शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

१३८ टँकर देऊनही गावे तहानलेली

By admin | Updated: May 31, 2016 23:15 IST

सखाराम शिंदे ल्ल गेवराई दुष्काळामुळे ग्रामीण भागातील विहिरी, बोअरने तळ गाठला. यामुळे टँकरची मागणी वाढली. एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये,

सखाराम शिंदे ल्ल गेवराईदुष्काळामुळे ग्रामीण भागातील विहिरी, बोअरने तळ गाठला. यामुळे टँकरची मागणी वाढली. एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये, यासाठी प्रशासनाने मागेल त्या गावाला टँकर दिले. आजमितीला गेवराई तालुक्यात १३८ टँकरद्वारे ११० गावे, ११५ वाड्या अशा एकूण २२५ ठिकाणी पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु टँकरचे पाणी अपुरे पडत असल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे.चौथ्या वर्षीही दुष्काळ मुक्कामी असल्याने पाणीटंचाईची भयावह स्थिती तालुकाभरात आजही पहावयास मिळत आहे. गेवराई तालुक्यातील २२५ वाड्या, वस्ती, गावांना टँकरद्वारे २९४ खेपा दररोज केल्या जात आहेत. त्यातून जवळपास दोन लाख लोकांची तहान भागवली जात आहे. परंतु हा प्रयत्नही असफल ठरतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अंघोळ, घरामध्ये वापरासाठी पाणी व पिण्यासाठी पाणी अशा तीन पद्धतीने पाण्याचा वापर होतो. टँकरने फारतर फार पिण्याचे पाणी उपलब्ध होते. वापरायला अत्यल्प पाणी मिळते. टँकर दररोज येईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे मिळणारे तोकडे पाणी कसेबसे दोन दिवस त्यांना वापरावे लागते. आता पाणीटंचाई आणखी गंभीर झाली आहे. विकतचे टँकर मिळणेही कठीण झाले आहे. जे टँकर उपलब्ध आहेत, त्यांचे दरही चढे आहेत. दुष्काळात शेतकऱ्यांच्या हाताला उत्पन्न आले नाही. थोडेफार पैसे आहेत ते पाण्यावर खर्च करावे लागत आहेत. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास तर गेलाच आता पैसेही चालले आहेत, अशी बिकट परिस्थिती आहे.पाण्याची सोय : ४९ विहिरी केल्या अधिग्रहित१३८ खाजगी टँकर चालू आहेत. यात धुमेगाव, कोळगाव, राजपिंपरी, धोंडराई, मादळमोही, सिरसमार्ग, सिरसदेवी, मानमोडी, पौळाचीवाडी, माटेगाव, रसुलाबाद, मन्यारवाडी, बेलगुडवाडी, जातेगाव, पाडळसिंगी, गौंडगाव, चकलांबा, उमापूर, सावरगाव, पाचेगावसह अनेक गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. गेवराई येथील व गढी येथील पाण्याच्या टाक्यावरुन टँकर भरले जात आहेत. तसेच ४९ विहिरी टँकरसाठी अधिग्रहीत केल्या आहेत तरी देखील आजमितीला अनेक गावांत पाणी टंचाई भासत आहे. जून उजाडला असला तरी टँकरची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आगरनांदूर व मालेगाव या दोन गावांचे प्रस्ताव दाखल असल्याचे तहसीलदार पवार म्हणाले.