शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

माझी कन्या भाग्यश्री योजनेला अत्यल्प प्रतिसाद; ४ वर्षात ९२ जोडप्यांनी थांबविला एका मुलीवर पाळणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 18:33 IST

आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करताना दिसतात. असे असले तरी आजही समाजात वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, असा हट्ट धरला जातो. यामुळे पहिल्या दोन मुलींच्या जन्मानंतरही मुलगा व्हावा, यासाठी जोडपी प्रयत्न करताना दिसतात.

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : मुलगा, मुलगी असा लिंगभेद करू नये, यासाठी एक अथवा दोन मुलींच्या जन्मानंतर पाळणा थांबविणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची माझी कन्या भाग्यश्री योजना चार वर्षापूर्वी सुरू झाली. जिल्ह्यातील ९२ आदर्श जोडप्यांनी एक अथवा दोन मुलींच्या जन्मानंतर पाळणा थांबविल्याची माहिती मिळाली.

आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करताना दिसतात. असे असले तरी आजही समाजात वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, असा हट्ट धरला जातो. यामुळे पहिल्या दोन मुलींच्या जन्मानंतरही मुलगा व्हावा, यासाठी जोडपी प्रयत्न करताना दिसतात. लोकसंख्या नियंत्रणात राहण्यास मदत व्हावी, यासाठी पहिल्या अथवा दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने १ ऑगस्ट २०१७ रोजी माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित योजना आणली. ती अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत ९२ जोडप्यांनी एक अथवा दोन मुलींच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केली. 

या योजनेंतर्गत शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबाला शासनाकडून ५० हजार रु. मिळतात. ही रक्कम मुलगी आणि आईच्या संयुक्त खात्यात १८ वर्षांसाठी मुदत ठेव ठेवली जाते. मुलगी सहा आणि बारा वर्षाची झाल्यावर या रकमेवरील व्याज काढता येते. मुलीच्या १८ व्या वर्षी मूळ ५० हजार रु. आणि व्याज मिळते. तर दोन मुलींच्या जन्मानंतर पाळणा हलविणे थांबविले तर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रु. असे एकूण ५० हजार रु. मुदत ठेव ठेवली जाते. यामध्ये मुलगी ६ आणि १२ वर्षाची झाल्यावर व्याज काढता येते. वयाच्या १८ व्या वर्षी मूळ रक्कम आणि व्याज बँकेतून काढून घेता येते. जि. प.च्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेला चार वर्षात अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

मागील चार वर्षातील लाभार्थीवर्ष २०१८-----१० लाभार्थीवर्ष २०१९-----५१वर्ष२०२०---------२३वर्ष२०२१----------०८

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद