शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची प्रवाशांना ‘व्हॅलेंटाईन गिफ्ट’; १४ फेब्रुवारीपासून जनशताब्दी एक्स्प्रेस सुरु, ‘सीएसएमटी’पर्यंत धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 19:53 IST

Janshatabdi Express जनशताब्दी एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीपासून जालना येथून सकाळी ८.३० वाजता सुटेल.

ठळक मुद्देरेल्वे सकाळी ९.१५ वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल होईल आणि ९.२० वाजता रवाना होईल. सीएसएमटी - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ही सीएसएमटी येथून दुपारी १२.१० वाजता सुटेल.

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या तब्बल ११ महिन्यांनंतर १४ फेब्रुवारीपासून जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार आहे. विशेष म्हणजे, ही रेल्वे दादरऐवजी आता पूर्वीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत (सीएसएमटी)धावणार आहे. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेकडून मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना एकप्रकारे ‘व्हॅलेंटाईन गिफ्ट’च देण्यात आले आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीपासून जालना येथून सकाळी ८.३० वाजता सुटेल. ही रेल्वे सकाळी ९.१५ वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल होईल आणि ९.२० वाजता रवाना होईल. तर सीएसएमटी येथे दुपारी ४.२० वाजता पोहोचेल. तर सीएसएमटी - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ही सीएसएमटी येथून दुपारी १२.१० वाजता सुटेल. ही रेल्वे औरंगाबाद येथे सायंकाळी ६.२५ वाजता येईल आणि ६.३० वाजता जालन्यासाठी रवाना होईल. जालना येथे रात्री ७.४५ वाजता ही रेल्वे पोहोचेल.

कोरोना प्रादुर्भावाने गतवर्षी मार्चपासून ही रेल्वे बंद होती. मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ही रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर ही रेल्वे पुन्हा एकदा धावणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची रेल्वे आहे. ही रेल्वे सुरुवातीला मुंबईपर्यंत धावत होती. परंतु, पुढे ही गाडी दादरपर्यंतच सोडण्यात आली. २०१५ मध्ये ही रेल्वे जालन्यापर्यंत वाढविण्यात आली. दादरवरून ये-जा करताना अनेक अडचणी येत असल्याने ही रेल्वे पुन्हा सीएसएमटीपर्यंत नेण्याची मागणी होत होती. अखेर ही मागणी आता पूर्णत्वास गेली आहे.

नव्या वेळापत्रकाने एका दिवसात ये-जा अशक्यजनशताब्दी एक्स्प्रेस आता नव्या वेळापत्राप्रमाणे धावणार आहे. ही रेल्वे पूर्वी औरंगाबादहून सकाळी ६ वाजता रवाना होऊन दुपारी १२ वाजेपर्यंत दादर येथे पोहोचत असे. काही तासांत काम आटोपून जनशताब्दी एक्स्प्रेसनेच औरंगाबादला परतता येत असे. परंतु नव्या वेळापत्रकात ही रेल्वे मुंबईला पोहोचण्यापूर्वीच तेथून दुसरी रेल्वे सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एका दिवसात मुंबईला ये-जा करता येणार नाही. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद