शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

माझी कन्या भाग्यश्री योजनेला अत्यल्प प्रतिसाद; ४ वर्षात ९२ जोडप्यांनी थांबविला एका मुलीवर पाळणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 18:33 IST

आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करताना दिसतात. असे असले तरी आजही समाजात वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, असा हट्ट धरला जातो. यामुळे पहिल्या दोन मुलींच्या जन्मानंतरही मुलगा व्हावा, यासाठी जोडपी प्रयत्न करताना दिसतात.

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : मुलगा, मुलगी असा लिंगभेद करू नये, यासाठी एक अथवा दोन मुलींच्या जन्मानंतर पाळणा थांबविणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची माझी कन्या भाग्यश्री योजना चार वर्षापूर्वी सुरू झाली. जिल्ह्यातील ९२ आदर्श जोडप्यांनी एक अथवा दोन मुलींच्या जन्मानंतर पाळणा थांबविल्याची माहिती मिळाली.

आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करताना दिसतात. असे असले तरी आजही समाजात वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, असा हट्ट धरला जातो. यामुळे पहिल्या दोन मुलींच्या जन्मानंतरही मुलगा व्हावा, यासाठी जोडपी प्रयत्न करताना दिसतात. लोकसंख्या नियंत्रणात राहण्यास मदत व्हावी, यासाठी पहिल्या अथवा दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने १ ऑगस्ट २०१७ रोजी माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित योजना आणली. ती अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत ९२ जोडप्यांनी एक अथवा दोन मुलींच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केली. 

या योजनेंतर्गत शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबाला शासनाकडून ५० हजार रु. मिळतात. ही रक्कम मुलगी आणि आईच्या संयुक्त खात्यात १८ वर्षांसाठी मुदत ठेव ठेवली जाते. मुलगी सहा आणि बारा वर्षाची झाल्यावर या रकमेवरील व्याज काढता येते. मुलीच्या १८ व्या वर्षी मूळ ५० हजार रु. आणि व्याज मिळते. तर दोन मुलींच्या जन्मानंतर पाळणा हलविणे थांबविले तर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रु. असे एकूण ५० हजार रु. मुदत ठेव ठेवली जाते. यामध्ये मुलगी ६ आणि १२ वर्षाची झाल्यावर व्याज काढता येते. वयाच्या १८ व्या वर्षी मूळ रक्कम आणि व्याज बँकेतून काढून घेता येते. जि. प.च्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेला चार वर्षात अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

मागील चार वर्षातील लाभार्थीवर्ष २०१८-----१० लाभार्थीवर्ष २०१९-----५१वर्ष२०२०---------२३वर्ष२०२१----------०८

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद