शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

पाणीपुरवठ्यासाठी वडगाव ग्रामपंचायतीला लावले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 17:35 IST

वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठ्यास टाळाटाळ केली जात असल्याने छत्रपतीनगरातील संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून प्रवेशद्वारालाच टाळे लावले. तसेच महिलांनी सरपंचाला घेराव घातला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. अखेर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिवाळी झाल्यावर काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले.

वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठ्यास टाळाटाळ केली जात असल्याने छत्रपतीनगरातील संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून प्रवेशद्वारालाच टाळे लावले. तसेच महिलांनी सरपंचाला घेराव घातला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. अखेर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिवाळी झाल्यावर काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले.

छत्रपतीनगर भागाला ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जातो. पण जुनी पाईपलाईन चुकीची टाकली गेल्याने या वसाहतीला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पाण्यासाठी हाल होत असल्याने नागरिकांना अनेकवेळा अर्ज, विनंत्या, आंदोलने करुन पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. पण दरवेळी ग्रामपंचायतीने केवळ आश्वासनांवर रहिवाशांची बोळवण केली.

ग्रामपंचायतीने नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव मंजूर करुन हे काम खाजगी ठेकेदाराला दिले आहे. पण ठेकेदाराकडून अजून कामला सुरुवात केलेली नाही. यापूर्वी महिलांनी २४ आॅक्टोबर रोजी मोर्चा काढला होता. तेव्हा पं.स. सदस्य राजेश साळे आणि सरपंच उषा एकनाथ साळे यांनी १ नोव्हेंबरपासून नवीन पाईपलाईनचे काम सुरु होईल, असे आश्वासन दिले. मुदतीत या कामाला सुरुवात न झाल्याने जवळपास ७० महिलांनी सोमवारी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. कार्यालयात जबाबदार कोणीच अधिकारी उपस्थित नसल्याने महिलांनी प्रवशेद्वाराला टाळे लावत ठिय्या दिला.

यावेळी कार्यालयात जात असलेल्या सरपंच उषा साळे यांना प्रवेशद्वारावरच अडवून त्यांना घेराव घातला. महिलांच्या प्रश्नांचा भडीमार पाहून सरपंचानी तेथून काढता पाय घेतला. महिला ऐकत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतीने वाळूज एमआयडीसी पोलिसांना बोलावून घेतले. यावेळी फौजदार लक्ष्मण उंबरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

पण पाणी दिल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, असा पवित्रा सुनिता जाधव, मनिषा राजपूत, राधा मिरगे, सुनिता मगर, अपेक्षा पाटील, जयश्री घुले, पुष्पा तोडकर, योगिता गोडबोले, आश्विनी जाधव, सुनंदा खंदारे, राधा अहिरे, कांता म्हस्के, अलका खताळ, पुष्पा राठोड, नर्मदा साळुंके, श्रद्धा आडे, माधुरी सपाटे, अपेक्षा पाटील आदी महिलांनी घेतल्याने पोलिसांनाही माघार घ्यावी लागली. अखेर पंचायत समिती सदस्य राजेश साळे यांनी ग्रामविकास अधिकाºयांचे महिलांशी बोलणे करुन दिले. दिवाळीनंतर प्रत्यक्षात कामास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले.

लवकरच काम सुरु होईलनवीन पाईपलाईनचे काम मोठे आहे. त्याला वेळ द्यावा लागणार आहे. पाईपची आॅर्डर दिली आहे. लकवरच काम सुरु होईल, असे ग्रामविकास अधिकारी विलास कचकुरे व सरपंच उषा साळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबादWaterपाणी