शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day : समाजाने दुर्धर आजारामुळे नाकारलेल्या ६८ मुलांना ‘प्रेम’ देणारं जोडपं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:30 IST

एड्ससारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या तब्बल ६८ मुलांना मायेची ऊब आणि हक्काचे ‘प्रेम’ देण्याचे काम बीड जिल्ह्यातील संध्या व दत्ता बारगजे हे जोडपे करीत आहे. 

- सोमनाथ खताळ 

बीड : ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...’ मंगेश पाडगावकर यांची ही कविता सर्वांना परिचित असेल. तरुणांसाठी हे कदाचित खरंही असेल. मात्र, समाजासाठी काम करणाऱ्यांसाठी हे पूर्ण उलटे आहे. हल्ले, खोटे गुन्हे, अपमान यांचा सामना करून त्यांना आजही समाजातील ‘प्रेम’ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. १७ वर्षांच्या संघर्षावर मात करून एड्ससारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या तब्बल ६८ मुलांना मायेची ऊब आणि हक्काचे ‘प्रेम’ देण्याचे काम बीड जिल्ह्यातील संध्या व दत्ता बारगजे हे जोडपे करीत आहे. 

संध्या बारगजे यांचे शिक्षण एम.ए., बी.एड. तर दत्ता बारगजे यांनी पॅथॉलॉजी पदवी प्राप्त केलेली. १९९५ साली त्यांचा विवाह झाला. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा प्रकल्पापासून अवघ्या दोन कि़मी. अंतरावर असलेल्या भामरागड ग्रामीण रुग्णालयात दत्ता बारगजे यांना नोकरी लागली. वैद्यकीय तपासणी आणि शिबिरांमुळे त्यांचे हेमलकसात जाणे-येणे वाढले. बाबा आमटे यांचा सहवास आणि प्रकाश आमटे यांच्यापासून प्रेरित होऊन आपणही सामाजिक कार्य करावे, असे त्यांच्या मनात आले. त्यांनी हा प्रस्ताव अर्धांगिनी संध्या यांच्यासमोर मांडला. त्यांनी याला मंजुरी दिलीच. शिवाय सोबतीचेही वचन दिले. त्याप्रमाणे त्यांनी २००२ साली एमआयव्हीबाधित मुलांना आधार, परिवार आणि औषधोपचार करण्याचा निर्णय घेतला. २००६ साली बिंदुसरेच्या तीरावर त्यांनी ‘इन्फंट इंडिया’ नावाचा प्रकल्प उभारला. ३ मुलांपासून सुरू झालेल्या या प्रकल्पात सध्या ३४ मुली आणि ३४ मुले, अशी एकूण ६८ मुले राहत आहेत. याच मुलांवर ते आज पोटच्या मुलांप्रमाणेच ‘प्रेम’ करीत आहेत. 

२००२ ते २०१९ या कालावधीत बारगजे दाम्पत्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागला. ५०० मीटरवर पाणी असतानाही त्याला हात लावण्यास मज्जाव करण्यात आला. शाळेत मुलांना प्रवेश घेऊ दिला नाही. अनेकांनी हल्ले चढविले, अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल केले. असे असतानाही या जोडप्याने माघार घेतली नाही. अनाथांचे ‘प्रेम’ आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी यावर मात केली आणि आज राज्यातील आदर्श प्रकल्प बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  

आठ महिलांना ‘आधार’६८ मुलांबरोबरच ८ महिलांनाही इन्फंट इंडियामध्ये आश्रय दिला आहे. त्यांच्यासाठी ‘आधार केंद्र’ सुरू केले आहे. यातील बहुतांश महिलांची मुले उच्चशिक्षित असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी नाकारल्यानंतर त्यांना बारगजे दाम्पत्याने जे ‘प्रेम’ दिलं, ते कुठल्याही ‘व्हॅलेंटाईन डे’ पेक्षा कमी नाही.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSocialसामाजिकsocial workerसमाजसेवकBeedबीड