शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

वैतरणेचे पाणी; आज सादरीकरण

By admin | Updated: March 22, 2016 01:33 IST

औरंगाबाद : वैतरणेतील पाणी जायकवाडीत कसे आणता येईल, याबाबत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य उद्या मंगळवारी

औरंगाबाद : वैतरणेतील पाणी जायकवाडीत कसे आणता येईल, याबाबत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य उद्या मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासमोर सादरीकरण करणार आहेत. जायकवाडी धरणात पाण्याची उपलब्धता कमी होत असल्यामुळे वैतरणेतील पाणी वळवून जायकवाडीत आणून पाण्याची कमतरता काही प्रमाणात कमी करता येईल. यासाठी या उपाययोजनांचा समावेश त्या सादरीकरणात असणार आहे. राज्यपालांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार तसेच मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे आणि इतर सदस्यांचा समावेश असेल. जायकवाडी धरणात गेल्या काही वर्षांपासून पाण्याची उपलब्धता कमी होत असून, त्यामुळे जायकवाडी धरण भरत नाही. एकीकडे समन्यायी पाणी वाटपाचा वाद आणि त्यातून मिळणारा वाटा पाहता जायकवाडीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. दांगट म्हणाले, राज्यपालांसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यातून अपेक्षित असे साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. जायकवाडीचा प्रश्नही मांडणार जायकवाडीमध्ये २००७ नंतर आजवर फारसा जलसाठा होत नसल्यामुळे त्याचा परिणाम सिंचनावरदेखील होत आहे. गेल्या चार वर्षांत जायकवाडी धरणातून सिंचनासाठी फारसे पाणी उपलब्ध झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. तसेच जायकवाडीच्या वरील धरणांतून खाली अपेक्षित पाणी दिले जात नाही. त्यामुळे ही बाबदेखील राज्यपालांच्या नजरेस आणून देण्यात येणार असल्याचे नागरे यांनी सांगितले.