शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

जलयुक्त शिवारच्या गाव निवडीला वशिल्याचा टेकू

By admin | Updated: January 15, 2016 23:45 IST

परभणी : गतवर्षीपासून सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानात यावर्षी गावांची निवड करण्यासाठी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी सुरु झाली

परभणी : पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने गतवर्षीपासून सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानात यावर्षी गावांची निवड करण्यासाठी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी सुरु झाली असून गाव निवडीसाठी शासनाने ठरविलेले निकष बाजूला सारुन शिफारशी केल्या जात असल्याने टँकरमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आधुरेच राहते की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे पर्जन्यमान कमी होत चालले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. या दुष्काळावर मात करण्याच्या उद्देशाने गतवर्षी राज्यशासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले. एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाद्वारे नियोजनबद्ध आराखडा तयार करुन हे अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. हे अभियान राबविल्यास पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था होईल, असा या मागचा उद्देश होता. परंतु, लालफितीच्या कारभारामुळे गतवर्षी या अभियानाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. परभणी जिल्ह्यात गतवर्षी या अभियानाकरीता १७० गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये एकूण ४ हजार ३९५ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी ४९१ कामे चालू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जलयुक्त शिवार अभियानच्या वेबपेजवर देण्यात आली आहे. वेबपेजवरील माहितीनुसार जिंतूर तालुक्यात १ हजार १ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी ४७ कामे चालू आहेत. पाथरी तालुक्यात १८५ पैकी १९, सेलू तालुक्यात ४५४ पैकी १३८, पालम तालुक्यात ३१५ पैकी ४१, गंगाखेड तालुक्यात १ हजार २९ पैकी ८५, मानवत तालुक्यात ५३५ पैकी ४२, सोनपेठ तालुक्यात १८६ पैकी ६८, पूर्णा तालुक्यात १५५ पैकी २७ तर परभणी तालुक्यात ५३१ पैकी केवळ २२ कामे सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. चालूवर्षी जलयुक्त शिवार अभियानासाठी गावांची निवड २६ जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच प्रत्येक तालुक्यातील गावांची निवड करण्याकरिता तालुकास्तरीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय झाला असून या समितीचे अध्यक्ष संबंधित तालुक्याचे आमदार राहणार आहेत. २६ जानेवारीपर्यंत गावांची निवड होणार असली तरी गेल्या काही दिवसांपासून या योजनेत आपल्या गावांचा समावेश व्हावा, यासाठी काही राजकीय पदाधिकारी, सरपंच धडपड करीत आहेत. ज्या गावांमध्ये सातत्याने पाणीटंचाई असते, तेथे नेहमीच टँकरने पाणीपुरवठा केला जातो, अशा गावांची निवड होणे सर्वप्रथम होणे आवश्यक असताना काही पदाधिकाऱ्यांकडून शासन नियम डावलून गावांच्या शिफारशी केल्या जात आहेत. चक्क नदीकाठची गावे या अभियानात घेण्याविषयी आग्रह केला जात आहे. गतवर्षी गाव निवडीबाबत लोकप्रतिनिधींना वाव नव्हता. परंतु, यावर्षी मात्र शासनाने नियम बदलल्याने अधिकाऱ्यांचीही गोची झाली आहे. परिणामी निकष डावलून गावाच्या शिफारसी होत असल्या तरी त्या शिफारसी रद्द करण्याचे धाडस दाखविताना अधिकारी दिसत नाहीत. पदाधिकाऱ्यांकडूनही मतांवर डोळा ठेवून अशी शिफारसपत्र दिले जात आहेत. त्यामुळे शासनाच्या मूळ हेतुपासूनच ही योजना दूर जात असल्याचे पहावयास मिळत आहे. पालकमंत्री दिवाकर रावते, जिल्हाधिकारी राहुल महिवाल व जिल्ह्यातील आमदारांनी शासनाचे निकष प्रमाण मानून गावांची निवड केल्यास खऱ्या अर्थाने पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. अन्यथा शिफारशींच्या व राजकीय हस्तक्षेप झालेल्या गावांमध्ये कितपत चांगले काम होईल, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)