शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूरकरांचा खडतर प्रवास आता संपणार; दोन टप्प्यात ९७ कि.मी. रस्त्यांचे भाग्य उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:22 IST

वाहनचालकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. यासोबत ग्रामीण विकासालाही गती मिळणार आहे. 

- मोबीन खान 

वैजापूर : रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य, त्यामुळे होणारी आदळआपट, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उडणारी धूळ आणि सतत होणारे अपघात अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेल्या वैजापूरकरांचा खडतर प्रवास आता गुळगुळीत होणार आहे. विशेष म्हणजे महामार्गाची कामे करताना शेतकऱ्यांची एक इंचही जमीन संपादित न करता आहे, त्याच साईडपट्ट्यांवर रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात येत असून, यातील एकाही रस्त्यासाठी वाहनचालकांना टोल भरावा लागणार नाही. हे रस्ते ‘टोल फ्री’ राहणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. यासोबत ग्रामीण विकासालाही गती मिळणार आहे. 

तालुक्यातील शिऊर बंगला, औराळा, चापानेर, कन्नड, पिशोर, भराडी, सिल्लोड या ९७ किलोमीटर अंतर असलेल्या राज्य महामागार्साठी ३४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून दोन टप्प्यात या महामार्गाचे काम करण्यात येणार आहे. याशिवाय वैजापूर - गंगापूर- भेंडाळा फाटा ४६ किलोमीटर, येवला सरहद्द ते शिऊर बंगला २९ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग, शिऊर बंगला ते दिवशी पिंपळगाव २२ किलोमीटर, लासूरस्टेशन ते कोपरगाव तालुक्याच्या सरहद्दीपर्यंत ३४ किलोमीटर (नागपूर-मुंबई महामार्ग), नागमठाण ते गाढेपिंपळगाव प्रमुख जिल्हा मार्ग तीन किलोमीटर, वीरगाव ते सिरसगाव तीन किलोमीटर, खंडाळा ते तलवाडा १२ किलोमीटर, शिऊर बंगला ते टुणकी ७ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी शासनाने कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. 

तालुक्यात एकाचवेळी एवढ्या मोठ्या खर्चाच्या रस्त्यांना प्रथमच मंजुरी मिळाली आहे. जवळपास सर्वच रस्ते १२ मीटर लांबीचे राहणार आहेत. यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून ‘जैसे थ’े होती. संबंधित विभागाकडून केवळ रस्त्यांची  मलमपट्टी करून वाहनचालकांची बोळवण करण्यात येत असे. विशेषत: नागपूर-मुंबई महामार्गासह शिऊर बंगला ते कन्नड रस्ता व तालुक्यातील प्रमुख रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून मरणपंथाला लागले आहेत. नागपूर - मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेले. एवढे बळी घेऊन संवेदना बोथट झालेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचे कसलेही सोयरसूतक नव्हते. रस्ते म्हणजे विकासाच्या धमण्या समजल्या जातात. ज्या तालुक्यात दळणवळणासाठी रस्ते चांगले. तेथे सर्वच सोयीस्कर व सुलभ  होते. शेतर्कयांच्या शेतमालापासून ते व्यापारी व लहानमोठ्या व्यावसायिकांना माल ने -आण करण्यासाठी रस्ते गुळगुळीत असतील तर विकासात ती भरच असते. तालुक्यातील बहुतांश रस्त्यांकडे आतापर्यंत दुर्लक्ष केले गेले. गेल्या काही दिवसांपासून वैजापूरची ओळख खड्ड्यांचा तालुका म्हणून झाली. 

दरम्यानच्या काळात नागपूर-मुंबई महामार्गासह नाशिक - निर्मल राज्य रस्ता ( शिऊर मार्गे ) व वैजापूर - गंगापूर रस्ता या सर्वच रस्त्यांची दाणादाण उडाल्याने  औरंगाबादला जायचे कसे, असा गहन प्रश्न नागरिकांना पडला होता. परंतु आता तालुक्यातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांच्या कामांना एकाचवेळी मंजुरी मिळाल्याने नागरिकांना आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एकतर काहीच नाही. मिळाले तर भरभरून, अशी काहीशी गत रस्त्यांबाबत झाली. शहरातून जाणाऱ्या शिऊर -श्रीरामपूर रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य कधी उजळते, याची प्रतिक्षाही नागरिकांना आहे. दरम्यान, रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळून शुभारंभही करण्यात आला. आता रस्त्यांची कामे पूर्ण होऊन दळणवळणासाठी केव्हा खुली होतात, याबाबतची प्रतिक्षा नागरिकांना आहे.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादfundsनिधी