शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

वडगाववासीयांची पाण्यासाठी भटकंती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:20 IST

पुरेसा निधी उपलब्ध असतानाही केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे वर्षभरापासून गावाचा पाणी प्रश्न रेंगाळला आहे.

वाळूज महानगर : पुरेसा निधी उपलब्ध असतानाही केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे वर्षभरापासून गावाचा पाणी प्रश्न रेंगाळला आहे. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांना पाणी असूनही भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अनेक वर्षांपासून वडगावात पाण्याची समस्या आहे. पाणीटंचाईमुळे दरवर्षी वर्षातील सहा महिने, तर नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. गावाचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी तत्कालीन सरपंच महेश भोंडवे यांनी एमआयडीसीचे पाणी घेण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसी जलकुंभ ते वडगाव जलकुंभ जवळपास दीड कोटी रुपये खर्चाची पाईपलाईन टाकून एमआयडीसीचे शुद्ध पाणी गावात आणले. त्यानंतर अंतर्गत लोखंडी पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव तयार करून १ कोटी ४० लाख रुपयांचा निधीही मंजूर के ला. सदरील कामाची निविदा काढून हे काम वर्षभरापूर्वी एका खाजगी संस्थेला दिले; परंतु ठेकेदार आणि पदाधिकारी यांच्यातील वादात कामाला गती मिळाली नाही. मध्यंतरी ग्रामपंचायतीने सदरील काम रद्द करण्याचा ठराव घेतला.

या कामासाठी नवीन प्रस्ताव तयार करून निविदा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजून ग्रामपंचायतीकडून अंदाजपत्रकच बनविण्याचे काम सुरू आहे. पाण्यासाठी सुरू असलेली ग्रामस्थांची भटकंती कधी थांबेल, असा प्रश्न रहिवाशांतून उपस्थित केला जात आहे. याविषयी सरपंच उषा साळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एमआयडीसीकडूनच कमी पाणी येत आहे. वाढीव पाण्यासाठी त्यांना पत्र दिले आहे. लवकरच नवीन निविदा काढून अंतर्गत पाईपलाइचे काम सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई