शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

औरंगाबाद महापालिकेची आगामी निवडणूक होणार प्रभाग पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 17:22 IST

लोकसंख्या, प्रभागाचे प्रारूप तयार करण्याचे आदेश

ठळक मुद्देराज्य निवडणूक आयोगाचे पत्र  

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीचा बिगुल अखेर रविवारी वाजला. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला पत्र पाठवून प्रभाग निवडणुकीसाठी लोकसंख्येची पडताळणी, प्रभाग रचनेचे प्रारूप प्रस्ताव अंतिम करून २७ नोव्हेंबरपर्यंत सविस्तर अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या पत्राची मनपात आतुरतेने वाट पाहण्यात येत होती. शनिवारी सायंकाळी महापालिकेला हे पत्र प्राप्त झाले. अवघ्या २४ दिवसांमध्ये मनपा प्रशासनाला लोकसंख्येसह प्रभागाचे विवरण आयोगाला सादर करावे लागणार आहे. शहरात ११५ वॉर्डांसाठी एकूण २९ प्रभाग राहणार आहेत. चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात येणार आहे. शेवटचा ३ वॉर्डांचा एक स्वतंत्र प्रभाग राहील.

औरंगाबाद शहरात पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय मंडळींसह सर्वसामान्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आतापर्यंत महापालिकेची निवडणूक वॉर्ड पद्धतीने घेण्यात येत होती. प्रभाग पद्धतीत चार वॉर्ड एकत्र करून निवडणूक घेण्यात येणार आहे. मतदारांना आपल्या प्रभागातून चार नगरसेवकांना निवडण्याची संधी आहे. पहिल्यांदाच एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून येतील. प्रभागात चार वॉर्डही ठेवण्याची तरतूद राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाने महापालिकेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, प्रारूप प्रभाग रचनेचे प्रस्ताव २१ नोव्हेंबरपर्यंत मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या समितीसमोर सादर करावेत. समितीच्या मान्यतेनंतर २७ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा. आयोगाचे सचिव किरण कुरंदकर यांची पत्रावर सही आहे. या पत्रासोबत आयोगाने वॉर्डांच्या आरक्षणाची सविस्तर माहितीही देण्यात आली आहे. 

महापालिकेची अगोदरच पूर्वतयारीराज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी पत्र येईल, याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाला होती. त्यादृष्टीने मनपा प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवातही केली होती. २०१५ मध्ये ११३ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर सातारा-देवळाईचा मनपात समावेश झाला. तेथेही दोन वॉर्ड तयार करून नंतर पोटनिवडणूक घेण्यात आली. एकूण ११५ वॉर्ड मनपाच्या दप्तरी आहेत. अहमदनगर महापालिकेने अलीकडेच प्रभाग पद्धतीने निवडणूक घेतली आहे. या निवडणुकीची माहितीही अगोदरच मनपाने घेवून ठेवली होती.

चक्रानुक्रमे आरक्षण फिरणार२०१६ मध्ये राज्य निवडणूक आयोगाने प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करण्यासाठी चक्रानुक्रमे पद्धत कशी राबवावी, याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशानुसार एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीत वॉर्डांचे आरक्षण चक्रानुक्रम पद्धतीने फिरविण्यात येईल. मागील निवडणुकीत आरक्षित झालेले वॉर्ड आता चक्रानुक्रमे पद्धतीमधून बाहेर येतील. सध्या खुले असलेल्या वॉर्डांवर आरक्षण येण्याची दाट शक्यता आहे. आयोगाच्या या पद्धतीमुळे अनेक राजकीय मंडळींच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार आहे.

राजकीय मंडळींना भरली धडकीआरक्षणासाठी डिसेंबर २०१९ अखेर ड्रॉ पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. आरक्षणात कोणताही वॉर्ड आरक्षित होऊ शकतो. आरक्षण पद्धतीनंतरच राजकीय मंडळींचे भवितव्य निश्चित होणार आहे. आरक्षणाच्या भीतीने राजकीय मंडळींना चांगलीच धडकी भरली आहे. आयोगाकडून ड्रॉ पद्धतीला विलंब झाल्यास जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ड्रॉ पद्धत घेण्यात येईल.

२०११ ची जनगनणा  12,20,832 : एकूण लोकसंख्या 2,28,105 : अनुसूचित जातीचे मतदार  16,320 : अनुसूचित जमातीचे मतदार 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAurangabadऔरंगाबाद