शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांचा कल काँग्रेस महाआघाडीकडे झुकलाय : हर्षवर्धन पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:54 IST

समाजाचा कुठलाच घटक शासनाच्या बाजूने नाही

औरंगाबाद : मतदारांचा कल काँग्रेस महाआघाडीकडे वाढत असून, महाआघाडीच्या जागा वाढल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ पाटील हे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत भाजप-सेना महायुतीच्या सरकारने कुठल्याच आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे समाजातील कुठलाच घटक शासनाच्या बाजूने नाही.

स्थानिक पातळीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना जाहीर सभेसाठी व प्रियंका गांधी यांना रोड शोकरिता विनंती केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेची मागणीही होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. नोकऱ्यांची घटत चाललेली संख्या, शेतकरी कर्जमाफी, राफेल विमान खरेदी घोटाळा, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण, जीएसटी, महागाई, दुष्काळ आदी मुद्यांवरून पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला.  प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, माजी आमदार एम.एम. शेख, अशोक सायन्ना, प्रकाश मुगदिया व डॉ. पवन डोंगरे  उपस्थित होते.

खैरे हेच शहराच्या अधोगतीला जबाबदारकाँग्रेस सरकारने बांधलेल्या जायकवाडी धरणातून वीस वर्षांमध्ये खा. चंद्रकांत खैरे यांना  शहरासाठी पाणी आणता आले नाही. गेली २० वर्षे खैरे संसदेत आहेत? पण संसदेत त्यांनी कधी २०मिनिटेही भाषण केले नाही. त्यांनी  केलेले एक तरी काम दाखवावे, असे आव्हानच हर्षवर्धन पाटील यांनी दिले. या शहराच्या अधोगतीला खा.खैरे हेच जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला. ते म्हणाले  की, काँग्रेसच्या विचारांमुळेच औरंगाबादचा हा परिसर दिसतो आहे. कॅन्सर हॉस्पिटल, लॉ कॉलेज, शहराला औद्योगिक स्वरूप देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. आज औरंगाबादकर पाणी पाणी करीत आहेत. पण बाजूच्या जायकवाडी धरणातून खैरेंना हे पाणी आणता आले नाही.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेस