शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athawale: “संजय राऊतांचे आरोप निरर्थक, मोदी सरकार मुद्दाम कोणाला त्रास देत नाही”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 13:33 IST

Ramdas Athawale: ठाकरे सरकार प्रशासनाचे मॅनेजमेंट चांगले करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली.

औरंगाबाद:महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर मोदी सरकार करत असल्याचे आरोप विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. मात्र, यातच केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे प्रमुख नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) भाजप व शिवसेना यांनी एकत्र यावे आणि सरकार स्थापन करावे, अशी इच्छा व्यक्त करताना दिसतात. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आरोपांवर बोलताना, केंद्रातील मोदी सरकार मुद्दाम कोणाला त्रास देणार नाही. संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहेत, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. ठाकरे सरकार प्रशासनाचे मॅनेजमेंट चांगले करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहे. सरकारकडून विकास कामांबाबत योग्य आढावा घेतला जात नाही, अशी टीका आठवले यांनी केली. 

संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहेत

सरकार पाडण्याचा आमचा मानस नाही, त्यामुळे संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीचा होत नाही, मोदी सरकारला अशा छोट्या चौकशी करण्याची गरज नाही. केंद्र विकास आराखडा घेऊन पुढे जात आहे.आमचे सरकार मुद्दाम कोणाला त्रास देणार नाही. राज्यात आताच्या घडीला सुरू असलेले भांडण मिटले पाहिजे, असे आम्हाला वाटते. उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा आणि संजय राऊत यांना समज द्यावी, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल

शिवसेना-भाजपा एकत्र आले पाहिजे. दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. जुन्या फार्मुल्यावर एक असल्यास भाजपा देखील तयार होईल, असे सांगताना ठोस पुरावे नसताना आरोप करू नये. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावर कारवाई करणारे अधिकारी इतके वर्ष झोपले होते का? सुडाची भूमिका असू नये. कंगना यांचे कार्यालय देखील तोडण्यात आले होते, असे रामदास आठवले म्हणाले.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण