शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या गदारोळानंतर पुन्हा घ्यावा लागला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

By राम शिनगारे | Updated: June 27, 2023 14:31 IST

दीक्षांत सभागृहात पुन्हा पदवीदान सोहळ्यासाठी मंचावर जायचे की नाही यावर खल करण्यात आला. सुमारे अर्धा तास यावर चर्चा करण्यात आली.

छत्रपती सांभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 63 व्या दीक्षांत समारंभात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी (27 जून) गदारोळ केला. मंचावर बोलवून पदवी प्रमाणपत्र दिले नसल्याचे कारण पुढे करत विद्यार्थ्यांनी गदारोळ केला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन दोन वेळा पदवीदान समारंभ घेण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे. राष्ट्रगीत संपल्यानंतर पुन्हा मंचावरून पदवीदान करण्यात आली. 

शैक्षणिक सत्र 2022 दरम्यानच्या विद्यार्थ्यांना 63 व्या दीक्षांत समारंभात पदवी देण्यात आली. मात्र या समारंभात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना जाग्यावरच पदवी देण्यात आली होती. त्यामुळे दीक्षांत समारंभ संपल्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. राष्ट्रगीत संपल्यानंतर राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी दीक्षांत सोहळा संपल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सभागृहात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुलगुरू प्रमोद येवले आणि दीक्षांतचे समारंभाचे पाहुण्या पंकज मित्तल यांना काही काळ सभागृहात काय सुरू आहे हे कळलेच नाही.  काही विद्यार्थी जोर जोरात ओरडून पीएचडी पदवीचा अपमान आहे. 'आम्हाला जागेवरूनच प्रदान करायची होती तर आम्हाला बोलावले कशाला असा जाब विचारण्यास सुरुवात केली.' त्यानंतर कुलगुरू व्यासपीठावर गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. 

सूत्रसंचालन करणाऱ्या मस्तजिब् खान कुलगुरूंची पूर्वपरवानगी घेऊन पुन्हा एकदा पदवी देण्याची घोषणा केली. त्यानंतर दीक्षांत मिरवणूक सभागृहाच्या बाहेर गेले. दीक्षांत सभागृहात पुन्हा पदवीदान सोहळ्यासाठी मंचावर जायचे की नाही यावर खल करण्यात आला. सुमारे अर्धा तास यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी. डॉक्टर गजानन सानप, दत्तात्रय चर्चा करायला गेले. विद्यार्थ्यांनी पुन्हा पदवी घेण्याचा आग्रह धरला. त्यानंतर कुलगुरू, डॉक्टर मित्तल, चारही विद्याशाखांच्या अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषद सदस्य मंचावर आले. दीड वाजता पुन्हा पदवीदान सोहळा सुरू झाला. सभागृहात उपस्थित असलेल्या संशोधकांना 15 मिनिटात करण्यात आले.

कार्यक्रम राज्यपालांनी ठरवला- कुलगुरूकार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले होते. त्यांचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम ठरलेला होता राज्यपालांनी फक्त दीड तासांचा वेळ दिल्यामुळे मंचावरून दीक्षांतसोहळ्यात पीएचडी देता आली नाही असे मत कुलगुरूंनी व्यक्त केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण