शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

'स्पीड गन'मुळे वाहनधारक सोसताहेत भुर्दंड; नियमांतील विसंगतीने रोज होतोय खिसा रिकामा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 18:31 IST

वेग मर्यादेचे उल्लंघनाच्या नियम आणि वाहनांमधील गतीची मर्यादा वेगवेगळी, सुधारणेची आवश्यकता

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळी मर्यादा आणि त्याविषयी वाहनचालकांना सहज माहितीदेखील मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यावरून वाहनचालकांचा रोज खिसा रिकामा होत आहे. ९० किमीपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविता येत नसेल तर नव्या वाहनांना वेगमर्यादा का घातली जात नाही, असा संतप्त सवाल वाहनचालक विचारत आहेत.

औरंगाबाद ते सोलापूर आता काही तासांत, औरंगाबाद ते नागपूर प्रवासाचा वेळ होणार कमी, असा गाजावाजा करत रस्ता तयार करण्यात येतो. नव्या चारचाकी दाखल करताना वाहनांच्या गतीचा आवर्जून उल्लेख केला जातो. प्रत्यक्षात वाहनाची गती अधिक असल्याच्या कारणावरून महामार्ग पोलिसांकडून कारवाई करण्यात येते.

९० चे ९१ झाले, तरी कारवाईऔरंगाबाद जिल्ह्यात दोन स्पीड गन वाहनांच्या मदतीने महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. मर्यादेपेक्षा एक किमी म्हणजे अगदी ९० चे ९१ किमी प्रतितास वेग वाढला, तरी एक हजार रुपयांचा दंड लावण्यात येतो.

फलक नाही, उतारावर का कारवाई ?ऐन उताराच्या रस्त्यावर आणि घाटात वाहनांच्या गतीची मोजणी करून कारवाई केली जाते. रस्त्यावर जागोजागी वेग मर्यादेसंदर्भात फलक लावण्याची गरज आहे. परंतु, ठराविक ठिकाणीच ते फलक दिसतात. मांजरसुंबा घाटात अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

वेगमर्यादा वाढवा, नाही तर वाहनांत बदल कराराष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर समतल भाग, घाट भाग, द्रुतगती मार्ग, मनपा क्षेत्र यानुसार ३० किमीपासून तर १०० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा आहे. काही रस्त्यांची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे योग्य अभ्यास करून वेगमर्यादा वाढीची गरज आहे. नाही तर वाहनांचा वेगच वाढणार नाही, अशा प्रकारे वाहनांत बदल करण्याची अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

ऑक्टोबरमध्ये ६,९०६ वाहनचालकांवर कारवाईऑक्टोबर महिन्यात वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६९०६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना एकूण ६९ लाख ६ हजारांचा दंड लावण्यात आला. यात केवळ ८० वाहनचालकांनी दंड भरला.

काही रस्त्यावरील वेगमर्यादा- सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्ग- ९० किमी प्रतितास- औरंगाबाद - पुणे मार्ग -६० किमी प्रतितास

वेगमर्यादेचे पालन आवश्यकअपघात झाला तर वाहनचालकाचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. स्पीड गनद्वारे वेगमर्यादेची कारवाई होते. त्यात मानवी हस्तक्षेप होत नाही.- डाॅ. दिलीप टिपरसे, पोलीस उपअधीक्षक,महामार्ग सुरक्षा पोलीस

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातRto officeआरटीओ ऑफीस