शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

‘आताच एक व्हा रे, तडकेल लोकशाही’; राज्यस्तरीय कवी संमेलनातून लोकशाहीचा जागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 17:44 IST

संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यापीठात रंगले राज्यस्तरीय कवी संमेलन

औरंगाबाद : ‘रंगात वाटलेल्या निर्बुद्ध माणसांनो, आताच एक व्हा रे तडकेल लोकशाही, पारायणे करा ग्रंथासम घटना, मेंदूत उतरेल मग जराशी लोकशाही’ अमरावती येथून आलेल्या नितीन देशमुख यांच्या या टोकदार कवितेने सर्वांना आत्मचिंतनास भाग पाडले.

संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात कवी सुधाकर भुईगळ स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलन रंगले. प्रा. दिलीप महालिंगे यांनी प्रेमकवितेपेक्षा सामाजिक कवितेचे कालानुरूप महत्त्व विशद केले. सुमित भुईगळ यांनी प्रास्ताविक, चेतन चोपडे यांनी सूत्रसंचालन केले. अमित भुईगळ यांनी आभार मानले.

‘चुडा जसा हातामंदी, तसा जीव गुंतला, चुडा कसा का असेना, जीवापाड जप त्याला,’ या अविनाश भारतीच्या कवितेला सभागृहाने डोक्यावर घेतले. भरत दौंडकर यांनी ‘गोफ’, ‘अंदाज येत नाही’ या कवितांतून सामाजिक तेढ, सध्याचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या स्थितीवर उजेड टाकला.अरुण पवार यांनी ‘अफू’ कवितेतून शेतमाल हमी भावावर बोट ठेवत खेड्याकडे चला याला अर्थ काय बापू, असा सवाल केला.सुनील उबाळे यांनी ‘गरिबीचे चटके’ कवितेतून विशद केले. रवी केसरकर यांनी माणसांना जो सदा फेटाळतो, धर्म तो सांभाळणे नाही बरे, अशा ओळींतून शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वेगळा विचार मांडला. नारायण पुरी यांच्या ‘भीम मोत्याचा हार, भीम नंगी तलवार ग माय’ या कवितेसह जांगडगुत्ता, काटा या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्यDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद