शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day : समाजाने दुर्धर आजारामुळे नाकारलेल्या ६८ मुलांना ‘प्रेम’ देणारं जोडपं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:30 IST

एड्ससारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या तब्बल ६८ मुलांना मायेची ऊब आणि हक्काचे ‘प्रेम’ देण्याचे काम बीड जिल्ह्यातील संध्या व दत्ता बारगजे हे जोडपे करीत आहे. 

- सोमनाथ खताळ 

बीड : ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...’ मंगेश पाडगावकर यांची ही कविता सर्वांना परिचित असेल. तरुणांसाठी हे कदाचित खरंही असेल. मात्र, समाजासाठी काम करणाऱ्यांसाठी हे पूर्ण उलटे आहे. हल्ले, खोटे गुन्हे, अपमान यांचा सामना करून त्यांना आजही समाजातील ‘प्रेम’ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. १७ वर्षांच्या संघर्षावर मात करून एड्ससारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या तब्बल ६८ मुलांना मायेची ऊब आणि हक्काचे ‘प्रेम’ देण्याचे काम बीड जिल्ह्यातील संध्या व दत्ता बारगजे हे जोडपे करीत आहे. 

संध्या बारगजे यांचे शिक्षण एम.ए., बी.एड. तर दत्ता बारगजे यांनी पॅथॉलॉजी पदवी प्राप्त केलेली. १९९५ साली त्यांचा विवाह झाला. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा प्रकल्पापासून अवघ्या दोन कि़मी. अंतरावर असलेल्या भामरागड ग्रामीण रुग्णालयात दत्ता बारगजे यांना नोकरी लागली. वैद्यकीय तपासणी आणि शिबिरांमुळे त्यांचे हेमलकसात जाणे-येणे वाढले. बाबा आमटे यांचा सहवास आणि प्रकाश आमटे यांच्यापासून प्रेरित होऊन आपणही सामाजिक कार्य करावे, असे त्यांच्या मनात आले. त्यांनी हा प्रस्ताव अर्धांगिनी संध्या यांच्यासमोर मांडला. त्यांनी याला मंजुरी दिलीच. शिवाय सोबतीचेही वचन दिले. त्याप्रमाणे त्यांनी २००२ साली एमआयव्हीबाधित मुलांना आधार, परिवार आणि औषधोपचार करण्याचा निर्णय घेतला. २००६ साली बिंदुसरेच्या तीरावर त्यांनी ‘इन्फंट इंडिया’ नावाचा प्रकल्प उभारला. ३ मुलांपासून सुरू झालेल्या या प्रकल्पात सध्या ३४ मुली आणि ३४ मुले, अशी एकूण ६८ मुले राहत आहेत. याच मुलांवर ते आज पोटच्या मुलांप्रमाणेच ‘प्रेम’ करीत आहेत. 

२००२ ते २०१९ या कालावधीत बारगजे दाम्पत्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागला. ५०० मीटरवर पाणी असतानाही त्याला हात लावण्यास मज्जाव करण्यात आला. शाळेत मुलांना प्रवेश घेऊ दिला नाही. अनेकांनी हल्ले चढविले, अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल केले. असे असतानाही या जोडप्याने माघार घेतली नाही. अनाथांचे ‘प्रेम’ आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी यावर मात केली आणि आज राज्यातील आदर्श प्रकल्प बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  

आठ महिलांना ‘आधार’६८ मुलांबरोबरच ८ महिलांनाही इन्फंट इंडियामध्ये आश्रय दिला आहे. त्यांच्यासाठी ‘आधार केंद्र’ सुरू केले आहे. यातील बहुतांश महिलांची मुले उच्चशिक्षित असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी नाकारल्यानंतर त्यांना बारगजे दाम्पत्याने जे ‘प्रेम’ दिलं, ते कुठल्याही ‘व्हॅलेंटाईन डे’ पेक्षा कमी नाही.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSocialसामाजिकsocial workerसमाजसेवकBeedबीड