शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

'वंदे भारत' आता नांदेडहून धावणार, वेळ बदलल्याने छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:14 IST

वंदे भारतचा वेग आहे, वेळ नाही; छत्रपती संभाजीनगरकरांचा आवाज कुणी ऐकतोय?

छत्रपती संभाजीनगर:वंदे भारत एक्सप्रेस आता जालन्याऐवजी नांदेडपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे नांदेड, परभणीची प्रवाशांची सोय झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागणार आहे. आता गाडी नांदेडहून पहाटे ५ वाजता निघणार असल्याने तिचे छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील आगमन उशिरा होणार आहे. पूर्वी उपलब्ध असलेली सकाळची वेळ आता बदलल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या कार्यालयीन प्रवाशांचे नियोजन डगमगले आहे. विशेषतः सकाळच्या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. 

छत्रपती संभाजीनगरसारख्या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहराला दर्जेदार व वेळेत पोहोचणारी रेल्वे सेवा मिळणे गरजेचे आहे. पूर्वी वंदे भारत सकाळी सुमारे ५:४५ वाजता छत्रपती संभाजीनगरहून सुटत असे आणि मुंबईत दुपारपूर्वी पोहोचत असे. त्यामुळे अनेकांसाठी ती कार्यालयीन कामासाठी उपयुक्त ठरत होती. मात्र, आता नवीन वेळापत्रकाप्रमाणे ही रेल्वे नांदेड येथून पहाटे ५ वाजता सुटेल, परभणी ५. ४० वा., जालना ७. २० वा. तर छत्रपती संभाजीनगरात सकाळी ८. १३ वाजता येईल आणि मुंबई येथे दुपारी २. २५ वाजता पोहचेल. तसेच परतीच्या प्रवासाच्या वेळेत बदल झाला नसून मुंबई येथून दुपारी १. १० वाजता निघून छत्रपती संभाजीनगरात सायंकाळी ७. ०५ वाजता पोहचेल. तर जालना ८ . ०५ वा. , परभणी ९. ४३ वा. येऊन नांदेड येथे पोहचण्याची वेळी १०. ५० वाजेची आहे. गाडी नांदेडहून येणार असल्याने तिचे छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील आगमन उशिरा होणार आहे. नवीन वेळ गैरसोयीची असल्यामुळे शहरातील प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. नवीन वेळापत्रक लवकरच लागू करण्यात येईल अशी माहिती रेल्वे विभागाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रवाशांमध्ये संतापवंदे भारतसारखी जलदगती ट्रेन ही 'हब टु हब' कनेक्शनसाठी असते. मोठ्या शहरांना त्वरित जोडणारी सेवा सर्व प्रवाशांना फायद्याची ठरते. मात्र, नवीन वेळापत्रकामुळे वेळेत पोहोचणे हे मुख्य वैशिष्ट्य वंदे भारत एक्सप्रेसने गमावले आहे. छत्रपती संभाजीनगर हे देशातील वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. एवढ्या मोठ्या शहराला सुयोग्य वेळेची रेल्वे सुविधा मिळू नये हे दुर्दैवी आहे. राजकीय दबावाखाली निर्णय घेतल्यामुळे या सेवेचा मूळ उद्देशच हरवत चालला असल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला.

सोयीच्या वेळेत स्वतंत्र गाडी सुरू करावीसंभाजीनगरहून मोठ्या प्रयत्नांनंतर मुंबईसाठी सकाळची गाडी मिळाली होती जी कार्यालयीन कामासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना सोयीची होती. मराठवाड्यातील राजकारण्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत आता ना धड जनशताब्दी ना वंदेभारत संभाजीनगरसाठी सोयीची ठरणार आहे. एकीकडे मोठे उद्योग शहरात येत असतांना चांगली सोयीची रेल्वेसेवा नसणे शहराच्या प्रतिमेसाठी चांगले नाही. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून शहरासाठी सोयीच्या वेळेत स्वतंत्र गाडी सुरू करून घ्यावी.-स्वानंद सोळंके, मराठवाडा रेल्वे कृती समिती

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसNandedनांदेडchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर