शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

मतदारांचा कल काँग्रेस महाआघाडीकडे झुकलाय : हर्षवर्धन पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:54 IST

समाजाचा कुठलाच घटक शासनाच्या बाजूने नाही

औरंगाबाद : मतदारांचा कल काँग्रेस महाआघाडीकडे वाढत असून, महाआघाडीच्या जागा वाढल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ पाटील हे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत भाजप-सेना महायुतीच्या सरकारने कुठल्याच आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे समाजातील कुठलाच घटक शासनाच्या बाजूने नाही.

स्थानिक पातळीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना जाहीर सभेसाठी व प्रियंका गांधी यांना रोड शोकरिता विनंती केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेची मागणीही होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. नोकऱ्यांची घटत चाललेली संख्या, शेतकरी कर्जमाफी, राफेल विमान खरेदी घोटाळा, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण, जीएसटी, महागाई, दुष्काळ आदी मुद्यांवरून पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला.  प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, माजी आमदार एम.एम. शेख, अशोक सायन्ना, प्रकाश मुगदिया व डॉ. पवन डोंगरे  उपस्थित होते.

खैरे हेच शहराच्या अधोगतीला जबाबदारकाँग्रेस सरकारने बांधलेल्या जायकवाडी धरणातून वीस वर्षांमध्ये खा. चंद्रकांत खैरे यांना  शहरासाठी पाणी आणता आले नाही. गेली २० वर्षे खैरे संसदेत आहेत? पण संसदेत त्यांनी कधी २०मिनिटेही भाषण केले नाही. त्यांनी  केलेले एक तरी काम दाखवावे, असे आव्हानच हर्षवर्धन पाटील यांनी दिले. या शहराच्या अधोगतीला खा.खैरे हेच जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला. ते म्हणाले  की, काँग्रेसच्या विचारांमुळेच औरंगाबादचा हा परिसर दिसतो आहे. कॅन्सर हॉस्पिटल, लॉ कॉलेज, शहराला औद्योगिक स्वरूप देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. आज औरंगाबादकर पाणी पाणी करीत आहेत. पण बाजूच्या जायकवाडी धरणातून खैरेंना हे पाणी आणता आले नाही.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेस