शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

जलयुक्त शिवारच्या गाव निवडीला वशिल्याचा टेकू

By admin | Updated: January 15, 2016 23:45 IST

परभणी : गतवर्षीपासून सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानात यावर्षी गावांची निवड करण्यासाठी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी सुरु झाली

परभणी : पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने गतवर्षीपासून सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानात यावर्षी गावांची निवड करण्यासाठी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी सुरु झाली असून गाव निवडीसाठी शासनाने ठरविलेले निकष बाजूला सारुन शिफारशी केल्या जात असल्याने टँकरमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आधुरेच राहते की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे पर्जन्यमान कमी होत चालले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. या दुष्काळावर मात करण्याच्या उद्देशाने गतवर्षी राज्यशासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले. एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाद्वारे नियोजनबद्ध आराखडा तयार करुन हे अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. हे अभियान राबविल्यास पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था होईल, असा या मागचा उद्देश होता. परंतु, लालफितीच्या कारभारामुळे गतवर्षी या अभियानाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. परभणी जिल्ह्यात गतवर्षी या अभियानाकरीता १७० गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये एकूण ४ हजार ३९५ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी ४९१ कामे चालू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जलयुक्त शिवार अभियानच्या वेबपेजवर देण्यात आली आहे. वेबपेजवरील माहितीनुसार जिंतूर तालुक्यात १ हजार १ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी ४७ कामे चालू आहेत. पाथरी तालुक्यात १८५ पैकी १९, सेलू तालुक्यात ४५४ पैकी १३८, पालम तालुक्यात ३१५ पैकी ४१, गंगाखेड तालुक्यात १ हजार २९ पैकी ८५, मानवत तालुक्यात ५३५ पैकी ४२, सोनपेठ तालुक्यात १८६ पैकी ६८, पूर्णा तालुक्यात १५५ पैकी २७ तर परभणी तालुक्यात ५३१ पैकी केवळ २२ कामे सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. चालूवर्षी जलयुक्त शिवार अभियानासाठी गावांची निवड २६ जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच प्रत्येक तालुक्यातील गावांची निवड करण्याकरिता तालुकास्तरीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय झाला असून या समितीचे अध्यक्ष संबंधित तालुक्याचे आमदार राहणार आहेत. २६ जानेवारीपर्यंत गावांची निवड होणार असली तरी गेल्या काही दिवसांपासून या योजनेत आपल्या गावांचा समावेश व्हावा, यासाठी काही राजकीय पदाधिकारी, सरपंच धडपड करीत आहेत. ज्या गावांमध्ये सातत्याने पाणीटंचाई असते, तेथे नेहमीच टँकरने पाणीपुरवठा केला जातो, अशा गावांची निवड होणे सर्वप्रथम होणे आवश्यक असताना काही पदाधिकाऱ्यांकडून शासन नियम डावलून गावांच्या शिफारशी केल्या जात आहेत. चक्क नदीकाठची गावे या अभियानात घेण्याविषयी आग्रह केला जात आहे. गतवर्षी गाव निवडीबाबत लोकप्रतिनिधींना वाव नव्हता. परंतु, यावर्षी मात्र शासनाने नियम बदलल्याने अधिकाऱ्यांचीही गोची झाली आहे. परिणामी निकष डावलून गावाच्या शिफारसी होत असल्या तरी त्या शिफारसी रद्द करण्याचे धाडस दाखविताना अधिकारी दिसत नाहीत. पदाधिकाऱ्यांकडूनही मतांवर डोळा ठेवून अशी शिफारसपत्र दिले जात आहेत. त्यामुळे शासनाच्या मूळ हेतुपासूनच ही योजना दूर जात असल्याचे पहावयास मिळत आहे. पालकमंत्री दिवाकर रावते, जिल्हाधिकारी राहुल महिवाल व जिल्ह्यातील आमदारांनी शासनाचे निकष प्रमाण मानून गावांची निवड केल्यास खऱ्या अर्थाने पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. अन्यथा शिफारशींच्या व राजकीय हस्तक्षेप झालेल्या गावांमध्ये कितपत चांगले काम होईल, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)