शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांचे भाव वाढले दुपटीने !

By admin | Updated: June 15, 2015 00:07 IST

बीड : पावसाळा अद्याप निटसा सुरू झाला नाही तोवरच पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाईत आणखी भर पडल्याने हातचे राखूनच खरेदी केली जात आहे.

बीड : पावसाळा अद्याप निटसा सुरू झाला नाही तोवरच पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाईत आणखी भर पडल्याने हातचे राखूनच खरेदी केली जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक केली जात आहे. दरम्यान, सात जून पासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. वेळेवर पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे तर दुसऱ्या बाजूला भाजीपाल्यांचे भाव दुप्पट झाल्यामुळे याच लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर साधारणत: महिनाभरानंतर भाजीपाल्याचे भाव वाढतात. कारण पावसामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे आवक कमी होते परिणामी भाव वाढतात. परंतु यंदा परिस्थिती वेगळी झाली आहे. पावसाळा सुरू होत नाही तोच भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत. कांदे, कोथींबीर, टोमॅटो, लसूण, अद्रक याचे भाव वाढले असल्यामुळे हातचे राखूनच खरेदी करीत आहेत. सकाळच्या वेळी भाजीमंडईत भाज्यासाठी आधी पैसे मोजावे लागत असल्याने अनेकजण सायंकाळी सहाच्या सुमारास भाजी मंडईत खरेदीसाठी जात आहेत. सायंकाळच्या वेळी काही प्रमाणात भाजीपाला स्वस्त मिळत असल्याचे काही नागरिकांचे मत आहे. एकंदरीत या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. (प्रतिनिधी)