शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

वैजापूरकरांचा खडतर प्रवास आता संपणार; दोन टप्प्यात ९७ कि.मी. रस्त्यांचे भाग्य उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:22 IST

वाहनचालकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. यासोबत ग्रामीण विकासालाही गती मिळणार आहे. 

- मोबीन खान 

वैजापूर : रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य, त्यामुळे होणारी आदळआपट, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उडणारी धूळ आणि सतत होणारे अपघात अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेल्या वैजापूरकरांचा खडतर प्रवास आता गुळगुळीत होणार आहे. विशेष म्हणजे महामार्गाची कामे करताना शेतकऱ्यांची एक इंचही जमीन संपादित न करता आहे, त्याच साईडपट्ट्यांवर रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात येत असून, यातील एकाही रस्त्यासाठी वाहनचालकांना टोल भरावा लागणार नाही. हे रस्ते ‘टोल फ्री’ राहणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. यासोबत ग्रामीण विकासालाही गती मिळणार आहे. 

तालुक्यातील शिऊर बंगला, औराळा, चापानेर, कन्नड, पिशोर, भराडी, सिल्लोड या ९७ किलोमीटर अंतर असलेल्या राज्य महामागार्साठी ३४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून दोन टप्प्यात या महामार्गाचे काम करण्यात येणार आहे. याशिवाय वैजापूर - गंगापूर- भेंडाळा फाटा ४६ किलोमीटर, येवला सरहद्द ते शिऊर बंगला २९ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग, शिऊर बंगला ते दिवशी पिंपळगाव २२ किलोमीटर, लासूरस्टेशन ते कोपरगाव तालुक्याच्या सरहद्दीपर्यंत ३४ किलोमीटर (नागपूर-मुंबई महामार्ग), नागमठाण ते गाढेपिंपळगाव प्रमुख जिल्हा मार्ग तीन किलोमीटर, वीरगाव ते सिरसगाव तीन किलोमीटर, खंडाळा ते तलवाडा १२ किलोमीटर, शिऊर बंगला ते टुणकी ७ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी शासनाने कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. 

तालुक्यात एकाचवेळी एवढ्या मोठ्या खर्चाच्या रस्त्यांना प्रथमच मंजुरी मिळाली आहे. जवळपास सर्वच रस्ते १२ मीटर लांबीचे राहणार आहेत. यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून ‘जैसे थ’े होती. संबंधित विभागाकडून केवळ रस्त्यांची  मलमपट्टी करून वाहनचालकांची बोळवण करण्यात येत असे. विशेषत: नागपूर-मुंबई महामार्गासह शिऊर बंगला ते कन्नड रस्ता व तालुक्यातील प्रमुख रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून मरणपंथाला लागले आहेत. नागपूर - मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेले. एवढे बळी घेऊन संवेदना बोथट झालेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचे कसलेही सोयरसूतक नव्हते. रस्ते म्हणजे विकासाच्या धमण्या समजल्या जातात. ज्या तालुक्यात दळणवळणासाठी रस्ते चांगले. तेथे सर्वच सोयीस्कर व सुलभ  होते. शेतर्कयांच्या शेतमालापासून ते व्यापारी व लहानमोठ्या व्यावसायिकांना माल ने -आण करण्यासाठी रस्ते गुळगुळीत असतील तर विकासात ती भरच असते. तालुक्यातील बहुतांश रस्त्यांकडे आतापर्यंत दुर्लक्ष केले गेले. गेल्या काही दिवसांपासून वैजापूरची ओळख खड्ड्यांचा तालुका म्हणून झाली. 

दरम्यानच्या काळात नागपूर-मुंबई महामार्गासह नाशिक - निर्मल राज्य रस्ता ( शिऊर मार्गे ) व वैजापूर - गंगापूर रस्ता या सर्वच रस्त्यांची दाणादाण उडाल्याने  औरंगाबादला जायचे कसे, असा गहन प्रश्न नागरिकांना पडला होता. परंतु आता तालुक्यातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांच्या कामांना एकाचवेळी मंजुरी मिळाल्याने नागरिकांना आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एकतर काहीच नाही. मिळाले तर भरभरून, अशी काहीशी गत रस्त्यांबाबत झाली. शहरातून जाणाऱ्या शिऊर -श्रीरामपूर रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य कधी उजळते, याची प्रतिक्षाही नागरिकांना आहे. दरम्यान, रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळून शुभारंभही करण्यात आला. आता रस्त्यांची कामे पूर्ण होऊन दळणवळणासाठी केव्हा खुली होतात, याबाबतची प्रतिक्षा नागरिकांना आहे.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादfundsनिधी