शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

विष्णूपुरीच्या पाणीसाठ्यात घट

By admin | Updated: July 13, 2017 00:27 IST

नांदेड: पावसाने दडी मारल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर जलाशयांची पाणीपातळी कमी होत असून

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पावसाने दडी मारल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर जलाशयांची पाणीपातळी कमी होत असून जूनच्या प्रारंभी झालेल्या पावसाने कासवगतीने वाढणारे प्रकल्प आता वेगाने कमी होत आहेत़ विष्णूपुरी जलाशयातील साठा १८ टक्क्यांहून १६ टक्क्यावर आला आहे़ गत दोन आठवड्यांत २ टक्क्यांनी साठा कमी झाला आहे़ मृग नक्षत्रात समाधानकारक बरसलेल्या पावसाने नंतर पाठ फिरविली़ तब्बल २५ दिवसांची ओढ दिलेल्या पावसामुळे आता पाणीटंचाईचे संकट भेडसावत आहे़ पाण्याअभावी करपून जाणाऱ्या पिकांसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ११ जुलै २०१६ मध्ये विष्णूपुरी जलाशयात ४० टक्के साठा उपलब्ध होता़ तर १२ जुलै २०१७ मध्ये या जलाशयात १३़ २२ दलघमी साठा उपलब्ध आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा विष्णूपुरी जलाशयाची स्थिती गंभीर झाली आहे़ यंदा मे अखेर प्रकल्पात केवळ २ टक्के साठा उपलब्ध होता़ पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजनेचा आधार होता़ मात्र विष्णूपुरी जलाशय कोरडे पडल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ २२ जून रोजी जलाशयात १४़४७ दलघमी म्हणजे १७ टक्के साठा होता़ त्यानंतर ३० जून रोजी १४़७९ दलघमी म्हणजे १८़ ३१ टक्के पाणी उपलब्ध झाले होते़ त्यानंतर विष्णूपुरी जलाशयातील पाणी पातळी पावसाअभावी जैसे थी होती़ आता हळूहळू या साठ्यात घट होत आहे़ शहराला काही भागात एक दिवस तर काही भागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने जलाशयातून मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे़ पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला असला तरी विष्णूपुरी जलाशयातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक ‘जैसे थे’ आहे़ शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न आजही कायम आहे़ विष्णूपुरी जलाशयातील साठा वाढण्यासाठी परभणी, गंगाखेड या भागातील नदी क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे़