैदू समाज कोसो दूर आहे. या समाजातही शिक्षणाचे प्रमाण नसल्यागतच आहे. वैदू समाजाच्या महिला तर शिक्षणापासून लांबच लांब आहेत.

- स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : एनटीबीच्या अडीच टक्के आरक्षणापासून वैदू समाज कोसो दूर आहे. या समाजातही शिक्षणाचे प्रमाण नसल्यागतच आहे. वैदू समाजाच्या महिला तर शिक्षणापासून लांबच लांब आहेत. अद्यापही भटकंती पाचवीलाच पुजलेली आहे. उदरनिर्वाहासाठी पारंपरिक व्यवसाय हातातून निसटला आहे. त्यावर कधीच दुसर्‍यांचे अतिक्रमण झाले आहे. अडीच टक्के आरक्षणात २८ जाती येत असल्यामुळे वैदू समाजाच्या वाट्याला अद्याप तरी काही आलेले नाही. 

लोकमतच्या बिरादरी सदरात चर्चा करताना हे भयान सत्य बाहेर आले. औरंगाबादेत या समाजाची भारतनगर, गारखेडा, सातारा परिसर या भागात घरे आहेत. देशात हा समाज आंध्र आणि महाराष्ट्रातच आहे. खरे तर हा समाज जुन्या काळातला डॉक्टरच. जडीबुटी विकणे हा मूळ व्यवसाय. आता तो त्यांचा राहिलेला नाही. पुढे वैदू समाजाची पुरुष मंडळी डबे, चाळण्या, कोट्या तयार करून विकू  लागली. महिला बिबे, सुया विकू लागल्या. कालांतराने हे कामही बंद पडत गेले. प्रसंगी भीक मागून उदरनिर्वाह करण्यापलीकडे या समाजाच्या हातात काहीच राहिले नाही. 

आई तुळजा भवानी व यलम्मांना मानणारा  या समाजात पूर्वी जात पंचायत चालायची. आता ती संपुष्टात आली आहे. आजही पाल करून राहावे लागते. त्यामुळे वैदू समाजाच्या मुला-मुलींनी शिकावे कसे हा प्रश्न आहे, याकडे महाराष्ट्र वैदू समाज संघटनेचे अध्यक्ष दुर्गादास गुडे, उपाध्यक्ष दुर्गादास शिवरकर, गंगाराम शेवाळे, शिवा शेवाळे आदींनी लक्ष वेधले. आतापर्यंत या समाजात दुर्गादास गुडे व दुर्गादास शिवरकर हे दोघेच बर्‍यापैकी शिकलेले.

साधे मॅट्रिक उत्तीर्ण विद्यार्थीही सापडणार नाहीत. शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी वैदू समाजासाठी वसतिगृहे उघडण्यात यावीत, मुला-मुलींना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, वैदू समाजाला जातीचे प्रमाणपत्र व रेशनकार्ड नाही, ते पालांवर येऊन देण्यात यावेत, आदिवासी समाजाच्या सवलती वैदू समाजाला देण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी गुढे यांच्यासह टी.एस. चव्हाण, के. ओ. गि-हे, प्रकाश वाघमारे, दत्ता शिंदे आदींनी केल्या. दुर्गादास गुढे यांनी सांगितले, हळूहळू आम्ही समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. समाज छोटा आहे. आजही तो रुढी-परंपरा व अंधश्रद्धेच्या गर्तेत आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा समाजात रुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. दिवंगत आसाराम गुरुजींनीही त्याकाळी असेच खूप प्रयत्न केले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद