शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

'स्पीड गन'मुळे वाहनधारक सोसताहेत भुर्दंड; नियमांतील विसंगतीने रोज होतोय खिसा रिकामा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 18:31 IST

वेग मर्यादेचे उल्लंघनाच्या नियम आणि वाहनांमधील गतीची मर्यादा वेगवेगळी, सुधारणेची आवश्यकता

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळी मर्यादा आणि त्याविषयी वाहनचालकांना सहज माहितीदेखील मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यावरून वाहनचालकांचा रोज खिसा रिकामा होत आहे. ९० किमीपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविता येत नसेल तर नव्या वाहनांना वेगमर्यादा का घातली जात नाही, असा संतप्त सवाल वाहनचालक विचारत आहेत.

औरंगाबाद ते सोलापूर आता काही तासांत, औरंगाबाद ते नागपूर प्रवासाचा वेळ होणार कमी, असा गाजावाजा करत रस्ता तयार करण्यात येतो. नव्या चारचाकी दाखल करताना वाहनांच्या गतीचा आवर्जून उल्लेख केला जातो. प्रत्यक्षात वाहनाची गती अधिक असल्याच्या कारणावरून महामार्ग पोलिसांकडून कारवाई करण्यात येते.

९० चे ९१ झाले, तरी कारवाईऔरंगाबाद जिल्ह्यात दोन स्पीड गन वाहनांच्या मदतीने महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. मर्यादेपेक्षा एक किमी म्हणजे अगदी ९० चे ९१ किमी प्रतितास वेग वाढला, तरी एक हजार रुपयांचा दंड लावण्यात येतो.

फलक नाही, उतारावर का कारवाई ?ऐन उताराच्या रस्त्यावर आणि घाटात वाहनांच्या गतीची मोजणी करून कारवाई केली जाते. रस्त्यावर जागोजागी वेग मर्यादेसंदर्भात फलक लावण्याची गरज आहे. परंतु, ठराविक ठिकाणीच ते फलक दिसतात. मांजरसुंबा घाटात अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

वेगमर्यादा वाढवा, नाही तर वाहनांत बदल कराराष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर समतल भाग, घाट भाग, द्रुतगती मार्ग, मनपा क्षेत्र यानुसार ३० किमीपासून तर १०० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा आहे. काही रस्त्यांची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे योग्य अभ्यास करून वेगमर्यादा वाढीची गरज आहे. नाही तर वाहनांचा वेगच वाढणार नाही, अशा प्रकारे वाहनांत बदल करण्याची अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

ऑक्टोबरमध्ये ६,९०६ वाहनचालकांवर कारवाईऑक्टोबर महिन्यात वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६९०६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना एकूण ६९ लाख ६ हजारांचा दंड लावण्यात आला. यात केवळ ८० वाहनचालकांनी दंड भरला.

काही रस्त्यावरील वेगमर्यादा- सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्ग- ९० किमी प्रतितास- औरंगाबाद - पुणे मार्ग -६० किमी प्रतितास

वेगमर्यादेचे पालन आवश्यकअपघात झाला तर वाहनचालकाचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. स्पीड गनद्वारे वेगमर्यादेची कारवाई होते. त्यात मानवी हस्तक्षेप होत नाही.- डाॅ. दिलीप टिपरसे, पोलीस उपअधीक्षक,महामार्ग सुरक्षा पोलीस

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातRto officeआरटीओ ऑफीस