शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान सुरु; सकाळी १० वाजेपर्यंत केवळ ३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:34 IST

मतदानाच्या पूर्वसंध्येला फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आला होता.

ठळक मुद्देगोपनीयता भंग होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क 

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारी १९ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आला होता. दरम्यान, आज सकाळी १० वाजेपर्यत केवळ ३ टक्के मतदान झाले आहे.

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी यांच्यासह एक अपक्ष या निवडणुकीच्या मैदानात आहे. २२ आॅगस्ट रोजी मेल्ट्रॉन कंपनी चिकलठाणा येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. महायुतीचे बहुमत या निवडणुकीत असून सर्व मतदारांना रविवारी दुपारी ३ वा. इगतपुरी येथील विवांत रेसॉर्टमधून औरंगाबादकडे रवाना करण्यात आले. तसेच आघाडीतील काही मते फोडल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत असून, शिर्डीमध्ये काही मतदारांना रविवारी दिवसभर थांबविण्यात आले होते. ते मतदार १९ रोजी सकाळी थेट मतदान केंद्रावरच दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. पहिली आणि दुसरी पसंती देण्याबाबत युतीमध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. तत्पूर्वी शनिवारी इगतपुरीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी मतदान कसे करायचे, मतपत्रिकेवर शिक्का कुठे मारायचा, याचे प्रशिक्षण मतदारांना दिले. 

गोपनीयता भंग होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क २०१३ साली झालेल्या निवडणुकीत किचैन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. त्यामुळे यावेळी पारदर्शकतेसाठी काही कडक नियम अमलात आणले जाणार आहेत. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेला विशेष पेन मतदारांना देण्यात येईल. तसेच विशेष डिटेक्टरच्या साहाय्याने मतदारांची तपासणी करून त्यांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जाईल. गुप्त कॅमेरा, वाहनांच्या चाव्या, बटनमधील गुप्त कॅमेरा त्यांच्याकडे असल्यास तो जप्त करण्यात येईल. आजवरच्या निवडणुकीतील अनुभवामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे. 

दोन्ही जिल्ह्यांत १७ मतदान केंद्रेऔरंगाबादमध्ये ९, तर जालन्यात ८ असे एकूण १७ मतदान केंद्र या निवडणुकीसाठी असतील. सर्वाधिक १३८ इतके मतदान औरंगाबाद तहसील कार्यालयात आहे. यावर्षी पहिल्यांदाच तहसील कार्यालय हद्दीमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे गटबाजी, फोडाफोडीला आळा बसणार आहे.

अंदाजे पक्षीय बलाबल असे पक्ष    मतदार भाजप    १८९शिवसेना    १४१    काँग्रेस    १७०राष्ट्रवादी काँग्रेस    ०८०एमआयएम    ०२८रिपाइं, बसपा, अपक्ष    ०४९एकूण    ६५७

राजकीय                   समीकरणनिहाय मतदानमहायुती    ३३०महाआघाडी    २५०एमआयएम-अपक्ष    ०७७एकूण    ६५७ 

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादJalanaजालना