शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शिवजयंतीचा अभूतपूर्व जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:04 IST

‘प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंधर, ‘क्षत्रिय कुलावतंस्, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, ‘महाराज’, ‘श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’... असा गगनभेदी जयघोष करीत औरंगाबादकरांनी राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा केला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंधर, ‘क्षत्रिय कुलावतंस्, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, ‘महाराज’, ‘श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’... असा गगनभेदी जयघोष करीत औरंगाबादकरांनी राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा केला. ‘जयभवानी, जय शिवाजी’ नामोच्चाराने निर्माण झालेले ‘शिवमय’ चैतन्य अनुभवले. पहाटेपासूनच क्रांतीचौकात ‘शिवरायांच्या’ अश्वारूढ पुतळ्याभोवती तरुणाई एकवटली होती. शक्ती-भक्तीचा अभूतपूर्व सोहळा अनेकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.शहरात शिवजयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली. क्रांतीचौकात तरुणाईचा सागर उसळला होता. याशिवाय शहरात सर्वत्र उदंड उत्साह संचारला होता. टीव्ही सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विविध संघटनांतर्फे महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येत होते. सिडको एन-७ येथील आविष्कार कॉलनी, मुकुंदवाडी, जयभवानीनगर येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातही सकाळपासूनच उत्साही वातावरण होते.विविध भागांतून तरुणांनी उत्स्फूर्तपणे दुचाकी रॅली काढली. प्रत्येक दुचाकीवर भगवा ध्वज लावलेला होता. दुचाकी रॅलीत तरुणीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अनेक तरुणी नऊवारी साडी व डोक्यावर भगवा फेटा बांधून दुचाकी चालवत होत्या. सर्वत्र ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष घुमत होता. कॉलन्या-कॉलन्यांमध्ये शिवजयंतीनिमित्त व्याख्याने, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगीते वाजविली जात होती. मुख्य मिरवणूक सायंकाळी निघाली; पण अनेक उत्साही तरुणांनी सकाळपासूनच वाहनांवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पुतळा ठेवून आपापल्या भागातून मिरवणुका काढल्या. सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू क्रांतीचौक होते. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जात होते. टीव्ही सेंटर परिसरात महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. तरुणच नव्हे, तर शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सायकल रॅली काढली. लहान-मोठे भगवे झेंडे सायकलच्या हँडलला लावले होते. संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण पसरले होते.राजाबाजारातून मुख्य मिरवणूकशिवजयंतीनिमित्त जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने राजाबाजार येथून निघालेल्या मुख्य मिरवणुकीत सजीव देखाव्यांनी लक्ष वेधले. शहराचे ग्रामदैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरापासून सायंकाळी ढोलताशाच्या गजरात मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रारंभी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, महापौर नंदकुमार घोडेले, आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी आ. संजय शिरसाट, मा. खा. प्रदीप जैस्वाल, माजी आ. कल्याण काळे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पोलीस आयुक्त यशस्वी यादव तसेच महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, प्रकाश मुगदिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेरॉय, काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, ज्येष्ठ नेते व माजी महापौर रशीदमामू, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, सय्यद अक्रम, सुरेश टाक, विनोद कोहळेकर तसेच नवीनसिंग ओबेरॉय, अ‍ॅड. चंद्रकांत ठोंबरे, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, तनसुख झांबड आदींची प्रमुख उपस्थिती होती. समितीचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करीत शिवजयंती यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ‘पुढील शिवजयंतीपूर्वी क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची वाढविण्यात येईल,’ असे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. यानंतर महोत्सव समितीच्या सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला व मिरवणुकीला सुरुवात झाली. युवकांनी ढोल-ताशाचा गजर करीत सर्व परिसर दणाणून सोडला. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले ते सजीव देखावे. शिवछत्रपती महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक’ सजीव देखावा सादर करण्यात आला. यातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने शेतक-यांच्या प्रश्नावर सजीव देखावा सादर करण्यात आला. ‘शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी कसे सुखी होते’ याचे एक दृश्य व ‘सध्याच्या परिस्थितीत शेतक-यांची झालेली दैन्यावस्था’ अशा पद्धतीने दोन काळातील तुलना करण्यात आली होती. यशस्वीतेसाठी अभिजित देशमुख, अनिल मानकापे, रवींद्र काळे, संदीप शेळके, शिवाजी दांडगे, राजू वानखेडे, बाळू औताडे, सुनील मगरे, विश्वास औताडे, मनोज पाटील, रमेश गायकवाड, विशाल दाभाडे, अनिकेत पवार, अप्पासाहेब कुढेकर, रमेश केरे, मनोज गायके, हरीश शिंदे, दिग्विजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.