शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
7
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
8
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
9
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
10
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
11
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
12
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
13
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
14
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
15
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
16
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
17
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
18
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
19
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
20
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले

'वंदे भारत' आता नांदेडहून धावणार, वेळ बदलल्याने छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:14 IST

वंदे भारतचा वेग आहे, वेळ नाही; छत्रपती संभाजीनगरकरांचा आवाज कुणी ऐकतोय?

छत्रपती संभाजीनगर:वंदे भारत एक्सप्रेस आता जालन्याऐवजी नांदेडपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे नांदेड, परभणीची प्रवाशांची सोय झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागणार आहे. आता गाडी नांदेडहून पहाटे ५ वाजता निघणार असल्याने तिचे छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील आगमन उशिरा होणार आहे. पूर्वी उपलब्ध असलेली सकाळची वेळ आता बदलल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या कार्यालयीन प्रवाशांचे नियोजन डगमगले आहे. विशेषतः सकाळच्या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. 

छत्रपती संभाजीनगरसारख्या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहराला दर्जेदार व वेळेत पोहोचणारी रेल्वे सेवा मिळणे गरजेचे आहे. पूर्वी वंदे भारत सकाळी सुमारे ५:४५ वाजता छत्रपती संभाजीनगरहून सुटत असे आणि मुंबईत दुपारपूर्वी पोहोचत असे. त्यामुळे अनेकांसाठी ती कार्यालयीन कामासाठी उपयुक्त ठरत होती. मात्र, आता नवीन वेळापत्रकाप्रमाणे ही रेल्वे नांदेड येथून पहाटे ५ वाजता सुटेल, परभणी ५. ४० वा., जालना ७. २० वा. तर छत्रपती संभाजीनगरात सकाळी ८. १३ वाजता येईल आणि मुंबई येथे दुपारी २. २५ वाजता पोहचेल. तसेच परतीच्या प्रवासाच्या वेळेत बदल झाला नसून मुंबई येथून दुपारी १. १० वाजता निघून छत्रपती संभाजीनगरात सायंकाळी ७. ०५ वाजता पोहचेल. तर जालना ८ . ०५ वा. , परभणी ९. ४३ वा. येऊन नांदेड येथे पोहचण्याची वेळी १०. ५० वाजेची आहे. गाडी नांदेडहून येणार असल्याने तिचे छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील आगमन उशिरा होणार आहे. नवीन वेळ गैरसोयीची असल्यामुळे शहरातील प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. नवीन वेळापत्रक लवकरच लागू करण्यात येईल अशी माहिती रेल्वे विभागाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रवाशांमध्ये संतापवंदे भारतसारखी जलदगती ट्रेन ही 'हब टु हब' कनेक्शनसाठी असते. मोठ्या शहरांना त्वरित जोडणारी सेवा सर्व प्रवाशांना फायद्याची ठरते. मात्र, नवीन वेळापत्रकामुळे वेळेत पोहोचणे हे मुख्य वैशिष्ट्य वंदे भारत एक्सप्रेसने गमावले आहे. छत्रपती संभाजीनगर हे देशातील वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. एवढ्या मोठ्या शहराला सुयोग्य वेळेची रेल्वे सुविधा मिळू नये हे दुर्दैवी आहे. राजकीय दबावाखाली निर्णय घेतल्यामुळे या सेवेचा मूळ उद्देशच हरवत चालला असल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला.

सोयीच्या वेळेत स्वतंत्र गाडी सुरू करावीसंभाजीनगरहून मोठ्या प्रयत्नांनंतर मुंबईसाठी सकाळची गाडी मिळाली होती जी कार्यालयीन कामासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना सोयीची होती. मराठवाड्यातील राजकारण्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत आता ना धड जनशताब्दी ना वंदेभारत संभाजीनगरसाठी सोयीची ठरणार आहे. एकीकडे मोठे उद्योग शहरात येत असतांना चांगली सोयीची रेल्वेसेवा नसणे शहराच्या प्रतिमेसाठी चांगले नाही. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून शहरासाठी सोयीच्या वेळेत स्वतंत्र गाडी सुरू करून घ्यावी.-स्वानंद सोळंके, मराठवाडा रेल्वे कृती समिती

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसNandedनांदेडchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर