शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात बोंडअळीचे पंचनामे काही कार्यालयात, काही बांधावर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 19:06 IST

पंचनाम्याचे काम संपवण्यासाठी कृषि विभाग काही पंचनामे शेताच्या बांधावर व काही पंचनामे कार्यालयात बसून पूर्ण करत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

ठळक मुद्देपंचनाम्यासाठी १० दिवसांची डेडलाईन वैजापूर तालुक्यात अधिकारी, कर्मचार्‍यांची धावपळ

वैजापूर : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील जवळपास ७६ हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे जीपीएसद्वारे पंचनामे करुन हा अहवाल दहा दिवसात सादर करण्याचे आदेश कृषि विभागाला देण्यात आले आहेत. पण हे काम संपवण्यासाठी कृषि विभाग काही पंचनामे शेताच्या बांधावर व काही पंचनामे कार्यालयात बसून पूर्ण करत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. हे पंचनामे करण्यासाठी शेतकर्‍यांनाच फोटो आणायला सांगितले जात आहे, हे विशेष.

बोंडअळीसंदर्भात तहसीलदार सुमन मोरे यांनी बैठक घेऊन ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक, सरपंच, पोलीस पाटील यांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथके संपूर्ण तालुक्यात तैनात करण्यात आली आहेत. पण केवळ दहा दिवसात हे आव्हान पूर्ण करणे अशक्य वाटत असल्याने कृषि विभागाकडून काही पंचनामे शेताच्या बांधावर तर काही पंचनाम कार्यालयात बसून पूर्ण करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कितपत खरे होतील, याबाबत साशंकता आहे. 

तालुक्यातील वैजापूर, खंडाळा, शिऊर, गारज, लासूरगाव, महालगाव, लोणी खुर्द, नागमठाण, बोरसर आणि लाडगाव या दहा महसूल मंडळातील ५९ तलाठी सज्जेअंतर्गत असलेल्या १६४ महसूली गावात पंचनामे करायचे आहेत. विशेष म्हणजे हे सर्व पंचनामे शेतकर्‍यांच्या बांधावर जावून नुकसानग्रस्त शेतीचे जीपीस यंत्रणेद्वारे फोटो मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने काढण्यात यावेत, जेणेकरून नुकसानीच्या दाव्याची पडताळणी करता येईल. पण संबंधित कर्मचारी बांधावर न जाता शेतकर्‍यांनाच कार्यालयात बोलावून सरासरी ५० ते ६० टक्के क्षेत्रावर नुकसान झाल्याचे दाखवून पंचनामे पूर्ण करत असल्याचा आरोप आहे. 

मात्र, नुकसानीचे क्षेत्र जास्त असल्याने या कर्मचार्‍यांना एका दिवसात केवळ ३० ते ४० शेतकर्‍यांच्या बांधापर्यंतच पोहचणे शक्य होत आहे. आतापर्यंत १६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा तालुका कृषि अधिकारी विष्णू मोरे यांनी केला आहे. तालुक्यात एकूणच संपूर्ण कपाशीचे पीक बोंडअळी व किडीने पोखरले असून पंचनामे करणारी यंत्रणासुद्धा ही वस्तूस्थिती पाहून हादरली आहे.

कृषी सहायकाकडे पाच ते सहा गावांचा कारभारसंयुक्त पंचनामा करताना कृषी विभागाचा फिल्डवरील कर्मचारी असलेला कृषी सहायक महत्त्वाचा घटक आहे. परंतु तालुक्यात कृषी सहायकाकडे किमान पाच ते सहा गावांचा कारभार असून हजारो हेक्टर क्षेत्र आहे. तर एवढ्याच गावात तीन ते चार तलाठी व तेवढेच ग्रामसेवक आहेत. अशावेळी एकट्या कृषी सहायकाची सर्व ठिकाणी हजेरी लागणे अशक्य आहे. शिवाय काही ठिकाणी कृषी सहायकालाच पथकप्रमुख बनविण्यात आलेले आहे. येत्या दहा दिवसात हे पंचनामे पूर्ण करायचे असल्याने ग्रामीण भागात कर्मचार्‍यांकडून आता नवनवीन युक्त्या समोर येऊ लागल्या आहेत.  पंचनामे करताना हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांची गय केली जाणार नसल्याचे तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी