शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

एनटीबीच्या अडीच टक्के आरक्षणापासून वैदू समाज कोसो दूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 19:34 IST

एनटीबीच्या अडीच टक्के आरक्षणापासून वैदू समाज कोसो दूर आहे. या समाजातही शिक्षणाचे प्रमाण नसल्यागतच आहे. वैदू समाजाच्या महिला तर शिक्षणापासून लांबच लांब आहेत.

- स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : एनटीबीच्या अडीच टक्के आरक्षणापासून वैदू समाज कोसो दूर आहे. या समाजातही शिक्षणाचे प्रमाण नसल्यागतच आहे. वैदू समाजाच्या महिला तर शिक्षणापासून लांबच लांब आहेत. अद्यापही भटकंती पाचवीलाच पुजलेली आहे. उदरनिर्वाहासाठी पारंपरिक व्यवसाय हातातून निसटला आहे. त्यावर कधीच दुसर्‍यांचे अतिक्रमण झाले आहे. अडीच टक्के आरक्षणात २८ जाती येत असल्यामुळे वैदू समाजाच्या वाट्याला अद्याप तरी काही आलेले नाही. 

लोकमतच्या बिरादरी सदरात चर्चा करताना हे भयान सत्य बाहेर आले. औरंगाबादेत या समाजाची भारतनगर, गारखेडा, सातारा परिसर या भागात घरे आहेत. देशात हा समाज आंध्र आणि महाराष्ट्रातच आहे. खरे तर हा समाज जुन्या काळातला डॉक्टरच. जडीबुटी विकणे हा मूळ व्यवसाय. आता तो त्यांचा राहिलेला नाही. पुढे वैदू समाजाची पुरुष मंडळी डबे, चाळण्या, कोट्या तयार करून विकू  लागली. महिला बिबे, सुया विकू लागल्या. कालांतराने हे कामही बंद पडत गेले. प्रसंगी भीक मागून उदरनिर्वाह करण्यापलीकडे या समाजाच्या हातात काहीच राहिले नाही. 

आई तुळजा भवानी व यलम्मांना मानणारा  या समाजात पूर्वी जात पंचायत चालायची. आता ती संपुष्टात आली आहे. आजही पाल करून राहावे लागते. त्यामुळे वैदू समाजाच्या मुला-मुलींनी शिकावे कसे हा प्रश्न आहे, याकडे महाराष्ट्र वैदू समाज संघटनेचे अध्यक्ष दुर्गादास गुडे, उपाध्यक्ष दुर्गादास शिवरकर, गंगाराम शेवाळे, शिवा शेवाळे आदींनी लक्ष वेधले. आतापर्यंत या समाजात दुर्गादास गुडे व दुर्गादास शिवरकर हे दोघेच बर्‍यापैकी शिकलेले.

साधे मॅट्रिक उत्तीर्ण विद्यार्थीही सापडणार नाहीत. शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी वैदू समाजासाठी वसतिगृहे उघडण्यात यावीत, मुला-मुलींना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, वैदू समाजाला जातीचे प्रमाणपत्र व रेशनकार्ड नाही, ते पालांवर येऊन देण्यात यावेत, आदिवासी समाजाच्या सवलती वैदू समाजाला देण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी गुढे यांच्यासह टी.एस. चव्हाण, के. ओ. गि-हे, प्रकाश वाघमारे, दत्ता शिंदे आदींनी केल्या. दुर्गादास गुढे यांनी सांगितले, हळूहळू आम्ही समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. समाज छोटा आहे. आजही तो रुढी-परंपरा व अंधश्रद्धेच्या गर्तेत आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा समाजात रुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. दिवंगत आसाराम गुरुजींनीही त्याकाळी असेच खूप प्रयत्न केले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद