शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

शहरातील रस्त्यांवर विनापरवाना सातशे रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 18:50 IST

शहरातील रस्त्यांवर तब्बल ७०२ रिक्षा विनापरवानाच धावत असल्याची बाब समोर आली आहे.

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर तब्बल ७०२ रिक्षा विनापरवानाच धावत असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल वर्षभरापासून रिक्षाचालक आरटीओ कार्यालयाला गुंगारा देत आहेत. त्यामुळे ७० लाख रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले जात आहे.

वर्षभरापूर्वी आरटीओ कार्यालयात परवान्यांसाठी ७०२ मालकांनी इरादापत्रांवर नवीन रिक्षांची खरेदी केली; परंतु इरादापत्रावर रिक्षा खरेदी केल्यानंतर परवाना काढण्याकडे दुर्लक्ष केले. एका परवान्यासाठी १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येते; परंतु परवाना न घेताच रिक्षा चालविण्यात येत असल्याने ७० लाख रुपयांचा महसूल बुडत आहे. या रिक्षांची आरटीओ कार्यालयात फक्त नोंदणी झाली आहे. सध्या खाजगी रिक्षांना परवानगी नाही. त्यामुळे या रिक्षांना परवाना घेणे बंधनकारक आहे. सातशे रिक्षांच्या या गोंधळानंतर गतवर्षी सप्टेंबर महिन्यापासून रिक्षांच्या नोंदणीच्या वेळीच परवाना शुल्क आकारण्यात येत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अवैध वाहतूक बंद करारिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाने सोमवारी पत्रकार परिषदेत विनापरवाना धावणाºया रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निसार अहमद खान, कोषाध्यक्ष कैलास शिंदे, कार्याध्यक्ष एस. के. खलील, सरचिटणीस रमाकांत जोशी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शहर बस ही सीएनजी अथवा बॅटरीवर चालणारी असावी, अशीही मागणी केली.

कारवाई करणाररिक्षाचालक संघटनांच्या माध्यमातून संबंधित रिक्षाचालकांनी परवाना घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सध्या रिक्षाचालकांना परवाना घेण्यासाठी संधी दिली जात आहे. त्यानंतर मात्र या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल.- संजय मेत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद