शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

१३८ टँकर देऊनही गावे तहानलेली

By admin | Updated: May 31, 2016 23:15 IST

सखाराम शिंदे ल्ल गेवराई दुष्काळामुळे ग्रामीण भागातील विहिरी, बोअरने तळ गाठला. यामुळे टँकरची मागणी वाढली. एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये,

सखाराम शिंदे ल्ल गेवराईदुष्काळामुळे ग्रामीण भागातील विहिरी, बोअरने तळ गाठला. यामुळे टँकरची मागणी वाढली. एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये, यासाठी प्रशासनाने मागेल त्या गावाला टँकर दिले. आजमितीला गेवराई तालुक्यात १३८ टँकरद्वारे ११० गावे, ११५ वाड्या अशा एकूण २२५ ठिकाणी पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु टँकरचे पाणी अपुरे पडत असल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे.चौथ्या वर्षीही दुष्काळ मुक्कामी असल्याने पाणीटंचाईची भयावह स्थिती तालुकाभरात आजही पहावयास मिळत आहे. गेवराई तालुक्यातील २२५ वाड्या, वस्ती, गावांना टँकरद्वारे २९४ खेपा दररोज केल्या जात आहेत. त्यातून जवळपास दोन लाख लोकांची तहान भागवली जात आहे. परंतु हा प्रयत्नही असफल ठरतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अंघोळ, घरामध्ये वापरासाठी पाणी व पिण्यासाठी पाणी अशा तीन पद्धतीने पाण्याचा वापर होतो. टँकरने फारतर फार पिण्याचे पाणी उपलब्ध होते. वापरायला अत्यल्प पाणी मिळते. टँकर दररोज येईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे मिळणारे तोकडे पाणी कसेबसे दोन दिवस त्यांना वापरावे लागते. आता पाणीटंचाई आणखी गंभीर झाली आहे. विकतचे टँकर मिळणेही कठीण झाले आहे. जे टँकर उपलब्ध आहेत, त्यांचे दरही चढे आहेत. दुष्काळात शेतकऱ्यांच्या हाताला उत्पन्न आले नाही. थोडेफार पैसे आहेत ते पाण्यावर खर्च करावे लागत आहेत. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास तर गेलाच आता पैसेही चालले आहेत, अशी बिकट परिस्थिती आहे.पाण्याची सोय : ४९ विहिरी केल्या अधिग्रहित१३८ खाजगी टँकर चालू आहेत. यात धुमेगाव, कोळगाव, राजपिंपरी, धोंडराई, मादळमोही, सिरसमार्ग, सिरसदेवी, मानमोडी, पौळाचीवाडी, माटेगाव, रसुलाबाद, मन्यारवाडी, बेलगुडवाडी, जातेगाव, पाडळसिंगी, गौंडगाव, चकलांबा, उमापूर, सावरगाव, पाचेगावसह अनेक गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. गेवराई येथील व गढी येथील पाण्याच्या टाक्यावरुन टँकर भरले जात आहेत. तसेच ४९ विहिरी टँकरसाठी अधिग्रहीत केल्या आहेत तरी देखील आजमितीला अनेक गावांत पाणी टंचाई भासत आहे. जून उजाडला असला तरी टँकरची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आगरनांदूर व मालेगाव या दोन गावांचे प्रस्ताव दाखल असल्याचे तहसीलदार पवार म्हणाले.