शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

मतदारांचा कल काँग्रेस महाआघाडीकडे झुकलाय : हर्षवर्धन पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:54 IST

समाजाचा कुठलाच घटक शासनाच्या बाजूने नाही

औरंगाबाद : मतदारांचा कल काँग्रेस महाआघाडीकडे वाढत असून, महाआघाडीच्या जागा वाढल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ पाटील हे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत भाजप-सेना महायुतीच्या सरकारने कुठल्याच आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे समाजातील कुठलाच घटक शासनाच्या बाजूने नाही.

स्थानिक पातळीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना जाहीर सभेसाठी व प्रियंका गांधी यांना रोड शोकरिता विनंती केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेची मागणीही होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. नोकऱ्यांची घटत चाललेली संख्या, शेतकरी कर्जमाफी, राफेल विमान खरेदी घोटाळा, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण, जीएसटी, महागाई, दुष्काळ आदी मुद्यांवरून पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला.  प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, माजी आमदार एम.एम. शेख, अशोक सायन्ना, प्रकाश मुगदिया व डॉ. पवन डोंगरे  उपस्थित होते.

खैरे हेच शहराच्या अधोगतीला जबाबदारकाँग्रेस सरकारने बांधलेल्या जायकवाडी धरणातून वीस वर्षांमध्ये खा. चंद्रकांत खैरे यांना  शहरासाठी पाणी आणता आले नाही. गेली २० वर्षे खैरे संसदेत आहेत? पण संसदेत त्यांनी कधी २०मिनिटेही भाषण केले नाही. त्यांनी  केलेले एक तरी काम दाखवावे, असे आव्हानच हर्षवर्धन पाटील यांनी दिले. या शहराच्या अधोगतीला खा.खैरे हेच जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला. ते म्हणाले  की, काँग्रेसच्या विचारांमुळेच औरंगाबादचा हा परिसर दिसतो आहे. कॅन्सर हॉस्पिटल, लॉ कॉलेज, शहराला औद्योगिक स्वरूप देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. आज औरंगाबादकर पाणी पाणी करीत आहेत. पण बाजूच्या जायकवाडी धरणातून खैरेंना हे पाणी आणता आले नाही.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेस