शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

वडगाववासीयांची पाण्यासाठी भटकंती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:20 IST

पुरेसा निधी उपलब्ध असतानाही केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे वर्षभरापासून गावाचा पाणी प्रश्न रेंगाळला आहे.

वाळूज महानगर : पुरेसा निधी उपलब्ध असतानाही केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे वर्षभरापासून गावाचा पाणी प्रश्न रेंगाळला आहे. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांना पाणी असूनही भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अनेक वर्षांपासून वडगावात पाण्याची समस्या आहे. पाणीटंचाईमुळे दरवर्षी वर्षातील सहा महिने, तर नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. गावाचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी तत्कालीन सरपंच महेश भोंडवे यांनी एमआयडीसीचे पाणी घेण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसी जलकुंभ ते वडगाव जलकुंभ जवळपास दीड कोटी रुपये खर्चाची पाईपलाईन टाकून एमआयडीसीचे शुद्ध पाणी गावात आणले. त्यानंतर अंतर्गत लोखंडी पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव तयार करून १ कोटी ४० लाख रुपयांचा निधीही मंजूर के ला. सदरील कामाची निविदा काढून हे काम वर्षभरापूर्वी एका खाजगी संस्थेला दिले; परंतु ठेकेदार आणि पदाधिकारी यांच्यातील वादात कामाला गती मिळाली नाही. मध्यंतरी ग्रामपंचायतीने सदरील काम रद्द करण्याचा ठराव घेतला.

या कामासाठी नवीन प्रस्ताव तयार करून निविदा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजून ग्रामपंचायतीकडून अंदाजपत्रकच बनविण्याचे काम सुरू आहे. पाण्यासाठी सुरू असलेली ग्रामस्थांची भटकंती कधी थांबेल, असा प्रश्न रहिवाशांतून उपस्थित केला जात आहे. याविषयी सरपंच उषा साळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एमआयडीसीकडूनच कमी पाणी येत आहे. वाढीव पाण्यासाठी त्यांना पत्र दिले आहे. लवकरच नवीन निविदा काढून अंतर्गत पाईपलाइचे काम सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई