शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

‘बाटू’चे कुलगुरू गायकर यांचा राजीनामा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:38 IST

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी उच्चशिक्षण विभागाच्या कारभारला कंटाळून राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. हा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. कुलगुरूंनी केलेल्या विकासात्मक मागण्याही उच्चशिक्षण विभागाने मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देराज्यपालांचा निर्णय : कुलसचिवांचा पदभार कायम; इतरही बदल होणार

औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी उच्चशिक्षण विभागाच्या कारभारला कंटाळून राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. हा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. कुलगुरूंनी केलेल्या विकासात्मक मागण्याही उच्चशिक्षण विभागाने मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.उच्चशिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून लोणेरे येथील ‘बाटू’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गायकर यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २१ आक्टोबर रोजी प्रकाशित झाले होते. उच्चशिक्षण विभागाने बाटूचे कुलसचिव डॉ. सुनील भांबरे यांच्याकडील पदभार काढत त्यांची नियुक्ती पेन येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी केली. डॉ. भांबरे यांच्याकडे प्राचार्य आणि कुलसचिव या दोन्ही पदांची जबाबादरी ठेवण्याची विनंती कुलगुरू डॉ. गायकर यांनी केली होती. मात्र, ही विनंती धुडकावून लावली. यामुळे संतापलेल्या डॉ. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा पाठविला. याचवेळी विद्यापीठात प्रकुलगुरू, वित्त व लेखाधिकारी, अधिष्ठाता, विभागीय संचालक यांच्यासह इतर सर्व पदे मंजूर असतानाही भरण्यास मंजुरी देण्यात येत नाही. विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयांसाठी जागा मिळत नाही. विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास निधी देत नाहीत. याचवेळी राज्यातील तीन विधि विद्यापीठे, आयटीसीच्या विभागीय केंद्रासाठी जागा, निधी, पदे तात्काळ मंजूर केली जातात. ‘बाटू’सोबतच सरकार दुजाभावाने वागत असल्यामुळे त्रासलेल्या कुलगुरूंनी राजीनामा देण्याचे हे टोकाचे पाऊल उचलले होते. याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच खळबळ उडाली होती. शेवटी उच्चशिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे, सचिवांमध्ये बैठक झाल्यानंतर डॉ. गायकर यांना राजीनामा न देता काम करण्याची विनंती करण्यात आल्याचे समजते. तसेच डॉ. भांबरे यांची बदलीही थांबवत त्यांच्याकडे कुलसचिवपदाचा कार्यभार कायम ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.कोट,मी राजीनामा दिला होता. मात्र, माझ्या ज्या काही मागण्या होत्या. त्याबाबत सकारात्मक पावले उच्चशिक्षण विभागाकडून उचलण्यात आली आहेत. तसेच मला उर्वरित कालावधी पूर्ण होईपर्यंत कायम राहण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. सध्या तरी मी कार्यरत आहे.- डॉ. विलास गायकर, कुलगुरू, बाटू

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र