शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्यासाठी वडगाव ग्रामपंचायतीला लावले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 17:35 IST

वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठ्यास टाळाटाळ केली जात असल्याने छत्रपतीनगरातील संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून प्रवेशद्वारालाच टाळे लावले. तसेच महिलांनी सरपंचाला घेराव घातला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. अखेर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिवाळी झाल्यावर काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले.

वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठ्यास टाळाटाळ केली जात असल्याने छत्रपतीनगरातील संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून प्रवेशद्वारालाच टाळे लावले. तसेच महिलांनी सरपंचाला घेराव घातला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. अखेर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिवाळी झाल्यावर काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले.

छत्रपतीनगर भागाला ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जातो. पण जुनी पाईपलाईन चुकीची टाकली गेल्याने या वसाहतीला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पाण्यासाठी हाल होत असल्याने नागरिकांना अनेकवेळा अर्ज, विनंत्या, आंदोलने करुन पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. पण दरवेळी ग्रामपंचायतीने केवळ आश्वासनांवर रहिवाशांची बोळवण केली.

ग्रामपंचायतीने नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव मंजूर करुन हे काम खाजगी ठेकेदाराला दिले आहे. पण ठेकेदाराकडून अजून कामला सुरुवात केलेली नाही. यापूर्वी महिलांनी २४ आॅक्टोबर रोजी मोर्चा काढला होता. तेव्हा पं.स. सदस्य राजेश साळे आणि सरपंच उषा एकनाथ साळे यांनी १ नोव्हेंबरपासून नवीन पाईपलाईनचे काम सुरु होईल, असे आश्वासन दिले. मुदतीत या कामाला सुरुवात न झाल्याने जवळपास ७० महिलांनी सोमवारी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. कार्यालयात जबाबदार कोणीच अधिकारी उपस्थित नसल्याने महिलांनी प्रवशेद्वाराला टाळे लावत ठिय्या दिला.

यावेळी कार्यालयात जात असलेल्या सरपंच उषा साळे यांना प्रवेशद्वारावरच अडवून त्यांना घेराव घातला. महिलांच्या प्रश्नांचा भडीमार पाहून सरपंचानी तेथून काढता पाय घेतला. महिला ऐकत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतीने वाळूज एमआयडीसी पोलिसांना बोलावून घेतले. यावेळी फौजदार लक्ष्मण उंबरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

पण पाणी दिल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, असा पवित्रा सुनिता जाधव, मनिषा राजपूत, राधा मिरगे, सुनिता मगर, अपेक्षा पाटील, जयश्री घुले, पुष्पा तोडकर, योगिता गोडबोले, आश्विनी जाधव, सुनंदा खंदारे, राधा अहिरे, कांता म्हस्के, अलका खताळ, पुष्पा राठोड, नर्मदा साळुंके, श्रद्धा आडे, माधुरी सपाटे, अपेक्षा पाटील आदी महिलांनी घेतल्याने पोलिसांनाही माघार घ्यावी लागली. अखेर पंचायत समिती सदस्य राजेश साळे यांनी ग्रामविकास अधिकाºयांचे महिलांशी बोलणे करुन दिले. दिवाळीनंतर प्रत्यक्षात कामास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले.

लवकरच काम सुरु होईलनवीन पाईपलाईनचे काम मोठे आहे. त्याला वेळ द्यावा लागणार आहे. पाईपची आॅर्डर दिली आहे. लकवरच काम सुरु होईल, असे ग्रामविकास अधिकारी विलास कचकुरे व सरपंच उषा साळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबादWaterपाणी