शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

रेल्वेची प्रवाशांना ‘व्हॅलेंटाईन गिफ्ट’; १४ फेब्रुवारीपासून जनशताब्दी एक्स्प्रेस सुरु, ‘सीएसएमटी’पर्यंत धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 19:53 IST

Janshatabdi Express जनशताब्दी एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीपासून जालना येथून सकाळी ८.३० वाजता सुटेल.

ठळक मुद्देरेल्वे सकाळी ९.१५ वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल होईल आणि ९.२० वाजता रवाना होईल. सीएसएमटी - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ही सीएसएमटी येथून दुपारी १२.१० वाजता सुटेल.

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या तब्बल ११ महिन्यांनंतर १४ फेब्रुवारीपासून जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार आहे. विशेष म्हणजे, ही रेल्वे दादरऐवजी आता पूर्वीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत (सीएसएमटी)धावणार आहे. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेकडून मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना एकप्रकारे ‘व्हॅलेंटाईन गिफ्ट’च देण्यात आले आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीपासून जालना येथून सकाळी ८.३० वाजता सुटेल. ही रेल्वे सकाळी ९.१५ वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल होईल आणि ९.२० वाजता रवाना होईल. तर सीएसएमटी येथे दुपारी ४.२० वाजता पोहोचेल. तर सीएसएमटी - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ही सीएसएमटी येथून दुपारी १२.१० वाजता सुटेल. ही रेल्वे औरंगाबाद येथे सायंकाळी ६.२५ वाजता येईल आणि ६.३० वाजता जालन्यासाठी रवाना होईल. जालना येथे रात्री ७.४५ वाजता ही रेल्वे पोहोचेल.

कोरोना प्रादुर्भावाने गतवर्षी मार्चपासून ही रेल्वे बंद होती. मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ही रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर ही रेल्वे पुन्हा एकदा धावणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची रेल्वे आहे. ही रेल्वे सुरुवातीला मुंबईपर्यंत धावत होती. परंतु, पुढे ही गाडी दादरपर्यंतच सोडण्यात आली. २०१५ मध्ये ही रेल्वे जालन्यापर्यंत वाढविण्यात आली. दादरवरून ये-जा करताना अनेक अडचणी येत असल्याने ही रेल्वे पुन्हा सीएसएमटीपर्यंत नेण्याची मागणी होत होती. अखेर ही मागणी आता पूर्णत्वास गेली आहे.

नव्या वेळापत्रकाने एका दिवसात ये-जा अशक्यजनशताब्दी एक्स्प्रेस आता नव्या वेळापत्राप्रमाणे धावणार आहे. ही रेल्वे पूर्वी औरंगाबादहून सकाळी ६ वाजता रवाना होऊन दुपारी १२ वाजेपर्यंत दादर येथे पोहोचत असे. काही तासांत काम आटोपून जनशताब्दी एक्स्प्रेसनेच औरंगाबादला परतता येत असे. परंतु नव्या वेळापत्रकात ही रेल्वे मुंबईला पोहोचण्यापूर्वीच तेथून दुसरी रेल्वे सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एका दिवसात मुंबईला ये-जा करता येणार नाही. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद