शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

'वंदे भारत' आता नांदेडहून धावणार, वेळ बदलल्याने छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:14 IST

वंदे भारतचा वेग आहे, वेळ नाही; छत्रपती संभाजीनगरकरांचा आवाज कुणी ऐकतोय?

छत्रपती संभाजीनगर:वंदे भारत एक्सप्रेस आता जालन्याऐवजी नांदेडपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे नांदेड, परभणीची प्रवाशांची सोय झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागणार आहे. आता गाडी नांदेडहून पहाटे ५ वाजता निघणार असल्याने तिचे छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील आगमन उशिरा होणार आहे. पूर्वी उपलब्ध असलेली सकाळची वेळ आता बदलल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या कार्यालयीन प्रवाशांचे नियोजन डगमगले आहे. विशेषतः सकाळच्या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. 

छत्रपती संभाजीनगरसारख्या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहराला दर्जेदार व वेळेत पोहोचणारी रेल्वे सेवा मिळणे गरजेचे आहे. पूर्वी वंदे भारत सकाळी सुमारे ५:४५ वाजता छत्रपती संभाजीनगरहून सुटत असे आणि मुंबईत दुपारपूर्वी पोहोचत असे. त्यामुळे अनेकांसाठी ती कार्यालयीन कामासाठी उपयुक्त ठरत होती. मात्र, आता नवीन वेळापत्रकाप्रमाणे ही रेल्वे नांदेड येथून पहाटे ५ वाजता सुटेल, परभणी ५. ४० वा., जालना ७. २० वा. तर छत्रपती संभाजीनगरात सकाळी ८. १३ वाजता येईल आणि मुंबई येथे दुपारी २. २५ वाजता पोहचेल. तसेच परतीच्या प्रवासाच्या वेळेत बदल झाला नसून मुंबई येथून दुपारी १. १० वाजता निघून छत्रपती संभाजीनगरात सायंकाळी ७. ०५ वाजता पोहचेल. तर जालना ८ . ०५ वा. , परभणी ९. ४३ वा. येऊन नांदेड येथे पोहचण्याची वेळी १०. ५० वाजेची आहे. गाडी नांदेडहून येणार असल्याने तिचे छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील आगमन उशिरा होणार आहे. नवीन वेळ गैरसोयीची असल्यामुळे शहरातील प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. नवीन वेळापत्रक लवकरच लागू करण्यात येईल अशी माहिती रेल्वे विभागाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रवाशांमध्ये संतापवंदे भारतसारखी जलदगती ट्रेन ही 'हब टु हब' कनेक्शनसाठी असते. मोठ्या शहरांना त्वरित जोडणारी सेवा सर्व प्रवाशांना फायद्याची ठरते. मात्र, नवीन वेळापत्रकामुळे वेळेत पोहोचणे हे मुख्य वैशिष्ट्य वंदे भारत एक्सप्रेसने गमावले आहे. छत्रपती संभाजीनगर हे देशातील वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. एवढ्या मोठ्या शहराला सुयोग्य वेळेची रेल्वे सुविधा मिळू नये हे दुर्दैवी आहे. राजकीय दबावाखाली निर्णय घेतल्यामुळे या सेवेचा मूळ उद्देशच हरवत चालला असल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला.

सोयीच्या वेळेत स्वतंत्र गाडी सुरू करावीसंभाजीनगरहून मोठ्या प्रयत्नांनंतर मुंबईसाठी सकाळची गाडी मिळाली होती जी कार्यालयीन कामासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना सोयीची होती. मराठवाड्यातील राजकारण्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत आता ना धड जनशताब्दी ना वंदेभारत संभाजीनगरसाठी सोयीची ठरणार आहे. एकीकडे मोठे उद्योग शहरात येत असतांना चांगली सोयीची रेल्वेसेवा नसणे शहराच्या प्रतिमेसाठी चांगले नाही. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून शहरासाठी सोयीच्या वेळेत स्वतंत्र गाडी सुरू करून घ्यावी.-स्वानंद सोळंके, मराठवाडा रेल्वे कृती समिती

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसNandedनांदेडchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर