शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

Valentine Day : समाजाने दुर्धर आजारामुळे नाकारलेल्या ६८ मुलांना ‘प्रेम’ देणारं जोडपं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:30 IST

एड्ससारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या तब्बल ६८ मुलांना मायेची ऊब आणि हक्काचे ‘प्रेम’ देण्याचे काम बीड जिल्ह्यातील संध्या व दत्ता बारगजे हे जोडपे करीत आहे. 

- सोमनाथ खताळ 

बीड : ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...’ मंगेश पाडगावकर यांची ही कविता सर्वांना परिचित असेल. तरुणांसाठी हे कदाचित खरंही असेल. मात्र, समाजासाठी काम करणाऱ्यांसाठी हे पूर्ण उलटे आहे. हल्ले, खोटे गुन्हे, अपमान यांचा सामना करून त्यांना आजही समाजातील ‘प्रेम’ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. १७ वर्षांच्या संघर्षावर मात करून एड्ससारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या तब्बल ६८ मुलांना मायेची ऊब आणि हक्काचे ‘प्रेम’ देण्याचे काम बीड जिल्ह्यातील संध्या व दत्ता बारगजे हे जोडपे करीत आहे. 

संध्या बारगजे यांचे शिक्षण एम.ए., बी.एड. तर दत्ता बारगजे यांनी पॅथॉलॉजी पदवी प्राप्त केलेली. १९९५ साली त्यांचा विवाह झाला. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा प्रकल्पापासून अवघ्या दोन कि़मी. अंतरावर असलेल्या भामरागड ग्रामीण रुग्णालयात दत्ता बारगजे यांना नोकरी लागली. वैद्यकीय तपासणी आणि शिबिरांमुळे त्यांचे हेमलकसात जाणे-येणे वाढले. बाबा आमटे यांचा सहवास आणि प्रकाश आमटे यांच्यापासून प्रेरित होऊन आपणही सामाजिक कार्य करावे, असे त्यांच्या मनात आले. त्यांनी हा प्रस्ताव अर्धांगिनी संध्या यांच्यासमोर मांडला. त्यांनी याला मंजुरी दिलीच. शिवाय सोबतीचेही वचन दिले. त्याप्रमाणे त्यांनी २००२ साली एमआयव्हीबाधित मुलांना आधार, परिवार आणि औषधोपचार करण्याचा निर्णय घेतला. २००६ साली बिंदुसरेच्या तीरावर त्यांनी ‘इन्फंट इंडिया’ नावाचा प्रकल्प उभारला. ३ मुलांपासून सुरू झालेल्या या प्रकल्पात सध्या ३४ मुली आणि ३४ मुले, अशी एकूण ६८ मुले राहत आहेत. याच मुलांवर ते आज पोटच्या मुलांप्रमाणेच ‘प्रेम’ करीत आहेत. 

२००२ ते २०१९ या कालावधीत बारगजे दाम्पत्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागला. ५०० मीटरवर पाणी असतानाही त्याला हात लावण्यास मज्जाव करण्यात आला. शाळेत मुलांना प्रवेश घेऊ दिला नाही. अनेकांनी हल्ले चढविले, अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल केले. असे असतानाही या जोडप्याने माघार घेतली नाही. अनाथांचे ‘प्रेम’ आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी यावर मात केली आणि आज राज्यातील आदर्श प्रकल्प बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  

आठ महिलांना ‘आधार’६८ मुलांबरोबरच ८ महिलांनाही इन्फंट इंडियामध्ये आश्रय दिला आहे. त्यांच्यासाठी ‘आधार केंद्र’ सुरू केले आहे. यातील बहुतांश महिलांची मुले उच्चशिक्षित असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी नाकारल्यानंतर त्यांना बारगजे दाम्पत्याने जे ‘प्रेम’ दिलं, ते कुठल्याही ‘व्हॅलेंटाईन डे’ पेक्षा कमी नाही.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSocialसामाजिकsocial workerसमाजसेवकBeedबीड