शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

‘बाटू’चे कुलगुरू गायकर यांचा राजीनामा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:38 IST

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी उच्चशिक्षण विभागाच्या कारभारला कंटाळून राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. हा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. कुलगुरूंनी केलेल्या विकासात्मक मागण्याही उच्चशिक्षण विभागाने मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देराज्यपालांचा निर्णय : कुलसचिवांचा पदभार कायम; इतरही बदल होणार

औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी उच्चशिक्षण विभागाच्या कारभारला कंटाळून राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. हा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. कुलगुरूंनी केलेल्या विकासात्मक मागण्याही उच्चशिक्षण विभागाने मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.उच्चशिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून लोणेरे येथील ‘बाटू’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गायकर यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २१ आक्टोबर रोजी प्रकाशित झाले होते. उच्चशिक्षण विभागाने बाटूचे कुलसचिव डॉ. सुनील भांबरे यांच्याकडील पदभार काढत त्यांची नियुक्ती पेन येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी केली. डॉ. भांबरे यांच्याकडे प्राचार्य आणि कुलसचिव या दोन्ही पदांची जबाबादरी ठेवण्याची विनंती कुलगुरू डॉ. गायकर यांनी केली होती. मात्र, ही विनंती धुडकावून लावली. यामुळे संतापलेल्या डॉ. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा पाठविला. याचवेळी विद्यापीठात प्रकुलगुरू, वित्त व लेखाधिकारी, अधिष्ठाता, विभागीय संचालक यांच्यासह इतर सर्व पदे मंजूर असतानाही भरण्यास मंजुरी देण्यात येत नाही. विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयांसाठी जागा मिळत नाही. विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास निधी देत नाहीत. याचवेळी राज्यातील तीन विधि विद्यापीठे, आयटीसीच्या विभागीय केंद्रासाठी जागा, निधी, पदे तात्काळ मंजूर केली जातात. ‘बाटू’सोबतच सरकार दुजाभावाने वागत असल्यामुळे त्रासलेल्या कुलगुरूंनी राजीनामा देण्याचे हे टोकाचे पाऊल उचलले होते. याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच खळबळ उडाली होती. शेवटी उच्चशिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे, सचिवांमध्ये बैठक झाल्यानंतर डॉ. गायकर यांना राजीनामा न देता काम करण्याची विनंती करण्यात आल्याचे समजते. तसेच डॉ. भांबरे यांची बदलीही थांबवत त्यांच्याकडे कुलसचिवपदाचा कार्यभार कायम ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.कोट,मी राजीनामा दिला होता. मात्र, माझ्या ज्या काही मागण्या होत्या. त्याबाबत सकारात्मक पावले उच्चशिक्षण विभागाकडून उचलण्यात आली आहेत. तसेच मला उर्वरित कालावधी पूर्ण होईपर्यंत कायम राहण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. सध्या तरी मी कार्यरत आहे.- डॉ. विलास गायकर, कुलगुरू, बाटू

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र