शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

रस्ते बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरा; जिल्हा प्रशासनाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:08 IST

दुष्काळाच्या झळा : स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंत्राटदारांना काम देतानाच एसटीपीचे पाणी रस्ते बांधकामासाठी वापरण्याबाबत अट टाकून करार करावा, असेही प्रशासनाचे आदेश आहेत. 

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाना दिले आदेश स्थानिक स्वराज्य संस्था कंत्राटदारांना करणार सूचना

औरंगाबाद : शहर व परिसरातील रस्ते बांधकामांच्या कामांसाठी महापालिकेच्या कांचनवाडी येथील एसटीपीचे (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) पाणी वापरण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती पाहता प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी पिण्यासाठी प्राधान्याने वापरण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंत्राटदारांना काम देतानाच एसटीपीचे पाणी रस्ते बांधकामासाठी वापरण्याबाबत अट टाकून करार करावा, असेही प्रशासनाचे आदेश आहेत. 

शहरातील सांडपाण्यावर कांचनवाडी एसटीपी केंद्रात प्रक्रिया केली जाते. एसटीपीतून प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम, उद्यानांसाठी वापरण्यायोग्य आहे. जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू होईल, एनएच-२११ अंतर्गत औरंगाबाद ते धुळे महामार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागत आहे. समृद्धी महामार्गाचे व एनएच २११ चे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी मनपाशी करार करून एसटीपीचेच पाणी वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. सोलापूर-धुळे महामागार्साठीही एसटीपीचे पाणी वापरण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

समृद्धी महामागार्चे काम तीन वर्षे चालेल. पुढील ७ वर्षे महामार्ग देखभाल व दुरुस्तीचे काम आणि वृक्षारोपण व संवर्धन कंत्राटदार करणार आहे. समृद्धी महामागार्साठी रोज १० एमएलडी पाणी लागणे अपेक्षित आहे. मनपातर्फे कमी दराने ते पाणी उपलब्ध होणे शक्य आहे. टँकरचा खर्च जास्त असल्याने समृद्धी महामार्ग कंत्राटदार एसटीपीवरून पाईपलाईन टाकून पाणी नेण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. गृहनिर्माण प्रकल्पांसाठी एसटीपीतील पाणी वापरण्याबाबत बांधकाम व्यावसायिक संघटनांशी जिल्हा प्रशासनाची चर्चा सुरू आहे. 

१०९ कोटींचा एसटीपी भूमिगत गटार योजनेतून १०९ कोटींच्या खर्चातून कांचनवाडी येथे एसटीपी बांधण्यात आला आहे. तेथे १६१ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असून, सध्या ६० एमएलडी पाणी तेथे मिळते. ते पाणी मनपादेखील त्यांच्या कामांसाठी वापरते की नाही, याबाबत सांगणे अवघड आहे. तेथे पाणी उपलब्ध असल्याचे पालिकेने आजवर जाहीरदेखील केलेले ऐकिवात नाही. एसटीपीतील पाणी सध्या नाल्यात सोडून देण्यात येत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सिमेंट काँक्रीट रस्ते, वृक्षारोपण व संवर्धन, गृहनिर्माण सोसायटी व अपार्टमेंटच्या बांधकामांसाठी एसटीपीतील पाणी वापरले जाण्याच्या दिशेने प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद