शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विद्यार्थ्यांच्या गदारोळानंतर पुन्हा घ्यावा लागला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

By राम शिनगारे | Updated: June 27, 2023 14:31 IST

दीक्षांत सभागृहात पुन्हा पदवीदान सोहळ्यासाठी मंचावर जायचे की नाही यावर खल करण्यात आला. सुमारे अर्धा तास यावर चर्चा करण्यात आली.

छत्रपती सांभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 63 व्या दीक्षांत समारंभात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी (27 जून) गदारोळ केला. मंचावर बोलवून पदवी प्रमाणपत्र दिले नसल्याचे कारण पुढे करत विद्यार्थ्यांनी गदारोळ केला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन दोन वेळा पदवीदान समारंभ घेण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे. राष्ट्रगीत संपल्यानंतर पुन्हा मंचावरून पदवीदान करण्यात आली. 

शैक्षणिक सत्र 2022 दरम्यानच्या विद्यार्थ्यांना 63 व्या दीक्षांत समारंभात पदवी देण्यात आली. मात्र या समारंभात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना जाग्यावरच पदवी देण्यात आली होती. त्यामुळे दीक्षांत समारंभ संपल्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. राष्ट्रगीत संपल्यानंतर राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी दीक्षांत सोहळा संपल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सभागृहात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुलगुरू प्रमोद येवले आणि दीक्षांतचे समारंभाचे पाहुण्या पंकज मित्तल यांना काही काळ सभागृहात काय सुरू आहे हे कळलेच नाही.  काही विद्यार्थी जोर जोरात ओरडून पीएचडी पदवीचा अपमान आहे. 'आम्हाला जागेवरूनच प्रदान करायची होती तर आम्हाला बोलावले कशाला असा जाब विचारण्यास सुरुवात केली.' त्यानंतर कुलगुरू व्यासपीठावर गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. 

सूत्रसंचालन करणाऱ्या मस्तजिब् खान कुलगुरूंची पूर्वपरवानगी घेऊन पुन्हा एकदा पदवी देण्याची घोषणा केली. त्यानंतर दीक्षांत मिरवणूक सभागृहाच्या बाहेर गेले. दीक्षांत सभागृहात पुन्हा पदवीदान सोहळ्यासाठी मंचावर जायचे की नाही यावर खल करण्यात आला. सुमारे अर्धा तास यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी. डॉक्टर गजानन सानप, दत्तात्रय चर्चा करायला गेले. विद्यार्थ्यांनी पुन्हा पदवी घेण्याचा आग्रह धरला. त्यानंतर कुलगुरू, डॉक्टर मित्तल, चारही विद्याशाखांच्या अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषद सदस्य मंचावर आले. दीड वाजता पुन्हा पदवीदान सोहळा सुरू झाला. सभागृहात उपस्थित असलेल्या संशोधकांना 15 मिनिटात करण्यात आले.

कार्यक्रम राज्यपालांनी ठरवला- कुलगुरूकार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले होते. त्यांचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम ठरलेला होता राज्यपालांनी फक्त दीड तासांचा वेळ दिल्यामुळे मंचावरून दीक्षांतसोहळ्यात पीएचडी देता आली नाही असे मत कुलगुरूंनी व्यक्त केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण