शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

भाजीपाल्याला अवकाळी पाऊस, उष्णतेचा फटका; दरात किलोमागे ८० रुपयांपर्यंत वाढ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 9, 2024 11:45 IST

भाजीमंडईत फळभाज्यांचे भाव किलोमागे २० ते ६० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मागील महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस व आता उष्णतेची लाट याचा फटका भाज्यांना बसला आहे. लवकर भाज्या खराब होत असल्याने भाजीमंडईत फळभाज्यांचे भाव किलोमागे २० ते ६० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

फळभाज्यांमध्ये श्रावणघेवडा (बिन्स) जास्त भाव खात आहे. आठवडाभरापूर्वी १२० रुपये किलोने विक्री होणारी ही भाजी सध्या १८० रुपये किलोने विकली जात आहे. म्हणजे ८ दिवसांत किलोमागे ६० रुपयांनी भाववाढ झाली आहे. पावभाजी व पुलाव तयार करण्यासाठी श्रावणघेवड्याचा वापर केला जातो.

टोमॅटो, कांदा सर्वात स्वस्तफळभाज्यांमध्ये टोमॅटो, कांदा सर्वात स्वस्त म्हणजे २५ रुपये किलोने विकत आहे. बटाटा, काकडी, पत्ताकोबी ४० रुपये किलोने विकत आहे.

मेथी २० रुपये जुडीउष्णतेमुळे पालेभाज्याही लवकर खराब होत आहेत. यामुळे पालेभाज्यांचे भावही वाढले आहेत. ८ दिवसांपूर्वी १५ रुपये जुडी विक्री होणारी मेथी भाजी सध्या २० रुपयांत मिळत आहे. तर १० रुपयांना मिळणारी पालक, करडी, चुका, कोथिंबीर सध्या १५ रुपये प्रति जुडी विकत आहे.

ओल्या पोत्यात झाकून ठेवत आहेत भाज्याउष्णतेची लाट सध्या सुरू आहे. भाज्या वाळून जाऊ नयेत, भाजी ताजी दिसावी यासाठी विक्रेत्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत आहे. कोणी थोड्या थोड्या वेळाने भाज्यांवर पाण्याची फवारणी करत आहे तर काही विक्रेते पाण्यात भिजविलेली पोती भाज्यांवर ठेवत आहेत. यासाठी विक्रेत्यांना दिवसभर सतत लक्ष ठेवावे लागत आहे.-विजय वाघमारे, भाजी विक्रेता

आठवड्याभरात वाढले भावफुलकोबी ६०रु---८०रूगवार ६०रु---८०रुवांगे ४०रु---८०रुशेवगा शेंगा ४०रु---८०रुशिमला मिरची ६०रु---८०रुभेंडी ६०रु---८०रुगवार ६०रु---८०रुपत्ताकोबी ३०रु---४०रु

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारAurangabadऔरंगाबाद