शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

वैतरणेचे पाणी; आज सादरीकरण

By admin | Updated: March 22, 2016 01:33 IST

औरंगाबाद : वैतरणेतील पाणी जायकवाडीत कसे आणता येईल, याबाबत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य उद्या मंगळवारी

औरंगाबाद : वैतरणेतील पाणी जायकवाडीत कसे आणता येईल, याबाबत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य उद्या मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासमोर सादरीकरण करणार आहेत. जायकवाडी धरणात पाण्याची उपलब्धता कमी होत असल्यामुळे वैतरणेतील पाणी वळवून जायकवाडीत आणून पाण्याची कमतरता काही प्रमाणात कमी करता येईल. यासाठी या उपाययोजनांचा समावेश त्या सादरीकरणात असणार आहे. राज्यपालांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार तसेच मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे आणि इतर सदस्यांचा समावेश असेल. जायकवाडी धरणात गेल्या काही वर्षांपासून पाण्याची उपलब्धता कमी होत असून, त्यामुळे जायकवाडी धरण भरत नाही. एकीकडे समन्यायी पाणी वाटपाचा वाद आणि त्यातून मिळणारा वाटा पाहता जायकवाडीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. दांगट म्हणाले, राज्यपालांसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यातून अपेक्षित असे साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. जायकवाडीचा प्रश्नही मांडणार जायकवाडीमध्ये २००७ नंतर आजवर फारसा जलसाठा होत नसल्यामुळे त्याचा परिणाम सिंचनावरदेखील होत आहे. गेल्या चार वर्षांत जायकवाडी धरणातून सिंचनासाठी फारसे पाणी उपलब्ध झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. तसेच जायकवाडीच्या वरील धरणांतून खाली अपेक्षित पाणी दिले जात नाही. त्यामुळे ही बाबदेखील राज्यपालांच्या नजरेस आणून देण्यात येणार असल्याचे नागरे यांनी सांगितले.