शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान सुरु; सकाळी १० वाजेपर्यंत केवळ ३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:34 IST

मतदानाच्या पूर्वसंध्येला फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आला होता.

ठळक मुद्देगोपनीयता भंग होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क 

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारी १९ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आला होता. दरम्यान, आज सकाळी १० वाजेपर्यत केवळ ३ टक्के मतदान झाले आहे.

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी यांच्यासह एक अपक्ष या निवडणुकीच्या मैदानात आहे. २२ आॅगस्ट रोजी मेल्ट्रॉन कंपनी चिकलठाणा येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. महायुतीचे बहुमत या निवडणुकीत असून सर्व मतदारांना रविवारी दुपारी ३ वा. इगतपुरी येथील विवांत रेसॉर्टमधून औरंगाबादकडे रवाना करण्यात आले. तसेच आघाडीतील काही मते फोडल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत असून, शिर्डीमध्ये काही मतदारांना रविवारी दिवसभर थांबविण्यात आले होते. ते मतदार १९ रोजी सकाळी थेट मतदान केंद्रावरच दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. पहिली आणि दुसरी पसंती देण्याबाबत युतीमध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. तत्पूर्वी शनिवारी इगतपुरीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी मतदान कसे करायचे, मतपत्रिकेवर शिक्का कुठे मारायचा, याचे प्रशिक्षण मतदारांना दिले. 

गोपनीयता भंग होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क २०१३ साली झालेल्या निवडणुकीत किचैन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. त्यामुळे यावेळी पारदर्शकतेसाठी काही कडक नियम अमलात आणले जाणार आहेत. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेला विशेष पेन मतदारांना देण्यात येईल. तसेच विशेष डिटेक्टरच्या साहाय्याने मतदारांची तपासणी करून त्यांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जाईल. गुप्त कॅमेरा, वाहनांच्या चाव्या, बटनमधील गुप्त कॅमेरा त्यांच्याकडे असल्यास तो जप्त करण्यात येईल. आजवरच्या निवडणुकीतील अनुभवामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे. 

दोन्ही जिल्ह्यांत १७ मतदान केंद्रेऔरंगाबादमध्ये ९, तर जालन्यात ८ असे एकूण १७ मतदान केंद्र या निवडणुकीसाठी असतील. सर्वाधिक १३८ इतके मतदान औरंगाबाद तहसील कार्यालयात आहे. यावर्षी पहिल्यांदाच तहसील कार्यालय हद्दीमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे गटबाजी, फोडाफोडीला आळा बसणार आहे.

अंदाजे पक्षीय बलाबल असे पक्ष    मतदार भाजप    १८९शिवसेना    १४१    काँग्रेस    १७०राष्ट्रवादी काँग्रेस    ०८०एमआयएम    ०२८रिपाइं, बसपा, अपक्ष    ०४९एकूण    ६५७

राजकीय                   समीकरणनिहाय मतदानमहायुती    ३३०महाआघाडी    २५०एमआयएम-अपक्ष    ०७७एकूण    ६५७ 

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादJalanaजालना