शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

विजय वडेट्टीवारांचा मोर्चा ओबीसींचा नव्हे तर काँग्रेसचाच; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

By बापू सोळुंके | Updated: October 5, 2025 22:38 IST

ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसचं हे काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरुन सुरू

बापू सोळुंके 

छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद गॅजेटिअरनुसार मराठा आरक्षणासाठी असलेला २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी विजय वडेट्टीवार ओबीसीचा मोर्चा काढत आहेत. मात्र, हा मोर्चा खऱ्या अर्थाने ओबीसीचा नसून काँग्रेसचा आहे. ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसचं हे काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरुन सुरू आहे, असा आरोप मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे  यांनी रविवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी  संवाद साधला. ते म्हणाले, विदर्भ आणि खानदेशातील आमच्या कुणबी बांधवांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडेट्टीवार ओबीसीच्या नावाखाली आपले राजकीय दुकान चालवत आहेत. विदर्भातील मराठा समाज झपका दाखवण्यासाठी सज्ज आहे. बंजारा समाजाचे आरक्षण खाल्ले, असे बोगस आरक्षण खाणाऱ्यांनी आमच्या आरक्षणाबद्दल बोलू नये असा टोला त्यांनी  मुंडे  बहिण, भावावर केली. परळीची लाभार्थी टोळी आणि येवल्याचा अलिबाबा, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचे काम करत असल्याची  टीका त्यांनी  केली. छगन भुजबळ यांच्या नादी लागून मराठ्यांवर वार केलात, तर तुमचं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त होईल, असा इशाराही त्यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि आ. धनंजय मुंडे यांना दिला.

आम्हीही बोगस आरक्षणाच्या विरोधात उतरणार!

मराठा आरक्षणाविरोधात मोर्चा काढणाऱ्या नेत्यांना उद्देशून जरांगे म्हणाले की, १० ऑक्टोबरला तुम्ही मोर्चा काढत आहात. तर  आम्हीही बोगस आरक्षण खाणाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरू. १९९४ च्या आरक्षणाच्या जीआरमध्ये ज्या बोगस जाती ओबीसींमध्ये घातल्या, त्यांना बाहेर काढा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  कारण, या जाती बॅकवर्ड क्लास मध्ये बसतच नसल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्याकडे लक्ष द्या, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार!

अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी खरीप हंगामवर केलेला खर्च विचारात घेता सरकारने त्यांच्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. दिवाळीपर्यंत काही केलं नाही, तर राज्यभरातील लोकांना बोलावून मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Wadettiwar's march is Congress's, not OBC's: Manoj Jarange Patil alleges.

Web Summary : Manoj Jarange Patil alleges Vijay Wadettiwar's OBC march is a Congress ploy orchestrated by Rahul Gandhi. He threatens protests against bogus reservations and demands aid for flood-hit farmers, warning the Munde siblings against betraying Marathas.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार