शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

घाटीतील डॉक्टरांनी मुलाला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 20:35 IST

घाटी रुग्णालयाच्या बालरोग विभागाने दहा वर्षीय बालकाला औषधोपचार करून आजारातील गुंतागूत दूर केली.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या बालरोग विभागाने दहा वर्षीय बालकाला औषधोपचार करून आजारातील गुंतागूत दूर केली. त्यामुळे अंथरुणावर खिळून असलेला बालक आता चालू-फिरू लागला असून, तो शाळेतही जायला लागला आहे. आम्ही आशा सोडून दिली होती, पण घाटीतील डॉक्टरांनी मुलाला जीवदान दिले, आशा भावना त्याच्या कुटुंबियांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.

बाचोटी (ता. कंधार) येथे चौथीत शिकणाऱ्या शिवप्रसाद स्वामी याला जुलै २०१८ मध्ये अचानक चक्कर आली. त्यानंतर त्याला झटके येण्यास सुरुवात झाली. त्याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर २० दिवस उपचार करण्यात आले. दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटीत बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभा खैरे यांच्या युनिटने वॉर्ड २४ मध्ये त्याच्यावर यशस्वी उपचार केले. योग्य निदान झाल्याने त्याचे झटके बंद झाले. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून सुटी मिळाली. त्यावेळी तो त्याच्या पायावर चालत घरी गेला.

अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे, डॉ. स्मिता मुंदडा, डॉ. प्राजीत गिवर्गीस, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. वर्षा चौरे, डॉ. हिना कौसर, डॉ. निला जोशी, डॉ. निलेश हातझाडे यांनी शिवप्रसादवर उपचार केले. तसेच रजनी कुलकर्णी, स्वरुपा खेकडे यांच्यासह परिचारिका आणि कर्मचा-यांनी प्रयत्न केल्याने शिवप्रसादला नवे आयुष्य मिळाल्याचे त्याचे काका धनंजय स्वामी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

मेंदूचा टीबीघाटीत या बालकाच्या मेंदुच्या टीबीचे वेळीच निदान झाले. त्यामुळे उपचार यशस्वी करता आले. या आजाराचे बालरोगात दोन ते तीन टक्के प्रमाण आहे. त्याचे पालक नियमित तपासणीसाठी येतात.

-डॉ. प्रभा खैरे, विभागप्रमुख, बालरोग विभाग, घाटी रुग्णालय

 

 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद