शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

संतपीठ आणि सौरऊर्जा प्रकल्पासह मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्याच्या विविध घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 12:21 IST

Marathwada Liberation Day : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथे हुतात्म्यांना अभिवादन केले.

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेऔरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद येथील स्मारकावर पुष्प अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना आणि भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

आपल्या संबोधनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे घोषीत केलं आहे. मागील अनेक दिवसांपासून संतपीठाची मागणी होती. आता मुख्यमंत्र्यांनीच या संतपीठाची घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केले जाणार आहे. हे संतपीठ मोठं व्हावं आणि यातून महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल, अशी आपेक्षा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.

निजामकालीन शाळांचा पुनर्विकासयावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील 150 निजामकालीन शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. निजामशाहीच्या काही खुणा आहेत, त्या आता जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळेच, मराठवाड्यातल्या सुमारे 150 शाळांचा आपण पुनर्विकास करत आहोत. मराठवाडा जगाला देऊ शकतो, अशा काही गोष्टी आपण आज मराठवाड्यात सुरू करत आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सौरऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात 200 मेगा व्हॉल्टचा सौरऊर्जेचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच औरंगाबादमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार, औरंगाबाद-शिर्डी 112.40 किमी मार्गाची श्रेणीवाढ करण्यात येणार,  समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या 194.48 किमीच्या जालना-नांदेड महामार्गाला देखील गती देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांच्या मराठवाड्यासाठी घोषणा- निजामकालीन 150 शाळांचा पुर्नविकास- औरंगाबादमध्ये संतपीठ स्थापन करणार- 200 मेगा व्हॉल्टचा सौरऊर्जेचा प्रकल्प - हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी 6 कोटी निधी- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना- औरंगाबाद-शिर्डी हवाई सेवेची चाचपणी- सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी 382 कोटी रुपये- औरंगाबादच्या मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 317. 22 कोटी रुपये निधी - परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासही गती. 350  कोटी रुपयांची तरतूद- परभणीसाठी जल जीवन अभियानातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना. 105 कोटी - उस्मानाबाद शहरासाठी 168.61 कोटी रकमेची भूमीगत गटार योजना- हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योगासाठी4.50 कोटी-हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकासासाठी 86.19 कोटी रुपये - नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी 66.54 कोटी रुपये निधी- घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास कऱण्यासाठी वाढीव 28 कोटी रुपये  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना