शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

‘आताच एक व्हा रे, तडकेल लोकशाही’; राज्यस्तरीय कवी संमेलनातून लोकशाहीचा जागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 17:44 IST

संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यापीठात रंगले राज्यस्तरीय कवी संमेलन

औरंगाबाद : ‘रंगात वाटलेल्या निर्बुद्ध माणसांनो, आताच एक व्हा रे तडकेल लोकशाही, पारायणे करा ग्रंथासम घटना, मेंदूत उतरेल मग जराशी लोकशाही’ अमरावती येथून आलेल्या नितीन देशमुख यांच्या या टोकदार कवितेने सर्वांना आत्मचिंतनास भाग पाडले.

संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात कवी सुधाकर भुईगळ स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलन रंगले. प्रा. दिलीप महालिंगे यांनी प्रेमकवितेपेक्षा सामाजिक कवितेचे कालानुरूप महत्त्व विशद केले. सुमित भुईगळ यांनी प्रास्ताविक, चेतन चोपडे यांनी सूत्रसंचालन केले. अमित भुईगळ यांनी आभार मानले.

‘चुडा जसा हातामंदी, तसा जीव गुंतला, चुडा कसा का असेना, जीवापाड जप त्याला,’ या अविनाश भारतीच्या कवितेला सभागृहाने डोक्यावर घेतले. भरत दौंडकर यांनी ‘गोफ’, ‘अंदाज येत नाही’ या कवितांतून सामाजिक तेढ, सध्याचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या स्थितीवर उजेड टाकला.अरुण पवार यांनी ‘अफू’ कवितेतून शेतमाल हमी भावावर बोट ठेवत खेड्याकडे चला याला अर्थ काय बापू, असा सवाल केला.सुनील उबाळे यांनी ‘गरिबीचे चटके’ कवितेतून विशद केले. रवी केसरकर यांनी माणसांना जो सदा फेटाळतो, धर्म तो सांभाळणे नाही बरे, अशा ओळींतून शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वेगळा विचार मांडला. नारायण पुरी यांच्या ‘भीम मोत्याचा हार, भीम नंगी तलवार ग माय’ या कवितेसह जांगडगुत्ता, काटा या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्यDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद