शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

औरंगाबाद महापालिकेची आगामी निवडणूक होणार प्रभाग पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 17:22 IST

लोकसंख्या, प्रभागाचे प्रारूप तयार करण्याचे आदेश

ठळक मुद्देराज्य निवडणूक आयोगाचे पत्र  

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीचा बिगुल अखेर रविवारी वाजला. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला पत्र पाठवून प्रभाग निवडणुकीसाठी लोकसंख्येची पडताळणी, प्रभाग रचनेचे प्रारूप प्रस्ताव अंतिम करून २७ नोव्हेंबरपर्यंत सविस्तर अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या पत्राची मनपात आतुरतेने वाट पाहण्यात येत होती. शनिवारी सायंकाळी महापालिकेला हे पत्र प्राप्त झाले. अवघ्या २४ दिवसांमध्ये मनपा प्रशासनाला लोकसंख्येसह प्रभागाचे विवरण आयोगाला सादर करावे लागणार आहे. शहरात ११५ वॉर्डांसाठी एकूण २९ प्रभाग राहणार आहेत. चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात येणार आहे. शेवटचा ३ वॉर्डांचा एक स्वतंत्र प्रभाग राहील.

औरंगाबाद शहरात पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय मंडळींसह सर्वसामान्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आतापर्यंत महापालिकेची निवडणूक वॉर्ड पद्धतीने घेण्यात येत होती. प्रभाग पद्धतीत चार वॉर्ड एकत्र करून निवडणूक घेण्यात येणार आहे. मतदारांना आपल्या प्रभागातून चार नगरसेवकांना निवडण्याची संधी आहे. पहिल्यांदाच एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून येतील. प्रभागात चार वॉर्डही ठेवण्याची तरतूद राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाने महापालिकेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, प्रारूप प्रभाग रचनेचे प्रस्ताव २१ नोव्हेंबरपर्यंत मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या समितीसमोर सादर करावेत. समितीच्या मान्यतेनंतर २७ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा. आयोगाचे सचिव किरण कुरंदकर यांची पत्रावर सही आहे. या पत्रासोबत आयोगाने वॉर्डांच्या आरक्षणाची सविस्तर माहितीही देण्यात आली आहे. 

महापालिकेची अगोदरच पूर्वतयारीराज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी पत्र येईल, याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाला होती. त्यादृष्टीने मनपा प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवातही केली होती. २०१५ मध्ये ११३ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर सातारा-देवळाईचा मनपात समावेश झाला. तेथेही दोन वॉर्ड तयार करून नंतर पोटनिवडणूक घेण्यात आली. एकूण ११५ वॉर्ड मनपाच्या दप्तरी आहेत. अहमदनगर महापालिकेने अलीकडेच प्रभाग पद्धतीने निवडणूक घेतली आहे. या निवडणुकीची माहितीही अगोदरच मनपाने घेवून ठेवली होती.

चक्रानुक्रमे आरक्षण फिरणार२०१६ मध्ये राज्य निवडणूक आयोगाने प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करण्यासाठी चक्रानुक्रमे पद्धत कशी राबवावी, याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशानुसार एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीत वॉर्डांचे आरक्षण चक्रानुक्रम पद्धतीने फिरविण्यात येईल. मागील निवडणुकीत आरक्षित झालेले वॉर्ड आता चक्रानुक्रमे पद्धतीमधून बाहेर येतील. सध्या खुले असलेल्या वॉर्डांवर आरक्षण येण्याची दाट शक्यता आहे. आयोगाच्या या पद्धतीमुळे अनेक राजकीय मंडळींच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार आहे.

राजकीय मंडळींना भरली धडकीआरक्षणासाठी डिसेंबर २०१९ अखेर ड्रॉ पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. आरक्षणात कोणताही वॉर्ड आरक्षित होऊ शकतो. आरक्षण पद्धतीनंतरच राजकीय मंडळींचे भवितव्य निश्चित होणार आहे. आरक्षणाच्या भीतीने राजकीय मंडळींना चांगलीच धडकी भरली आहे. आयोगाकडून ड्रॉ पद्धतीला विलंब झाल्यास जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ड्रॉ पद्धत घेण्यात येईल.

२०११ ची जनगनणा  12,20,832 : एकूण लोकसंख्या 2,28,105 : अनुसूचित जातीचे मतदार  16,320 : अनुसूचित जमातीचे मतदार 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAurangabadऔरंगाबाद